Tuesday, July 31, 2012

भारतीय इनोव्हेशन सादर करीत आहे …… ‘जिंकून हरलेली लढाई’

From Left Milind KulkarniSachin wazeUnmesh Joshi 2  भारतीय इनोव्हेशन सादर करीत आहे ......  जिंकून हरलेली लढाई

भारतावरील २६/११ च्या हल्ल्याची एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे यांनी लिहिलेली ही सत्यकथा, नव्हे ‘सत्य’…
‘दहशतवाद’ या विषयावरील मराठीतील पहिलेच ‘ओरिजिनल’ पुस्तक
१००% डिटेक्शन रेट असणारे, ४०० आरोपींना अटक करणारे, १२० कोटींहून अधिक किंमतीच्या मुद्देमालाची जप्ती करणारे, ६३ गुंड/ दहशतवाद्यांना कंठस्नान घालणारे एन्काऊंटर स्पेशालिस्ट सचिन वाझे हे आपणा सर्वांनाच परिचित आहेत.
२६/११ च्या हल्ल्याच्या नियोजनापासून ते कसाबला फाशी ठोठावण्यापर्यंतचा सर्व इत्यंभूत लेखाजोगा सचिन वझे यांनी ‘ जिंकून हरलेली लढाई’ या पुस्तकात सविस्तर मांडला आहे.
तपासाचे १२००० कागदपत्र, एफबीआय रिपोर्ट्स, ६५८ साक्षीदारांनी न्यायालयात दिलेले जबाब, न्यायाधीशांनी आरोपींना विचारलेले ४००० प्रश्न, ३००० पानांची निकालपत्रे या सर्वांचा सखोल अभ्यास करून सचिन वझे यांनी हा थरारपट कागदपत्र आणि छायाचित्रांसह आपल्यासमोर आणला आहे.
या सगळ्या प्रकरणात सिंहाचा वाटा असणारे काही रिअल हिरो या पुस्तकाद्वारे आपल्याला कळणार आहेत. सीएसटीवर मुकाबला करणारे सुदाम पंदरकर, गेटवेवर लढा देणारे निवृत्ती गव्हाणे, ओबेरॉय मधील कमांडो मनेश असे पोलीस आणि एनएसजीतल्या अनेक अधिका-यांच्या कार्याचा उल्लेख यात करण्यात आला आहे.
नरीमन हाउस, छत्रपती शिवाजी टर्मिनस, ओबेरॉय, ताज, तसेच आझाद काश्मीर मध्ये घडत असलेल्या घटनांचा जिवंत अनुभव देणारे हे पुस्तक आहे.
२६/११ चा हल्ला हा फक्त एका हॉटेलवरील किंवा स्टेशनवरील हल्ला नव्हता. भारतीय अस्मितेवरील हा हल्ला प्रत्येक भारतीयाच्या अभिमानावर झालेला हल्ला होता. २० पोलीस/ सैनिकांना आणि १४६ निरपराध जीवांना या हल्याने काळाच्या तोंडी दिले. २३८ जणांना अपंगत्वाचा शाप देत कोटी रुपयांच्या मालमत्तेला राख करणारा हा अमानवी हल्ला होता.
प्रथम दर्शनी फक्त १० व्यक्तींना प्रकाशात आणणा-या या छुप्या हल्ल्यात प्रत्यक्षरीत्या १०० आणि अप्रत्यक्षपणे अनेक व्यक्तींचा सहभाग होता हे हल्ल्यानंतर दोन महिन्यातच समोर आले. प्रत्यक्ष हल्ल्यामध्ये सहभागी असलेल्या एकाला, म्हणजे पाकिस्तानी अजमल आमीर कसाब असे नाव सांगणा-याला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली असून त्यावर मुंबई उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे.
भारताचे सर्वोच्च न्यायालय सुद्धा त्यावर पुढील शिक्कामोर्तब नक्की करेल अशी आशा आणि अपेक्षा ही आहेच.
२६/११ च्या भयंकर अनपेक्षित हल्ल्यानंतर या हल्ल्याची माहिती मिळवण्यात संरक्षण विभाग तसेच इतरही अनेक यंत्रणा अपयशी ठरल्या असे सगळ्यांचेच मत झाले. पण तरीही काटेकोरपणे नियोजन असलेला, जबरदस्त आखणी आणि प्रशिक्षित दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्याचा मुंबई पोलिसांनी आणि नेव्ही तसेच सैन्यदलाच्या कामांडोजनी सर्व शक्तीनिशी प्रतिकार केला. कोणतीही पूर्वकल्पना नसताना, अचानक समोर आलेल्या या हल्ल्याला प्रसंगावधान राखून निधड्या छातीने लढलेल्या लढाईला सलामच केला पाहिजे.
पुढे मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रान्चने महाराष्ट्राच्या अतिरेकी विरोधी दलाच्या मदतीने या हल्ल्याची पाळेमुळे खणून काढली.
९/११ च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अबोटाबादमध्ये घुसून ओसामा बिन लादेनला कंठस्नान घातले. आज आपल्याही डोक्यावर ही दहशतवादाची टांगती तलवार लटकते आहे. अशा कित्येक छुप्या हल्ल्याच्या सावटाखाली आपण सवयी नुसार वावरतो आहे. अमेरिकेने त्यांच्या बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहिली, आता आपलं सरकार हे काम कधी करणार या प्रश्नाचं उत्तर मिळेपर्यंत लक्षात ठेवूया ही-
‘ जिंकून हरलेली लढाई’

Monday, July 30, 2012

वैद्यकीय क्षेत्रावर भाष्य करणारा: ‘अघोर’ जीवनाचा जगण्याशी संघर्ष

2 X 301 वैद्यकीय क्षेत्रावर भाष्य करणारा:  अघोर जीवनाचा जगण्याशी संघर्ष

‘डॉक्टर’ म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीसाठी पृथ्वीतलावरील ईश्वरच. माणूस गरीब असो, श्रीमंत असो, जीवनदान देण्या-या या मानवरूपी ईश्वराची गरज प्रत्येकालाच कधीतरी भासते. जात, धर्म यासारख्या चौकटींच्या बाहेर जाउन रुग्णांसाठी कार्य करणारे हे ‘डॉक्टर’ म्हणजे सगळ्यांसाठीच एक आशेचा किरण असतो. शरीराला रोगांपासून मुक्त करून त्याला निरोगी आणि तंदुरुस्त बनवणा-या या ‘धन्वंतरी’ च्या सेवकांना समाजात देवाचे स्थान दिले जाते.
पण आजच्या या अनिश्चित जगामध्ये कोणत्याच गोष्टींची शाश्वती राहिलेली नाही आणि या विचित्र परिस्थितीतून डॉक्टरदेखील सुटलेले नाहीत. आज रुग्णांची निरपेक्ष भावनेने सेवा करणारे डॉक्टर शोधावे लागतील अशी स्थिती आहे. समाजात रुग्णाविषयी आस्था वाटणारे, त्यांच्यासाठी रात्रदिवस एक करणा-या डॉक्टरांच्या अगदी विरुद्ध आपल्या कर्तव्याचा सपशेल विसर पडलेले डॉक्टर बघायला मिळतात. पेशंटच्या जखमांवर औषध लावणारे डॉक्टरच त्यांच्या जखमांवर मीठ चोळत आहेत. पेशंटच्या परिस्थितीचा फायदा घेऊन त्यांना अगतिक करणा-या डॉक्टरांमुळे पेशंटला जगण्यासाठी नवीन संघर्ष करावा लागत आहेत. याच प्रश्नांवर भाष्य करणारा ‘अघोर’ हा मराठी चित्रपट साकारला गेला आहे.
‘प्रतिभा फिल्म्स’च्या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटात, डॉक्टरांच्या वाढत्या व्यावसायिक दृष्टीकोनातून वैद्यकीय जगताचं झालेलं बाजारीकरण आणि त्याचे समाजावर होत असलेले परिणाम रेखाटण्यात आले आहेत. राजू धिवधोंडे, एड. रमण सेनाड, मंगेश पितळे निर्मित ‘अघोर’ चित्रपटाचे दिग्दर्शन सलीम शेख यांनी केले असून चित्रपटाची संकल्पना राजू धिवधोंडे यांची आहे.
आज प्रत्येक गोष्ट मोजण्याचं ‘पैसा’ हे एवढं एकच परिमाण असल्याचं दिसून येतं. पण सेवाभावी वृत्ती ठेवून देशाला निरोगी बनवणा-यांची सुद्धा या धंदेवाईक जगात पैशासाठी स्पर्धा लागलेली पाहायला मिळते आहे. सध्या समाजात घडत असलेल्या विविध घटनांमुळे डॉक्टर आणि रुग्णामधली विश्वासाची गाठ कुठे तरी सैल होत असल्याचं लक्षात येतं. ही सुटत चाललेली गाठ पुन्हा एकदा घट्ट व्हावी या सकारात्मक दृष्टीकोनातून ‘अघोर’ चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. चित्रपटाची कथा- पटकथा सलीम शेख यांचीच असून संवाद सलीम शेख आणि पराग धोंगे यांचे आहेत.
गीतकार प्रवीण दवणे यांचे अप्रतिम शब्द आणि ज्येष्ठ संगीतकार नंदू होनप यांच्या संगीत दिग्दर्शनाने चित्रपटातील गाणी सुश्राव्य अशी बनली आहेत.रवींद्र साठे, सुरेश वाडकर, सुदेश भोसले, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, कौस्तुभ दातार, वैशाली सामंत आणि बेला शेंडे या एक से एक गायकांची सुरावट गीतांमधून ऐकता येईल. चित्रपटाचे छायांकन आशुतोष आपटे, नृत्यदिग्दर्शन फुलवा खामकर, कला दिग्दर्शन अमर गायकवाड यांनी केले असून संकलन पराग- सुशांत यांनी केले आहे. आशुतोष खोब्रागडे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.
संतोष जुवेकर, अनिकेत विश्वासराव, सई ताम्हणकर, मानसी कुलकर्णी, किशोरी शहाणे, डॉ. विलास उजवणे, विनोद राऊत, तेजस्वी पाटील, शादाब, रमण सेनाड या कलाकरांच्या भूमिका प्रेक्षकांना या चित्रपटात पाहता येतील. अत्यंत नाजूक सामाजिक आशयावर आधारलेला ‘अघोर’ हा चित्रपट मनोरंजनाची झलक घेउन प्रदर्शनासाठी सज्ज असून लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

Sunday, July 29, 2012

‘आम्ही चमकते तारे’

616596 390250444367347 399158093 o  आम्ही चमकते तारे

आज एकविसाव्या शतकात बहुतेक सर्व रोगांवरील औषधं उपलब्ध आहेत. रुग्णाचे मानसिक धैर्य आणि उचित औषधांच्या ट्रीटमेंटमुळे प्रत्येक माणूस निरोगी आयुष्य जगू शकतो आहे. पण कॅन्सर आणि एचआयव्ही सारखे रोग झालेल्या रुग्णांना मात्र त्यांच्या आजारापेक्षा समाजाकडून होणारा त्रास जास्त सहन करावा लागतो. याच आशयावर आधारलेला ‘श्री साईनाथ’ निर्मित ‘आम्ही चमकते तारे’ हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.
चित्रपटातील एका जोडप्याला मूल होत नसल्यामुळे ते एका अनाथ मुलाला म्हणजे सचिनला दत्तक घेतात. पण ह्या दत्तक घेतलेल्या निष्पाप जीवाला पुढे दुर्दैवाने एचआयव्हीची बाधा झाल्याचे लक्षात येते. एचआयव्ही म्हणजे एड्स नव्हे आणि यावर व्यवस्थित उपचार केले तर रुग्ण पुन्हा नॉर्मल आयुष्य जगू शकतो असा दिलासा डॉक्टर या जोडप्याला देतात. ह्या आजाराचा संसर्ग खोकला, शिंकणे, एकत्र खेळणे, एकत्र राहणे या कारणांमुळे होत नसल्यामुळे सचिनला नियमित शाळेत जाण्याला कोणताही अडथळा येत नाही.
एक दिवस शाळेत होणा-या आरोग्य तपासणी मध्ये सचिनचा हा रोग सर्वांना समजतो. शाळेच्या प्रिन्सिपल सचिनच्या पालकांना आधार देतात आणि त्याचबरोबर त्याला नियमित शाळेत पाठवण्याचा सल्ला देतात. पण शाळेतील इतर मुलांकडून मात्र सचिनला त्रास होऊ लागतो. बाकी मुलांचे पालक सचिनला शाळेतून काढून टाकण्यासाठी प्रिन्सिपलवर दबाव आणतात आणि सचिन ला शाळेतून काढण्यात येते.
या सर्व परिस्थितीत सचिन मात्र पूर्णपणे गोंधळून जातो. “आपल्याला कोणता रोग झाला आहे? आपल्याला शाळेतून का काढण्यात आले? सगळेजण माझ्याशी इतकं वाईट का वागतात? मला खरच दत्तक घेतलं आहे की या आजारामुळे आपले पालक तसं सांगत आहेत?” अशा अनेक प्रश्नांनी सचिन अगदी त्रस्त होतो…
अभ्यासातल्या हुशारीबरोबरच सुरेल गळ्याची दैवी देणगी लाभलेला हा सचिन पुढे या सर्व परिस्थितीवर कशी मात करतो आणि त्याचे आयुष्य कशा प्रकारे सुदृढ बनवतो हे चित्रपटात दाखवण्यात आले आहे.
दीपक एस. चौधरी आणि प्रकाश आ. जाधव यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची संवेदनशील कथा अनंत सुतार यांची तर पटकथा दीपक एस. चौधरी आणि प्रकाश आ. जाधव यांचीच आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन आणि संकलन प्रकाश आ. जाधव करत असून संवाद अनंत सुतार, अशोक मानकर आणि महेंद्र पाटील यांचे आहेत. सागर पवार, रवींद्र आवटी यांनी लिहिलेल्या गीतांना श्रीरंग आरस यांनी संगीत दिले आहे. साधना सरगम, आनंद शिंदे, वैशाली सामंत, संजीवनी भेलांडे, अवधूत गुप्ते, स्वनिल बांदोडकर, बेला शेंडे, सजनी आरस या संगीतातील चमकत्या ता-यांनी चित्रपटातील गाणी गायली आहेत. नरेंद्र पंडीत, फुलवा खामकर, डॉमनिक, राजेश बिडवे, बिपीन शेट्ये यांचे नृत्य दिग्दर्शन असलेला हा चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहे.
समाजातील माणुसकीची व्यापकता वाढावी आणि अशा रोगांनी ग्रासलेल्या रोग्यांना मानसिक बळ मिळून त्यांचेही आयुष्य सुदृढ व्हावे यासाठी हा चित्रपट नक्कीच सहकार्य करेल अशी अशा आहे.

Friday, July 27, 2012

‘सत्य, सावित्री, सत्यवान’ आजच्या सावित्री – सत्यवानाची कथा

शामल परब आणि सर्वेश परब दिग्दर्शित ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ हा चित्रपट आज २७ जुलैला संपूर्ण महाराष्ट्रातील वेगवेगळ्या चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतोय. गेली १४ वर्षे संकलनाच्या क्षेत्रात कामाचा मोठा अनुभव असणारे सर्वेश परब या चित्रपटाच्या निमित्ताने प्रथमच दिग्दर्शन क्षेत्रात पाउल ठेवत आहेत. चित्रपटाचे कथानक हे राजकारणाच्या गोतावळ्यात गुंतलेलं असणार आहे. या आधी प्रदर्शित झालेल्या राजकारणावरील चित्रपटाहून वेगळा विषय असणारा हा सिनेमा असल्याचं सर्वेश परब यांनी सांगितलं.
चित्रपटात घडलेल्या तीन खूनांवर होत असलेल्या राजकारणाच्या भोवती चित्रपट फिरतो. एका जिल्हा परिषद अध्यक्षाची हत्या होते आणि त्या हत्येचा तपास करण्याकरता एक सीआयडी इन्स्पेक्टर गावात दाखल होतो असं हे कथानक आहे. एकूणच चित्रपट खुना संदर्भात असल्याने आपण या चित्रपटाला ‘पोलिटिकल मर्डर मिस्ट्री’ म्हणू शकतो असं सर्वेश परब यांनी सांगितलं.
सध्याच्या या फास्ट रनिंग जगामध्ये राजकीय वर्तुळातल्या घटना तर अत्यंत वेगात घडत असतात. एकमेकांचे पाय खाली खेचण्यासाठी त्यांच्यामध्ये लागलेली चढाओढ, सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांवर केल्या जाणा-या कुरघोडी यांचे चित्रण सिनेमात केले आहे. या सत्ताकारणात लपलेली राजकारण्यांची वैयक्तिक आयुष्य कशी असतात हेही या चित्रपटात पाहता येईल. राजकीय शक्तीचा एक वेगळा विचार या चित्रपटातून मांडण्यात आल्याचंही सर्वेश परब यांनी सांगितलं.
सत्यवान सावित्रीची कथा आत्तापर्यंतची पिढी लहानपणापासून ऐकत आली आहे. पण आताच्या नवीन पिढीला ती तेवढी माहिती नाही. आजच्या आधुनिक जगातील सावित्रींना त्यावेळच्या सावित्रीची मेहनत, तिची निष्ठा माहिती नाही आणि कदाचित ती त्यांना कळणार ही नाही, कारण आजच्या सावित्रीच्या संकल्पना फार बदलल्या आहेत. त्यामुळे एका बदललेल्या ढंगातच आजच्या सत्यवान सावित्रीची कथा चित्रपटात रेखाटली आहे. चित्रपटाचे नाव ‘सत्य, सावित्री, सत्यवान’ असं ठेवण्यात हेच गुपित असल्याचं सर्वेश परब म्हणाले.
दिग्दर्शक सर्वेश परब १३-१४ वर्ष संकलन क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी दिग्दर्शनासाठी आजपर्यंत कोणालाही असिस्ट केलेलं नाही. त्यामुळे एडिटिंगचा त्यांना चांगलाच फायदा झाला आहे. गेली १४ वर्षे एडिटिंग मध्ये शिकलेल्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी ब-याच नवीन गोष्टी या सिनेमासाठी ट्राय आउट केल्या आहेत.
लहानपणापासून रंगभूमीवर कलाकार म्हणून काम करणा-या सर्वेश परब यांनी आतापर्यंत अनेक एकांकिकांचे दिग्दर्शन केले आहे. पण मुळात कॅमेऱ्याचे तंत्रज्ञान त्यांना एडिटिंग मुळे कळल्यामुळे त्याचा फायदा त्यांना दिग्दर्शन करताना झाला. ” मी माझ्या परीने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याचा प्रयत्न केला आहे” असं त्यांनी सांगितलं.
चित्रपटात सीआयडी इन्स्पेक्टरची भूमिका करणारे सचित पाटील यांची भूमिका अतिशय वेगळी असून तिला अनेक कंगोरे आहेत. जिल्हा परिषद अध्यक्षाच्या पत्नीचा रोल अमृता पत्की करत आहे. तर जिल्हा परिषद अध्यक्षाच्या अंगरक्षकाच्या पत्नीच्या भूमिकेत श्रुती मराठे असणार आहे. चित्रपटातील इतरही सर्व भूमिका अतिशय महत्वाच्या असून त्या चित्रपटाचा अविभाज्य भागच आहेत. सर्वच कलाकारांचा अभिनय अप्रतिम आहे.
आपल्या आजूबाजूला घडणा-या ब-याच गोष्टींपासून आपण अनभिज्ञ असतो. त्यामुळे ‘सत्य, सावित्री, सत्यवान ‘ या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या आजूबाजूला घडणा-या घटनांकडे प्रेक्षकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक गोष्टी ज्या समजातच घडतात पण समाजापर्यंत पोहोचत नाहीत त्या गोष्टी या सिनेमातून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

Thursday, July 26, 2012

‘गावाकडची अमेरिका’: अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे चित्रण

गगनचुंबी इमारती, भव्य शॉपिंग मॉल्स, स्वच्छ आणि प्रशस्त रस्ते, वा-याच्या वेगाने धावणा-या कार, सिलिकॉन व्हॅली, हॉलीवूड, डिज्नीवर्ल्ड स्वप्ननगरी, मॅक्डॉनल्ड आणि पिझ्झाहट…….
इतकी सगळी लिस्ट बघितल्या नंतर या सगळ्याचं माहेरघर असणा-या ‘अमेरिकेचं’ नाव प्रत्येकाच्याच ओठावर येईल.
पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात, त्या दोन्ही बाजू प्रत्येकालाच माहित असतील असं नाही. म्हणजे संपूर्ण जगाची ‘महासत्ता’ म्हणून ओळखल्या जाणा-या अमेरिकेची लखलखती बाजू सर्वांनाच माहित आहे. पण या झगमगाटापासून दूर असलेली, विकासाच्या पाउलवाटा अजूनही जिच्यापर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशीही एक अमेरिका अस्तित्वात आहे याची जाणीव फार कमी लोकांना आहे.
न्यूयॉर्क, वॉशिंग्टन, लॉस एंजेलिस, शिकागो म्हणजे अमेरिका असं एक समीकरणच बनलं आहे. पण या अतिप्रगत शहरांच्या सावलीत साधं- सुधं जीवन जगणारी, शेतात राबणारी, शहरी जीवनाचा वारा न लागलेली, देवभोळी – प्रसंगी कर्मठ धार्मिक, असलेली ग्रामीण अमेरिका नांदते आहे.
‘डॉ. संजीव चौबळ’ हे मूळचे मुंबईकर पशुवैद्यक. दहा वर्षाहून अधिक काळ नोकरीनिमित्ताने अमेरिकेच्या ग्रामीण भागात, आडवाटेच्या लहानशा गावांत, शहरी सुखसोयींपासून दूर वास्तव्य करताना डॉक्टरांनी सहकुटुंब ही ‘गावाकडची अमेरिका’ अगदी जवळून पहिली आणि अनुभवली. अमेरिकेत येणा-या पर्यटकांच्याच नाही तर तिथे वर्षानुवर्ष वास्तव्य करून राहणा-या अनेक भारतीयांना अनोळखी असलेले अमेरिकेचे ग्रामीण जीवन त्यांना अनुभवता यावे यासाठी डॉ. संजीव चौबळ यांनी आपले अनुभव शब्दबद्ध केले आहेत.
अमेरिका म्हणजे अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी असे कल्पनाचित्र रेखाटणा-या भारतीयांच्या समजुतीला छेद देणारे अमेरिकेचे ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण आहे.
अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये राहणा-या मराठी बांधवांना या ग्रामीण अमेरिकेचे रूप समजावे आणि भारतात राहून अमेरिकेच्या झगमगाटाची भव्य दिव्य स्वप्ने रंगवणाऱ्या भारतीय बांधवांना वास्तवाचा स्पर्श व्हावा हाही या पुस्तकामागचा उद्देश आहे.
अमेरिकेत राहूनही तेथील ग्रामीण जीवन न पाहिलेल्या मराठी अमेरिकन लोकांनी हे पुस्तक नावाजलं आहे. त्यामुळे नोकरी- धंदा, शिक्षण किंवा पर्यटनासाठी जाणा-या अथवा जाण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकाने वाचावे आणि संग्रही ठेवावे असे हे उपयुक्त पुस्तक आहे.
हे पुस्तक खरेदीसाठी आता उपलब्ध आहे.
छापील प्रत – महाराष्ट्रात – रु.३००/- (टपाल खर्च अंतर्भूत) …………………………………….
छापील प्रत – भारतात – रु.३५०/- (टपाल खर्च अंतर्भूत) …………………………………….
खरेदीसाठी संपर्क साधा:
मराठीसृष्टी
चाणक्य, ३रा मजला, क्लासिक प्लाझाच्या मागे, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२. भारत
दूरध्वनी: (९१-२२) २५४२११८५ / २५३३९००३
इ-मेल: bookshop@marathisrushti.com

Wednesday, July 25, 2012

'चांदी'च्या शिर्षकगीताला अवधूतच्या आवाजाचा सुवर्ण साज.

Chandi Marathi FIlm, Avadhut Gupte


प्रख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे यांच्या साहित्यकृतीवर तयार होत असलेल्या 'चांदी' या बहुचर्चित मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना न्यायलयीन लढाईत यश मिळाल्यानंतर या चित्रपटाचे टायटल साँग नुकतेच रेकॉर्ड करण्यात आले.

ज्ञानेश्वर गोवेकर यांच्या प्रभाकर फिल्म्स या बॅनरची निर्मिती असलेल्या आणि समीर नाईक दिग्दर्शित 'चादी' या चित्रपटासाठी लिहिले गेलेले टायटलसाँग जबरदस्त आहे. सुरेश वाडकरांच्या सांताक्रुझ येथील आजिवसन स्टुडिओमध्ये या गाण्याचे रेकॉर्डिंग अवधुत गुप्तेच्या आवाजात करण्यात आले. 

लेखक अनिल पवार लिखित आणि समीर नाईक दिग्दर्शित चित्रपटातल्या या गीताला संगीतकार प्रवीण कुवर यांचे संगीत दिले असून मीना गोविंद यांनी ते शब्दबद्ध केले आहे.

शेतक-यांमध्ये आत्मभान जागृत करणारा : ‘जागरण’

562748 298778946886134 242722302 n2 शेतक यांमध्ये आत्मभान जागृत करणारा :  जागरण

मातीत जन्मतो, मातीत खेळतो, मातीतच रमतो मी,
धरणीमायेच्या अंगावर कष्टाळू घडतो मी…….
असे ब्रीद वाक्य असलेला आपला सर्वांचा अन्नदाता म्हणजेच भलरी दादा, आयुष्यभर धरणीमातेची सेवा करत असतो. त्याच्या पोटात जरी भूकेने कल्लोळ माजवला तरी आपल्या सगळ्यांची पोट भरण्यासाठी तो मात्र न थांबता त्याचं काम करत असतो. आज काळ बदलला, समाज बदलला, विकासाच्या नावाखाली माणूस देखील बदलला पण माणसाची भूक आणि ती भागवणारा शेतकरी मात्र बदलला नाही.
‘सुजलाम सुफलाम’ अशा भारताचा ‘शेती’ हा प्राथमिक व्यवसाय. ‘शेती हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे.’ शाळेत असताना हे वाक्य सगळ्यांनीच घोटलेले आहे. पण आज हाच कणा ताठ न राहता तो वाकण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा अभाव, अपुरा पाणी पुरवठा, कर्जाचे डोंगर या सगळ्या दुष्टचक्रात आजचा शेतकरी अगदी गुदमरून गेला आहे. कोट्यावधी जीवांना खाऊ घालणारा हा शेतकरी स्वत: मात्र गळफास घेऊन आयुष्य संपवतो आहे यापेक्षा आणखी भयंकर चित्र ते काय असू शकणार? याच भयानक वास्तवाचा केवळ वेध न घेता त्याला सावरण्याचा मार्ग दाखवणारा ‘जागरण’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
राष्ट्राच्या शाश्वत विकासासाठी ‘खेड्याकडे चला’ असा संदेश देणारा हा चित्रपट आहे. निर्माते अरविंद तावरे यांच्या ‘मुक्ती व्हिज्युअल्स’ या बॅनरद्वारे हा चित्रपट येत असून समीर रावसाहेब हे चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. डॉ. अमोल कोल्हे, सिया पाटील, डॉ.शरद भुताडिया, माधव अभ्यंकर, समीर विजय, संजय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शशांक शेंडे आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा आणि संवाद शिव कदम यांनी लिहिली असून आदी रामचंद्र यांनी कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
‘जागरण’ ही कथा कृषिपदवी धारण केलेल्या यशवंत या तरुणाची आहे. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आपल्या गावाचा विकास करून ते समृद्ध करण्याचे स्वप्न मनात बाळगून हा यशवंत गावाला येतो आणि त्याचं उद्दीष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु करतो. समविचारी विचारांच्या तरुणाच्या साथीने चाललेल्या त्याच्या प्रवासात अनेक छुप्या विरोधाचा सामना त्याला करावा लागतो. पण यशवंतराव चव्हाणांचा आदर्श डोळ्यासमोर असणारा, अभ्यासातून तसेच चिंतनातून ख-या अर्थाने ज्याचे आयुष्य समृद्ध झाले आहे असा हा ‘यशवंत’ सर्व विरोधांना झुगारून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करू लागतो. सकारात्मक विचारांचा आधार घेऊन प्रस्थापित मार्गांना ओलांडून प्रत्यक्ष कृती करण्याकडे यशवंतचा कल असतो. या कार्यात त्याला समाजापासून दूर असणाऱ्या पण तात्त्विक विचारांनी प्रगल्भ असणा-या कमलाकरची साथ मिळते. आणि या सर्वांच्या आधारे यशवंतचे ‘जागरण’ सुरु होते. जागरण समाजहिताचं, जागरण आत्मसन्मानाचं, जागरण अन्नदात्याला न्याय मिळवून देणा-या प्रश्नाचं… यशवंतचा हा लढा आणि त्यातून होणारी वैचारिक त्याचबरोबर सामाजिक वाटचाल ही आजच्या तरुणांना मार्गदर्शक आणि प्रेरणा देणारी ठरणार आहे. आणि त्यामुळेच हे जागरण समाजासाठीचा लढा ठरणार आहे.
‘मुक्ती व्हिजुअल्स’ हि फक्त एक व्यावसायिक कंपनी नसून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारी कंपनी आहे. सामाजिक विषयांचे भान असणारे चित्रपटाचे निर्माते अरविंद तावरे हेदेखील मागील अनेक वर्षे शेतक-यांच्या प्रश्नांसाठी मनापासून काम करत आहेत. त्यांनी दत्तक घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातील अनेक गावांना विकासाची एक नवीन वाट त्यांनी दाखवून दिली आहे. त्यांची ही कृती इतरांनाही प्रेरणा देणारी ठरावी आणि शेतक-यांच्या प्रश्नांची भीषणता समाजासमोर मांडली जावी हाच ‘जागरण’चा हेतू आहे. मनोरंजनाची चौकट ओलांडून सामाजिक स्तरावर करण्यात येणारं हे ‘जागरण’ म्हणजे केवळ चित्रपट नसून एक ‘सामाजिक प्रकल्प’च आहे. आणि या कार्यामध्ये सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ आपापल्या परीने योगदान देणार आहेत.
‘जागरण’ चे चित्रीकरण लवकरच सुरु होणार असून या चित्रपटाचा मुहूर्त सुप्रसिद्ध गायक सुरेश वाडकर यांच्या हस्ते चित्रपटातील गीतांच्या डिजीटल लाँचने करण्यात आला. मराठीमध्ये सर्वात प्रथमच हा प्रयत्न केला गेला असून ‘धिंगाणा.कॉम’ या संकेत स्थळाच्या सहाय्याने हे म्युझिक लाँच करण्यात आले. शिव कदम आणि प्रसन्ना देशमुख यांनी चित्रपटातील अर्थपूर्ण गीते लिहिली असून आदि रामचंद्र यांनी संगीत दिग्दर्शन केले आहे. सुप्रसिद्ध गायक हरिहरन, सुरेश वाडकर आणि वैशाली सामंत यांनी ही गाणी गायली आहेत.
समाजातील प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख होऊन विचार करायला लावणा-या ‘जागरण’ चे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

Tuesday, July 24, 2012

बळीराजाच्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा 'जागरण'.

Jagran, Amol Kolhe
दुसर्‍यांना अन्नपुरवठा करणारा हा बळीराजा आज स्वतःच आत्महत्येच्या दुष्टचक्रात अडकलेला आहे. त्याच्या या परिस्थितीसाठी नेमकं कोण जबाबदार आहे ? हे संकट आस्मानी आहे की सुनामी? त्याच्या या प्रश्नांचा शोध घेणारा नव्हे तर त्या प्रश्नांची उत्तरे शोधणारा 'जागरण' हा चित्रपट तयार होत आहे. 

'खेडयाकडे चला' असा संदेश देणार्‍या या चित्रपटाच्या निर्मितीचा संकल्प केला आहे निर्माते अरविंद तावरे यांनी. त्यांच्या 'मुक्ती व्हिज्युअल्स' या बॅनरखाली बनणार्‍या या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत समीर रावसाहेब तर चित्रपटात डॉ. अमोल कोल्हे, सिया पाटील, डॉ. शरद भुताडीया, माधव अभ्यंकर, समीर विजय, संजय कुलकर्णी, धनंजय कुलकर्णी, शशांक शेंडे आणि गणेश यादव यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद शिव कदम यांची असून कार्यकारी निर्मात्याची जबाबदारी आदि रामचंद्र हे सांभाळीत आहेत. 

'जागरण' मधील अर्थपूर्ण गीते शिव कदम, प्रसन्न देशमुख यांनी लिहीली असून त्यांना आदि रामचंद्र यांनी संगीतबद्ध केले आहे. तर ही गाणी सुप्रसिद्ध गायक हरिहरन, सुरेश वाडकर, वैशाली सामंत आणि आदि रामचंद्र यांनी गायली आहेत.

नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत ‘बाबांची शाळा’

08 नीला सत्यनारायण यांच्या कथेवर आधारीत  बाबांची शाळा

लेखणीच्या साथीने साहित्यप्रेमींच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या, आणि वाचकांच्या हृदयाचा ठाव घेणा-या निवडणूक आयोगाच्या अध्यक्षा नीला सत्यनारायण आता एक वेगळ्याच रुपात आपल्यासमोर येणार आहेत. आजपर्यंत नियतकालिके, वर्तमानपत्रे, साप्ताहिके तसेच पुस्तकांच्या साथीने साहित्यजगताला समृद्ध करणा-या नीला सत्यनारायण आता चंदेरी दुनियेत प्रवेश करत आहेत. त्यांच्याच एका कथेवर आधारीत असलेला ‘बाबांची शाळा’ हा त्यांचा चित्रपट रुपेरी पडद्यावर साकारला जाणार आहे. या चित्रपटाचा मुहूर्त सोमवार, दिनांक १६ जुलै २०१२ रोजी, सकाळी ११ वाजता, आजीवासन स्टुडीओ,जुहू- तारा रोड, सांताक्रूझ येथे गीतध्वनीमुद्रणाने संपन्न झाला.
‘दे भरूनी मला किरणांनी, हे हृदय जरा सोनेरी, अन काजळला अंधार, दे पुसून मला किरणांनी….’ या नीला सत्यनारायण यांनी लिहिलेल्या गीताच्या ध्वनीमुद्रणाने ‘बाबांची शाळा’ चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. रवींद्र साठे आणि देवकी पंडीत या दोन्ही अभिजात गायकांनी हे गीत गायले आहे. ‘दत्तविजय प्रोडक्शन’ च्या बॅनरखाली तयार होणा-या या चित्रपटात एकूण सात गाणी असून सर्व गाणी नीला सत्यनारायण यांनीच लिहिलेली आहेत. संगीतकार कमलेश भडकमकर यांच्या साथीने या गीतांना सुरावटीने सजवण्याचं संगीत दिग्दर्शनाचं कामंही नीला सत्यनारायण करणार आहेत. सुरेश वाडकर,अमृता नातू, हृशिकेश रानडे तसेच हंसिका अय्यर अशा सर्व आघाडीच्या गायकांनी चित्रपटातील इतर गाणी गायली आहेत.
साहित्याची सेवा करताना नीला सत्यनारायण यांनी आजवर अनेक कथा वाचकांपर्यंत पोहोचवल्या.पण एका कथेने त्यांच्या हृदयाचा ठाव घेतला आणि ही कथा रुपेरी पडद्यावर झळकावी असे त्यांना वाटले. नाटक, सिनेमा आणि मालिका अशा तीनही कलाक्षेत्रांमध्ये आपल्या ठसा उमटवणा-या संपदा जोगळेकर प्रथमच दिग्दर्शिकेच्या भूमिकेत दिसणार आहेत.
नीला सत्यनारायण यांच्या मते परिस्थितीच्या कारणामुळे किंवा इतर काही कारणामुळे समाजाच्या एका चौकटीत बंदिस्त किंवा कैद झालेल्या समस्त पुरुषांमधला ‘बाबा’ हा घडवावा लागतो. ‘बाबांची शाळा’ च्या कथेमधून याचेच महत्व विषद करण्याचा प्रयत्न केला गेला आहे, असे त्यांचे म्हणणे आहे. कामानिमित्त फिरताना लक्षात आलेल्या, त्यांनी निरीक्षण केलेल्या व्यथा चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचाव्यात अशा उद्देशाने हा चित्रपट बनवण्याचे त्यांनी ठरवले. सिनेमासारख्या प्रभावी माध्यमातून ही कथाही तितक्याच प्रभावीपणे जगासमोर येईल असा नीला सत्यनारायणयांचा मानस आहे. त्यानुसार चित्रपटाची निर्मिती सुरु झाली आहे.
‘बाबांची शाळा’ चित्रपटाची कथा एका कैद्याच्या जीवनावर आधारलेली आहे. जन्मठेप झालेल्या पुरुषाच्या निश्चल आयुष्यात होणारे चढउतार या चित्रपटात दाखवण्यात आलेले आहेत. तुरुंगातली शिक्षा भोगून झाल्यानंतर आयुष्यात भोगाव्या लागणा-या शिक्षेचे चित्रण चित्रपटात करण्यात आलेले आहे.
आजपर्यंत रसिकांना सशक्त अभिनयाचे दर्शन घडवत असतानाच दिग्दर्शन क्षेत्राच्या कक्षा सुद्धा संपदा जोगळेकर यांना खुणावत होत्या. त्यानुसार ‘बाबांची शाळा’ या सिनेमाद्वारे त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला आहे. उत्तम दिग्दर्शनासाठी कराव्या लागणा-या अभ्यासाची संपदा जोगळेकर यांना आधीपासून जाणीव असल्याने त्यासाठी मेहनत घेण्याचीही त्यांची पूर्ण तयारी होती. योग्य संधीच्या प्रतीक्षेत असलेल्या संपदा जोगळेकर यांना नीला सत्यनारायण यांच्या ‘बाबांची शाळा’ या कथेने ती संधी उपलब्ध करून दिली आणि त्या दिग्दर्शनाकडे वळल्या. दिग्दर्शन आपल्याला आवडणारे भावविश्व असल्याचं संपदा जोगळेकर मानतात. आजवरचा अभिनयातील अनुभव आणि दिग्दर्शनासाठी आवश्यक असलेल्या गोष्टींच्या अभ्यासाच्या बळावर ‘बाबांची शाळा’ च्या दिग्दर्शनाचे शिवधनुष्य त्यांनी पेलले आहे. कलाकारांची निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे.

Sunday, July 22, 2012

‘ज्योतिबाच्या नावानं चांगभलं’ गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त

1 X 60 ज्योतिबाच्या नावानं चांगभलं गीतध्वनीमुद्रणाने मुहूर्त

संपूर्ण महाराष्ट्राचे लाडके आराध्यदैवत आणि बहुतांशी लोकांच्या कुलांचा कैवारी असलेला, पिवळा भंडारा उधळत सोनेरी रंगात रंगून जाणारा मल्हारी म्हणजेच ‘श्री ज्योतिबा’. डोंगराच्या माथ्यावर निवास करणा-या या ज्योतिबाच्या दर्शनासाठी भक्तजनांची सदैव रीघ लागलेली असते. ‘चांगभलं’ चा गजर करीत आणि भंडारा उधळीत भाविक भक्तीरंगात न्हाउन जातात आणि संपूर्ण वातावरण प्रसन्न, निर्मळ होऊन जाते. प्रकाश भालेकर दिग्दर्शित ‘ज्योतिबाच्या नावान चांगभलं’ या आगामी चित्रपटात याच ज्योतिबाच्या भक्तीचा आणि श्रद्धेचा महिमा वर्णन केला आहे.
‘वैजयंता प्रोडक्शन’ च्या सविता सुरेश डाळे,शीला प्रशांत सावंत यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. नुकताच गीतध्वनीमुद्रणाने चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. विजय देसाई यांनी संगीत दिलेली दोन गाणी वैशाली भैसने- माडे आणि आनंद शिंदे यांच्या आवाजात यावेळी ध्वनी मुद्रित करण्यात आली. ‘डोंगर माथ्यावरी गडावर ज्योतिबा नांदतो’ असे बोल असणारे जोशपूर्ण गीत आनंद शिंदे यांनी तर ‘गेला जन्म हा वाया, तुझ्या पडण्यात पाया’ हे भावपूर्ण भक्तीगीत वैशाली भैसने- माडे यांनी गायले आहे. आयटम साँग आणि प्रेमगीत देखील चित्रपटात समाविष्ट आहेत.
दिग्दर्शक प्रकाश भालेकर यांनीच चित्रपटाची कथा पटकथा लिहिली आहे. ज्योतिबा देवस्थानाचे महात्म्य सांगणारी हि कथा आहे. यातील सर्व गाणी सावता गवळी यांनी लिहिली असून विजय देसाई यांनी ती संगीतबद्ध केलेली आहेत. चित्रपटाचे छायांकन राजा फडतरे करत असून रंगभूषा नितीन दांडेकर यांची असणार आहे.
अशोक शिंदे,सतीश तारे,सुरेखा कुडची,सुरेश डाळे, राजू कदम, अॅड. प्रशांत सावंत या कलाकारांसोबत मंगेश कदम आणि गणेश कदम हे दोन नवोदित कलाकार चित्रपटात प्रवेश करत आहेत.
चित्रपटाच्या चित्रीकरणाला लवकरच सुरुवात होणार आहे.

Saturday, July 21, 2012

मराठीच्या वाटेवर हिंदीची सफर ……

375689 394545967272716 1507485875 n मराठीच्या वाटेवर हिंदीची सफर ......



प्रसिद्ध हिंदी अभिनेते जॅकी श्रॉफ हे मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये प्रवेश करत आहेत… होsssss
हल्ली मराठी अभिनेते, अभिनेत्री हिंदी चित्रपटसृष्टीकडे वळत असतानाच हिंदी स्टार्समध्ये मराठीत काम करण्याची क्रेझ आली आहे. सतत प्रकाशझोतात राहणे हे प्रत्येक स्टारचं जणू कर्तव्यच असते आणि आपल्या अभिनयामध्ये एकच मूड न येऊ देता विविध आशयाच्या व्यक्तिरेखा साकारण्याकडे सगळ्याच कलाकारांचा कल असतो. अशीच एक वेगळी व्यक्तिरेखा घेउन जॅकी श्रॉफ मराठी चित्रपटसृष्टीला आकर्षित करून घेत आहेत.
नितेश वाघमारे निर्मित आगामी मराठी चित्रपट ‘हृदयनाथ’ यामध्ये एका सुसंस्कृत घरामधल्या ‘साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’ या तत्वावर चालणारे ‘तात्या’ ही व्यक्तिरेखा ते साकारणार आहेत. पेशाने शिक्षक असलेले श्री. सावंत (तात्या) यांचा आदर्श जीवनप्रवास या चित्रपटात दाखवण्यात आला आहे. त्यांच्या आयुष्यात येणा-या बिकट प्रसंगांवर त्यांनी केलेली मात आणि त्यातून पुढे त्यांचे नव्याने सुरु झालेले आयुष्य अशी कथा रेखाटण्यात आली आहे. गावात राहणारे हे तात्या संपूर्ण गावाचे सल्लागार आहेत आणि त्यांच्या सतत कार्यक्षम राहण्याच्या वृत्तीमुळे गावात त्यांच्या कुटुंबाला खूप मोठा मान आहे. अभ्यासू वृत्तीची त्यांची मुलगी गावात राहूनच तिचं शिक्षण पूर्ण करते. त्यांच्या सहधर्मचारिणी ‘माई’ यांच्या साथीने होत असलेला त्यांचा प्रवास प्रेक्षकांना पाहता येईल.
या चित्रपटाचे विशेष आकर्षण म्हणजे रंगीला गर्ल ‘उर्मिला मातोंडकर’ हिच्यावर चित्रित करण्यात आलेले आयटम साँग. हिंदी चित्रपटसृष्टीच्या चंदेरी दुनियेनंतर आपल्या अदांनी ही मराठमोळी पोरगी मराठी मुलखाला घायाळ करणार आहे. सुनिधी चौहान, अदनान सामी, शंकर महादेवन या गाजलेल्या सुरांची सुरावट सुद्धा या चित्रपटातून ऐकायला मिळेल. संतोष मुळ्ये यांनी संगीतबद्ध केलेली गीते मिलिंद जोशी यांनी लिहिली आहेत. चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन दोन्ही अमर गुप्ते यांचे आहे. छायांकनाची जबाबदरी केदार गायकवाड यांनी स्वीकारली आहे.
अतिशय वेगळे कथानक, नवीन चेहरे आणि नवीन गायकी असा हिंदी टीमचा हा मराठमोळा चित्रपट प्रेक्षकांचे मराठमोळे मनोरंजन कसा करतो ही उत्सुकता आहे.

दहा ललनांत एकटा कन्हैय्या – ‘नवरा माझा भवरा’

1 X 20 1024x682 दहा ललनांत एकटा कन्हैय्या   नवरा माझा भवरा

कोणत्याही कलाकृतीत जर रंग भरायचे असतील तर बदल आणि नाविन्य या दोन गोष्टींची साथ ही असावीच लागते. आणि याच दोन गोष्टींचा अंमल सध्या मराठी चित्रपटांवर आहे. विषयातील नाविन्य, सादरीकरणातील बदल, लोकेशन्सची टूर तसेच आधुनिक तंत्रज्ञान यांच्या जोरावर मराठी चित्रपट अधिक आकर्षक करून, प्रेक्षकांना सतत काहीतरी नवीन देण्याचा प्रयत्न केला जातोय. याचाच भाग म्हणजे ‘गोवर्धन चित्र’, या निर्मिती संस्थेद्वारे करण्यात आलेला एक नवा प्रयोग. गोवर्धन चांगो भगत निर्मित, कमलाकर गुंजाळ दिग्दर्शित आगामी ‘नवरा माझा भवरा’ या मराठी चित्रपटात तब्बल दहा अप्सरा एकाच वेळी एकाच गीतावर आपली अदाकारी सादर करणार आहेत. मराठी चित्रपट – मालिकातील आघाडीच्या दहा नायिका या गीतामध्ये एका नायकाची चेष्टा मस्करी करत आहेत, असे हे गीत चित्रीत करण्यात आले आहे. नायिकांच्या वैविध्याबरोबरच हिप-हॉप, लावणी, भांगडा तसेच आदिवासी नृत्यशैलीतील ‘तारपा’ अशी नृत्यकलेतील विविधता सुद्धा प्रेक्षकांना या गीतात पाहता येईल.
युवा अभिनेता निलेश साबळे याची मध्यवर्ती भूमिका या चित्रपटात असून ‘बाई बाई लाजाळू बाई…..’ असे बोल असणारे हे गीत त्याच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. निलेश साबळे यांच्या पहिल्याच चित्रपटात त्यांच्या बरोबर मृण्मयी देशपांडे, पूजा सावंत, शर्मिष्ठा राऊत, गिरीजा ओक, शर्मिला शिंदे, अदिती सारंगधर, भार्गवी चिरमुले, माधवी निमकर, मेघा घाडगे, सोनाली खरे या अभिनेत्रींनी त्यांच्या ग्लॅमरस लूक बरोबर धमाकेदार नृत्यांचा खजिनाच प्रेक्षकांना दिला आहे. दिपाली विचारे यांनी कोरिओग्राफ केलेल्या या गाण्यात दहा नायिकांनी वेगवेगळी नृत्य
झलक दिली आहे.
मुख्य नायिकेच्या भूमिकेत तमन्ना नायर हि अभिनेत्री असून विजू खोटे, विजय चव्हाण, कमलाकर सातपुते, आनंदा कारेकर, सतीश तारे, भूषण कडू, प्रदीप पटवर्धन, हेमलता बाणे यांच्या महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत. बाह्य रूपापेक्षा आंतरिक सौंदर्य नेहमीच महत्वाचे असते हे विनोदी शैलीत या चित्रपटात मांडले गेले आहे. धम्माल विनोदी कथानक, सुमधुर संगीत, आणि लोकप्रिय कलाकारांच्या रंगात रंगलेला हा चित्रपट प्रेक्षकांचे पुरेपूर मनोरंजन करेल. चित्रपटाची कथा- पटकथा- संवाद नी गीतलेखन राजेश बमू गडे यांचे असून अशोक वायंगणकर यांनी संगीत दिले आहे. अवधूत गुप्ते, वैशाली माडे, आनंद शिंदे आणि स्वप्नील बांदोडकर यांच्या सुरेल आवाजांची साथ गीतांना लाभली आहे. जयंत घोष हे चित्रपटाचे छायांकन करत आहेत.
दहा सौंदर्यवतींच्या घोळक्यात रमलेला निलेश साबळे यांचा हा ‘नवरा माझा भवरा’ प्रेक्षकांना खळखळून हसवेल अशी आशा आहे.

Wednesday, July 18, 2012

कोंबडीनंतर बांग देतोय भरतचा कोंबडा: ‘शिखर’ चित्रपटाचा मुहूर्त

2 X 30 कोंबडीनंतर बांग देतोय भरतचा कोंबडा: शिखर चित्रपटाचा मुहूर्त



‘हृदयाचा ठोका चुकवणाऱ्या दिलखेच अदा, धम्माल रिदम आणि नवीन शब्दरचना यांच्या जोरावर गाजतं ते म्हणजे ‘आयटम साँग’. तरुणांच्या ओठावर अगदी सहज रुळणारं आणि त्यांच्या पायांना ठेका धरायला लावणारं हे आयटम साँग हिंदी चित्रपटांबरोबरच मराठी चित्रपटांनाही आकर्षित करून घेतंय. ‘कोंबडी पळाली’ या सुपरडुपर हिट झालेल्या गीतानंतर अभिनेता भरत जाधव ‘ शिखर’ या आगामी चित्रपटामध्ये अशाच एका धम्माल गीतावर थिरकले आहेत. ‘श्री रेणुका चित्र कंबाईन्स’ प्रस्तुत व्ही.अमिता निर्मित, दिग्दर्शित ‘शिखर’ या मराठी चित्रपटाचा मुहूर्त नुकताच या गीताच्या चित्रीकरणाने करण्यात आला. निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता भरत जाधव यांसह किरण शरद, प्रकाश भागवत, मोसमी तोंडवळकर हे कलाकारही यावेळी उपस्थित होते.
वैशाली सामंत यांनी ‘बांग देतोय कोंबडा ‘ असे बोल असणारे हे गीत गायले आहे. अभिनेता भरत जाधव आणि अभिनेत्री किरण शरद या जोडीवर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे. ‘कोंबडी’ नंतर भरत जाधव यांचा हा ‘कोंबडा’ सुद्धा प्रेक्षकांना आवडेल असा आहे.
‘चक दे’ फेम विद्या माळवदे हिची या चित्रपटाद्वारे मराठी चित्रपटसृष्टीत एन्ट्री होतेय. मनोज जोशी, पुष्कर जोग, अश्विनी एकबोटे, प्रमोद पवार, सुनील तावडे, शुभांगी लाटकर, प्रकाश भागवत, मोसमी तोंडवळकर यांच्यासुद्धा महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहे
व्ही. जगदीश यांची कथा असलेला हा चित्रपट ‘ ईश्वर हेच अंतिम सत्य’ या आशयावर आधारीत आहे. चित्रपटाची पटकथा, संवाद व्ही.अमिता यांनी लिहिले असून गीतलेखनही त्यांनीच केले आहे. संगीतकार व्ही. जगदीश शास्त्री आणि संजयराज गौरीनंदन यांनी चित्रपटातील गीतांना संगीत दिले आहे. नृत्यदिग्दर्शन दिलीप मेस्त्री यांनी केले असून ईश्वर बिद्री यांनी छायांकन केले आहे.राजू सापटे यांनी कलादिग्दर्शन केले आहे.
व्ही. अमिता यांचा पहिला चित्रपट ‘वासू’ प्रदर्शनासाठी सज्ज आहे. ‘शिखर’ च्या या दुसऱ्या निर्मितीनंतर आगामी काळात मराठीत वैविध्यपूर्ण चित्रपट बनवण्याचा त्यांचा मानस आहे.

Tuesday, July 17, 2012

'लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार' सोहळा संपन्न.

Lokshahir Vitthal Umap Mrudgandh Puraskar'
आपल्या खडया आवाजाने अवघा महाराष्ट्र हादरवून सोडणारे आणि लोककलेच्या प्रचार आणि प्रसारासाठी अखेरच्या श्वासापर्यंत निष्ठेने काम करणारे लोकशाहिर विठ्ठल उमप यांच्या स्मृती प्रित्यर्थ देण्यात येणारा मृदगंध पुरस्काराचा भावनिक सोहळा मोठ्या थाटात पार पडला. लोकशाहिर विठ्ठ्ल उमप आणि त्यांच्या पत्नी वत्सलाबाई उमप यांच्या जन्मदिनाचं औचित्य साधून 'लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार' सोहळा वत्सला प्रतिष्ठानच्या वतीने १५ जुलैला आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी लोककला, साहित्य, नाटक, चित्रपट आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांचा मृद्गंध पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. या सोहळ्याचा परमोच्चबिंदू ठरला तो लोकशाहिर कृष्णाजी साबळे यांना जीवनगौरव पुरस्कार देतानाचा क्षण. वत्सला प्रतिष्ठानच्या विश्वस्त श्रीमती वत्सलाताई उमप यांच्या हस्ते हा पुरस्कार शाहिर साबळेंना देण्यात आला. यावेळी विठ्ठल उमपांचे सुपुत्र आदेश, उदेश, संदेश, नंडेश उमप आणि शाहिर साबळेंचे नातू तथा दिग्दर्शक केदार शिंदे आणि मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचं नेपथ्य आणि प्रकाश योजना सुनील देवळेकर, नृत्य दिग्दर्शन विश्वास नाटेकर, ध्वनी संयोजन संजय राणे, निवेदन मंगला खाडीलकर आणि व्यवस्थापन  वत्सला प्रतिष्ठानचे विश्वस्त राजन गावंड, विजय उबाळे, डि. के. मोरे, नरेश कुलकर्णी, संजय गवळी यांनी केले. यासाठी मी मराठी या कार्यक्रमातील कलावंतांचेही सहकार्य लाभले.

भटक्या – विमुक्तांच्या जगण्याचे भेदक वास्तव रेखाटणारा – ‘उचल्या’

41 1024x682  भटक्या   विमुक्तांच्या जगण्याचे भेदक वास्तव रेखाटणारा    उचल्या

लक्ष्मण गायकवाड लिखित ‘उचल्या’ या कादंबरीने संपूर्ण साहित्यविश्वाला तिची दखल घ्यायला भाग पाडले. भटक्या विमुक्तांच्या जीवनातील सत्य परिस्थितीवर आधारलेली ही कादंबरी १९८७ मध्ये प्रकाशित झाली. या वास्तववादी कादंबरीच्या अनेक आवृत्त्या प्रकाशित करण्यात आल्या आणि देशभरातील अनेक भाषांमध्ये ती अनुवादित करण्यात आली. समाजाने सतत अवहेरलेला आणि लाजीरवाणे जीवन जगणारी ही जात – हिच्या दुर्लक्षित आयुष्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेण्यात ‘ उचल्या’ कादंबरी यशस्वी ठरली. अक्षरा फिल्म्स तर्फे आता ह्या अंधारलेल्या जीवनवाटा रूपेरी पडद्यावर साकार होत आहेत. अमर कक्कड, पुष्पा कक्कड निर्मित, ‘उचल्या’ चित्रपटाचा मुहूर्त विवेक चाबुकस्वार या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या बालकलाकारावर चित्रित करण्यात आला. समित कक्कड यांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रसंगाला सुप्रसिद्ध अभिनेते सचिन खेडेकर यांच्या हस्ते मुहूर्ताचा क्लॅप देण्यात आला. सुप्रसिद्ध सिनेमाटोग्राफर संजय जाधव यांनी छायांकनाचे काम केले आहे. ‘उचल्या’ चे लेखक लक्ष्मण गायकवाड यांचे मार्गदर्शनही चित्रपटाला लाभणार आहे. भटक्या विमुक्त जातींच्या जगण्यातील वास्तव या चित्रपटात रेखाटले आहे.
कायद्याची सर्व दारे बंद झाल्यामुळे पोटासाठी अन्न आणि संरक्षणासाठी चोरी करणारा हा गरजू समाज, तर दुसरीकडे ज्यांची भूक कधी भागतच नाही, ज्यांना संपत्ती कमावण्यासाठी डोंगर पोखरावे लागतात असा कायदेशीर चोरी करणारा पांढरपेशा समाज. लाच आणि भ्रष्टाचाराच्या हातात हात घालून जगणारे प्रतिष्ठितांचे जिणे जगतात आणि पोटासाठी चोरी करणाऱ्यांना गुन्हेगाराच्या पिंजऱ्यात उभे केले जाते, या लाजिरवाण्या परिस्थितीवर ह्या चित्रपटात ओरखडे ओढले आहेत.
‘हुप्पा हुय्या’ या चित्रपटाची यशस्वी निर्मिती केलेल्या ‘अक्षरा फिल्म्स डिव्हिजन’ चा ‘आयना का बायना’ हा नृत्यावर आधारित चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
कलाकारांची निवड पूर्ण होताच ‘उचल्या’ च्या चित्रीकरणास सुरुवात होईल.

Monday, July 16, 2012

”ऐक” : एक थरारक भयपट

 ऐक : एक थरारक भयपट

वेगवेगळ्या विषयावरील मराठी चित्रपटांनी सध्या मराठी चित्रपटश्रष्टी बहरत चालली असताना त्यामानाने मराठीत रहस्यमय, तसेच भीतीदायक चित्रपटाची संख्या नगण्य होती. भूता-प्रेताचे विषय तर तसे वर्ज्यच होते. परंतु ”ऐक” या नवीन मराठी चित्रपटाने त्याला अपवाद केला आहे. भूता-प्रेताच्या विषयाला ‘हांक’ देत ‘डरना जरुरी है’ असे सांगत एक थरारक भयपट पाहिल्याचे समाधान ”ऐक” ने दिले आहे. विशेष म्हणजे लेखक-दिग्दर्शक (जनमेजय पाटील आणि प्रतिक कदम) व मुख्य नायकासह सर्वचजण नवीन असताना थरारक भयपट करण्याचा त्यांचा हा पहिलाच प्रयत्न चांगला यशस्वी ठरला आहे.
तसे पाहता चित्रपटाच्या नावावरून फारसा अर्थबोध न होणाऱ्या ”ऐक” ची कथा म्हणजे एका ‘थरारपटाचा जीवघेणा खेळ’ आहे. ऋषी मराठे ( स्वप्नील जाधव) हा एका टी. व्ही. चैनेल मध्ये काम करणारा एक कार्यक्रमप्रमुख प्रेक्षकांनी आपल्या चैनेल कडे आकर्षित व्हावे म्हणून ‘ रिअलिटी हॉरर शो ‘ ची निर्मिती करतो. मात्र या ‘लाईव्ह शो’ मध्ये निवड झालेले पहिले जोडपे ऐनवेळी ‘शो’ मध्ये सहभागी होत नाही. त्यामुळे ‘शो’ रद्द होण्याची नामुष्की येऊ नये म्हणून स्वत: ऋषी मराठे आपल्या पत्नीलाच- आदितीला- ( आदिती सारंगधर) या ‘शो’ मध्ये सहभागी होण्याची विनंती करतो. वास्तविक आदिती व ऋषी यांच्यामध्ये आधीच वितुष्ट निर्माण होऊन प्रकरण घटस्फोटापर्यंत आलेले असते. तरीही या ‘शो’ साठी आदिती कशीबशी तयार होते. त्यांना विवान नावाचा छोटा मुलगाही असतो. ज्या बंगल्यात हा ‘हॉरर शो’ होणार असतो त्या बंगल्यात आदिती व ऋषी जातात मात्र तेथे ‘हॉरर शो’ मध्ये ठरल्याप्रमाणे गोष्टी न घडता अनेक चित्र-विचित्र घटना घडतात कारण त्या बंगल्यात एका छोट्या मुलीचे ‘भूत’ असते. हे ‘भूत’ ऋषीच्या जीवावरच उठते. ‘ती’ मुलगी कोण असते व तिचे ‘भूत’ ऋषीच्या जीवावर का उठते ? व ऋषीचे शेवटी काय होते? हे पडद्यावर ”ऐक” णेच योग्य ठरेल.
चित्रपटाचा पहिला भाग आदिती व ऋषी यांच्यातील भांडणे ”ऐक” ण्यातच जातो. ( या भांडणाची ‘कारणे’ अधिक पटण्याजोगी हवी होती ). प्रारंभी भुताची पुसटशी चाहूल दाखविण्यात आली आहे. मध्यंतरानंतर मात्र सुनसान बंगल्यातील थरारपटाचे चांगले दर्शन घडविण्यात आले आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कॅमेरा व कलाकारांचा अभिनय यांचा महत्वाचा वाटा आहे. मुख्य म्हणजे चित्रपटातील मुलीच्या भुताची कथा संयुक्तिक वाटते. मोठ्या पडद्यावरील पदार्पणात स्वप्नील जाधव याने नायकाच्या भूमिकेत चांगली रंगत आणली आहे. आदिती सारंगधर तसेच प्रसाद ओंक व चिन्मय मांडलेकर यांनीही आपल्या भूमिकांना न्याय दिला आहे. राजेश सावंत यांनी संगीतबद्ध केलेली दोन्हीही गाणी श्रवणीय आहेत. थोडक्यात बऱ्याच दिवसांनी एक थरारक भयपट पाहिल्याचे समाधान ”ऐक” ने दिले आहे.

मराठी मनोरंजन विश्वाचा आंतरराष्ट्रीय सोहळा : ‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’

logo मराठी मनोरंजन विश्वाचा आंतरराष्ट्रीय सोहळा : म्हैसकर मिफ्टा पुरस्कार  २०१२
चित्रपटसृष्टीच्या शतक महोत्सवी वर्षात मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीला सातासमुद्रापार मानाने मिरवत नेणारा ‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’ यंदा सिंगापूर मध्ये रंगणार आहे. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकारांचा हा लखलखता सोहळा, दिनांक – ४ ऑक्टो. ते ७ ऑक्टो. असा चार दिवस रंगणार आहे. यावर्षीचे ट्रॅव्हल पार्टनर असलेल्या केसरी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सच्या सहयोगाने पुरस्काराच्या तिसऱ्या वर्षाची सफर परदेशी निघणार आहे. मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत मिफ्टाचे आयोजक महेश मांजरेकर आणि केसरी टूर्स अॅन्ड ट्रव्हल्सच्या वीणा पाटील यांनी ही माहिती दिली. मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि सोहळ्यास हातभार लावणारे प्रायोजक या परिषदेत आवर्जून उपस्थित होते.
ज्या सोहळ्याने केवळ कार्यक्रमाचे स्वरूप न बदलता मराठी नाटक आणि चित्रपटांना आंतरराष्ट्रीय पातळीवर ग्लामरबरोबरच दर्जाही मिळवून दिला असा हा – Mifta ( Marathi International Film and Theatre Awards ). दिग्गज कलाकार आणि तंत्रज्ञाबरोबरच सामान्य प्रेक्षकही या सोहळ्याच्या प्रतीक्षेत असतो. मिफ्टाच्या मुख्य सोहळ्याबरोबरच मिफ्टाचे पूर्वरंग मांडणारा सोहळा आणि नाट्य चित्रपट महोत्सव सुद्धा प्रेक्षकांना आकर्षित करून घेतो. यावर्षी ठाण्यातील काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात हा महोत्सव रंगणार आहे. २ सप्टें . ते ९ सप्टें. दरम्यान रंगणाऱ्या या महोत्सवामध्ये दहा नाटके आणि दहा चित्रपटांचा आनंद प्रेक्षकांना अतिशय माफक दरात घेता येईल. चर्चासत्र, परिसंवाद आणि सांस्कृतिक सोहळ्याच्या जोडीला खाद्य महोत्सवाची एक वेगळीच चव यावर्षी अनुभवता येईल. मिफ्टा पुरस्काराची नामांकने महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ९ सप्टें. ला जाहीर करण्यात येतील, अशी माहिती महेश मांजरेकर यांनी दिली.
‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’ बद्दल बोलताना महेश मांजरेकर म्हणाले, ” दोन वर्षे मिफ्टाचे आयोजन आम्ही यशस्वीपणे केलंय. यासाठी नाट्य आणि चित्रपट सृष्टीतील अनेकांची आम्हाला मनापासून साथ लाभली. याही वर्षाचा सोहळा असाच रंगतदार होईल, तसेच मागील दोन वर्षापेक्षा अधिक सरस असेल अशी ग्वाही मी देतो.” सिंगापूरमध्ये ‘काकस्पर्श ‘ या चित्रपटाला तेथील रसिकांनी दिलेल्या प्रचंड प्रतिसादाच्या आधारावर म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२ सुद्धा तिथे चांगलाच गाजेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
या वर्षीपासून मिफ्टा परिवाराच्या शुभ यात्रेची जबाबदारी केसरी टूर्स अॅन्ड ट्रॅव्हल्सने घेतली आहे. त्यामुळे ट्रॅव्हल पार्टनर म्हणून प्रवास, वास्तव्य आणि ट्रान्स्फरची व्यवस्था आम्ही आपल्यासाठी करणार असून, मिफ्टा परिवारासोबत जोडले गेल्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे, अशी भावना केसरी टूर्सच्या वीणा पाटील यांनी या प्रसंगी व्यक्त केली.
‘म्हैसकर मिफ्टा पुरस्कार -२०१२’ साठी नामांकने भरण्याचे अर्ज www.miftaawards.com या संकेत स्थळावर १६ जुलैपासून उपलब्ध होणार आहेत.
 

Sunday, July 15, 2012

खिलाऱ्या : वास्तववादी कथासंग्रह

मराठवाडा साहित्य परिषदेच्या डॉ. नांदापूरकर सभागृहात नुकतेच ग्रामीण कथाकार प्रा. डॉ. भास्कर बडे यांच्या ‘खिलाऱ्या’ या कथासंग्रहाचे प्रकाशन झाले. त्याप्रसंगी प्रसिद्ध समीक्षक प्रा.बाळकृष्ण कवठेकर म्हणाले की प्रा. डॉ. भास्कर बडे हे स्वतः गावशिवारातील अनुभव घेऊन, प्रत्यक्ष जीवनात घडणाऱ्या घटनांचे वास्तवदर्शन आपल्या कथालेखनात घडवतात. तसेच ‘खिलाऱ्या’तील कथा वाचकांना विचार करावयास लावणाऱ्या आहेत.
प्रकाशनसमयी ज्येष्ठ साहित्यिक हृषीकेश कांबळे म्हणाले, “कथालेखक बडे यांचे साहित्य या दशकातील ग्रामीण दलित सीमारेषा धूसर करणाऱ्या कथा आहेत. यामध्ये ‘यमादादा’ ही कथा ग्रामीण दलित साहित्याचा एक सुंदर नमुना आहे. बडेंची कथा ही बदलत्या सांस्कृतिक जीवनाचा पट चित्रित करते.”
साहित्य परिषदेचे कार्यवाह श्री. के एस. अतकरे म्हणाले, “बडे हे हाडाचे कार्यकर्ते आहेत. गाव पातळीवरील अनुभव घेत शेतीशी निगडीत असल्यामुळे त्यांनी आपल्या साहित्यात शेतीतील दुःख, दारिद्र्य, त्यातील विविध प्रश्न कथालेखनाचे विषय केले आहेत. म्हणून श्री. बडेंच्या कथा ह्या साहित्यात दखलपात्र झाल्या आहेत.
या प्रसंगी प्रसिद्ध कवयित्री सौ. रंजन कंधारकर आणि प्राध्यापक केशव अलगुले यांनी ‘खिलाऱ्या’ कथा संग्रहातील कथेचे वेगळेपण आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. भाई ज्ञानोबा मुंढे समारोपाच्या वेळेस म्हणाले ,”खिलाऱ्यातील कथा ह्या वास्तववादी आहेत. त्या माणसांच्या कथा आहेत. विदारक अनुभव मांडणे हे बडेंच्या लेखणीचे वैशिष्ट्य आहे. म्हणून बडेंची कथा ही वाचकांना वाचनाचा आनंद देते.”
याप्रसंगी प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे. डॉ. दासू वैद्य, डॉ. महेश खरात, श्री. अजय अंबेकर, डॉ. गणी पटेल, पोलीस उपाधीक्षक बाबाराव मुसळे, प्रभाकर सानप, उत्तम बावस्कर, अंबादास केदार, प्रा. राजेश्वर पाटील, प्रा. राजेंद्र औरंगे, निवृत्त न्यायाधीश कांगणे, अमित बडे इ. मान्यवर उपस्थित होते. प्रसाद प्रकाशनचे श्री. सूर्यकांत शिरसे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. प्रा. चंद्रशेखर मलकमपट्टे यांनी कार्यक्रमाचे सूत्र संचालन केले, तर आभार प्रदर्शन श्री. अनंत कराड यांनी केले.

Saturday, July 14, 2012

भारतीयाच्या आई य्याई य्यो ची क्रेझ

केवळ सहा दिवसातच ८० हजारांपेक्षा जास्त फेसबुक व्युव्हर्स आणि साडेतीन हजारांहून अधिक यु ट्यूब व्युव्हर्स मिळवत देविशा फिल्म्स च्या गाण्याने यंगस्टर्स मध्ये आपली अनोखी क्रेझ निर्माण केली आहे. तब्बल तीन वर्षां नंतर अजय अतुल भारतीय द्वारे मराठी चित्रपटात पुनरागमन करत आहेत त्यामुळे त्यांच्या डाय हार्ड fan मध्ये त्यांच्या गाण्याबद्दलची उत्सुकता शिगेला पोहोचली होती,गेल्या सहाच दिवसांपूर्वी भारतीयाच्या फेसबुक पेज वर अपलोड झालेल्या गाण्यांनी अल्पावधीतच रसिकांची मन जिंकली भारतीय मधल्या या झांगडगुत्त्याची क्रेझ जर अशीच कायम राहिली तर हे गाणे कोलावारी डी चे यश गाठू शकेल यात शंकाच नाही.
bharatiya 300x202 भारतीयाच्या आई य्याई य्यो ची क्रेझ
या गाण्यातले शब्द आणि ठेका आपल्याला एखाद्या साउथ इंडियन गाण्याची आठवण आणून देत असला तरीही हे गाणे मराठीतच आहे. या बद्दल गीतकार गुरु ठाकूर म्हणतो कि,” माझं आणि अजय अतुलचं ट्युनिंग इतकं पक्कं झाल आहे कि अनेकदा ते मला ट्यून मेल करतात आणि मी माझे शब्द त्यांना मेसेज करतो , मी जेव्हा हे गाणं लिहायला घेतल तेव्हा मी खरतर बऱ्याच कन्नड शब्दांचा आभ्यास केला आणि ते शब्द मला यात वापरता येतील का याचा विचार केला पण मग मला अस वाटलं कि त्या शब्दांचे अर्थच जर ऐकणाऱ्याला समजले नाहीत तर त्यात काही मजा येणार नाही मग मराठीतलेच कन्नड वाटतील असे शब्द वापरून मी हे गाणं लिहिलेलं आहे.”

अजय या गाण्या बद्दल असे म्हणतो कि,” चित्रपट सुरु झाल्यानंतर काही वेळातच येणार हे गाण आहे , त्यामुळे या गाण्यातून त्या गावाची एक वेगळी ओळख प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. सहसा चित्रपटान मधून प्रेमाचा त्रिकोण पाहायला मिळतो या चित्रपटात मात्र प्रेमाचा अजब चौकोन मांडला गेलाय त्याची ओळखही या गाण्यामधून होत जाते. श्रेया सारख्या गुणी गायीके बरोबर परत एकदा काम करायला खूप मज्जा आली,” झांगड गुत्ता हे गाणं श्रेया अफलातून पणे गायली आहे. त्यामुळे हे गाणं क्रेझ निर्माण करणारच या बद्दल शंकाच नाही.तुमच्या पैकी अजूनही काही असे असतील ज्यांनी हे गाणं पहिल नसेल तर त्यांनी www.bharatiyathefilm.com वर लॉग ऑन करा किंवा खास ईसकाळच्या वाचकासाठी http://www.esakal.com/esakal/20120711/5019899679539599057.htm हि लिंक आहे आणि फेसबुक युजर्स http://www.facebook.com/bharatiyathefilm


हि लिंक फॉलो करून देविशा फिल्म्सच्या ‘भारतीय’ बद्दल अपडेटेड राहू शकतात.सुबोध भावे, जितेंद्र जोशी, डॉ मोहन आगाशे , कुलदीप पवार , ह्रीशिकेश जोशी, मिता सावरकर , तेजश्री, उज्वला जोग,शुभांगी लाठकर ,सुशांत शेलार,आणि मकरंद अनासपुरे अशी जबरदस्त स्टार कास्ट या सिनेमात पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर अप्रतिम सौंदर्याने नटलेले लोकेशन्स हि या चित्रपटाची आणखी एक जमेची बाजू असणार आहे.
bharatiya marathi movie
अनिरुद्ध पोतदारची अनोखी कथा, गिरीश मोहितेच अनुभवी दिग्दर्शन , संजय पवारांचे दुव्वाधार संवाद, अजय अतुलच अजिंक्य संगीत आणि देविशा फिल्म्सचे अभिजित घोलप यांच्या सारखा चाणाक्ष निर्माता असं फुल्ली लोडेड कॉम्बिनेशन म्हणजे “भारतीय….म्हंजी काय रं भाऊ “

Saturday, July 7, 2012

'लोकशाहीर विठ्ठल उमप मृदगंध पुरस्कर २०१२'.

Lokshahir Vitthal Umap

काही माणसं मृदगंधासारखी असतात....  ज्यांनी भेगाळलेल्या, खडतर वाटावरुन प्रवास करुन कलेची, रसिकांची सेवा करुन जनसामान्यात आपल्या कार्याचा सुगंध दरवळत ठेवला आहे. 

महाराष्ट्राच्या मातीतील विविध क्षेत्रात अशा काही प्रतिभाशाली व्यक्तीमत्वांनी आपल्या कार्यकर्तृत्वाने आणि विचाराने आपल्या मातीचा मृद्गंध महाराष्ट्रासोबत जगभर पसरविला आहे.  कला, साहित्य, शिक्षण, संगीत, सामाजिक अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याची दखल घेणारा कृतज्ञता सोहळा 'वत्सला प्रतिष्ठान'च्या वतीने 'लोकशाहीर विठ्ठल उमप मृद्गंध पुरस्कार २०१२' आयोजित केला आहे. 

विठ्ठल उमप यांच्या स्मरणार्थ हा सोहळा गेल्या वर्षीपासून आयोजित करण्यात येत असून यंदा हे या सोहळ्याचे दुसरे वर्ष आहे. रविवार १५ जुलैला प्रभादेवीच्या रविंद्र नाट्य मंदिरात हा सोहळा रंगणार असून अवघ्या महाराष्ट्राच्या वतीने सन्मानितांना मानचिन्ह आणि मानपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

लोकसंगीताला मान्यता प्राप्त करुन देणार्‍या लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या नावे देण्यात येणारा 'लोकशाहीर विठठल उमप मृदगंध पुरस्कार' हा प्रत्येक कलावंतासाठी तितकाचा बहुमोल आणि सन्माननीय आहे.

'वत्सला प्रतिष्ठान'चे मुख्य विश्वस्त संदेश विठ्ठ्ल उमप यांच्यासह विश्वस्त श्री. राजन गावंड, श्री उदेश विठ्ठल उमप आणि श्री. नंदेश उमप सोहळ्याची धुरा सांभाळीत आहेत. 

डॉ. प्रकाश बाबा आमटे … द रिअल हिरो

4  डॉ. प्रकाश बाबा आमटे ... द रिअल हिरो

‘समृद्धी सिनेवर्ल्ड’ निर्मिती संस्थेअंतर्गत ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो’ हा चित्रपट साकार होणार आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणास सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार आहे. हा चित्रपट हेमलकसा सारख्या अतिदुर्गम भागामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून माडीया गोंड आदिवासींच्या जीवनात आरोग्याचा आणि ज्ञानाचा प्रकाश आणणारे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. प्रकाश आमटे यांच्या असामान्य कार्यावर आणि जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शन समृद्धी पोरे करणार आहेत. हा चित्रपट आपला ड्रीम प्रोजेक्ट असून डॉ. प्रकाश आमटे यांचे कार्य जगभर पोहोचवण्यासाठी हा चित्रपट मराठी, हिंदी आणि इंग्रजी अशा तिन्ही भाषेत बनवण्याचा मानस अॅड. समृद्धी पोरे यांनी व्यक्त केला.
या चित्रपटात डॉ. प्रकाश आमटेंची मध्यवर्ती भूमिका प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर साकारणार आहेत. मुंबईतील स्वा. सावरकर सभागृहात आयोजित एका कार्यक्रमात नुकतीच या चित्रपटाची आणि त्यातील कलाकारांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली. चित्रपटात नाना पाटेकरांबरोबर डॉ. मंदाकिनी आमटेंच्या भूमिकेत मृणाल कुलकर्णी दिसणार आहे. प्रसिद्ध छायालेखक महेश लिमये यांचे छायाचित्रण असेल तर विक्रम गायकवाड रंगभूषा सांभाळणार आहेत.
आनंदवनाच्या माध्यमातून ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांच्या उत्थानासाठी मोलाचे कार्य केले. त्यांची दोन्ही मुले डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश यांनी त्यांचा हा वारसा पुढे सांभाळला. नाना पाटेकर यांना बाबा आपला तिसरा मुलगा मानत. या सर्वांचे जीवन व कार्य नानांनी अतिशय जवळून अनुभवलं आहे, तसंच त्यांच्या बरोबर कामही केलं आहे. त्यामुळे डॉ. प्रकाशची भूमिका साकारण्यासाठी नाना लगेच तयार झाले. याबाबत बोलताना नाना म्हणाले, “ज्या परिवाराने आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजसेवेसाठी वेचला त्या परिवाराने मला मुलाप्रमाणे प्रेम दिलं हे मी माझं भाग्य समजतो. अॅड. समृद्धी यांनी चित्रपटाची पटकथा ऐकवली आणि डॉ. प्रकाशच्या भूमिकेबद्दल विचारले आणि मी होकार दिला. माझ्या दृष्टीने ही भूमिका आहे किंवा हा चित्रपट आहे असं मी काही मानत नाही. माझ्यासाठी हा चित्रपट म्हणजे जगणं आहे. त्याचा आनंद मला लुटायचा आहे एवढेच मी बोलू शकेन.” यावेळी नानांनी बाबा आमटेंबरोबरच प्रकाश व विकास बरोबरच्या आठवणी तसेच आनंदवन आणि हेमलकसातील अनुभव सांगितले. तसेच या दोन्ही ठिकाणांना आवर्जून भेट देण्याचे सर्वांना आवाहनही केले.
“मंदाताईंची भूमिका करायला मिळणं हे मी माझं भाग्य समजते. लहानपणी एकदा आजोबांबरोबर आनंदवनात गेले असताना आजोबांनी बाबा आमटेंना नमस्कार करायला सांगितले आणि हे देव आहेत असे सांगितले. मोठी झाल्यानंतर मला त्याचा अर्थ कळला आणि आता हे ही कळलं की देवांच्याही पिढ्या असतात, ज्या डॉ. प्रकाश व डॉ. मंदा ताईंच्या माध्यमातून आपल्यात वावरत असतात,” अशा शब्दांत मृणाल कुलकर्णीने आपल्या भावना व्यक्त केल्या.
याप्रसंगी नाना आणि मृणालबरोबर डॉ. प्रकाश आमटे, डॉ. मंदाकिनी आमटे आणि राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे आदि मान्यवर उपस्थित होते. डॉ. प्रकाश आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांनी हा चित्रपट कसा बनणार याबद्दल आम्ही उत्सुक आहोत असे सांगून नाना आणि मृणाल ही भूमिका साकारणार असल्याचा आनंदही व्यक्त केला.

चित्रपटाच्या निमित्ताने मनसे आणि काँग्रेस एकत्र

cats चित्रपटाच्या निमित्ताने मनसे आणि काँग्रेस एकत्र



मनसे आणि काँग्रेस राजकारणात एकत्र नसले तरी चित्रपटासाठी दोघंही एकत्र येत आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहेत. या चित्रपटात केंद्रीय विज्ञानमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव रितेश देशमुख मुख्य भूमिका साकारणार आहेत. त्यामुळे राजकारणात विरोधक असणारे चित्रपटाच्या निमित्ताने मात्र एकत्र येत आहेत. निशिकांत कामत या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत, तर संगीत महाराष्ट्राचे लाडके संगीतकार अजय-अतुल यांचं असणार आहे. या चित्रपटाचे नाव अजून नक्की व्हायचं आहे आणि चित्रपटाची घोषणाही लवकरच होणार आहे. त्यामुळे राज ठाकरे यांचा चित्रपट नेमका कसा असणार हे अजून नक्की कळायचं आहे.

Thursday, July 5, 2012

निखळ मनोरंजन करणारा ‘योगायोग’

012 1024x682     निखळ मनोरंजन करणारा योगायोग

जे ठरवून किंवा सांगून घडत नाही, त्याला योगायोग म्हणतात. विनिता क्रिएशन्सची निर्मिती तसेच मिलिंद देविदास पाटील यांच्या एच. डी. मुव्हीजची प्रस्तुती असलेल्या ‘योगायोग’ या मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पहिले शेड्युल नुकतेच पूर्ण करण्यात आले.
‘योगायोग’ मध्ये अंकुश चौधरी मुख्य भूमिका साकारत आहे. त्याचबरोबर नेहमी वेगवेगळ्या भूमिका साकारणारा सिद्धार्थ जाधवही या चित्रपटात पुन्हा एकदा वेगळ्या भूमिकेत दिसणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या चर्चेत असलेली अभिनेत्री सिया पाटील या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. तसेच दीपक शिर्के, विजू खोटे, विकास समुद्रे, अंजली उजवणे, ज्योत्स्ना आदी कलाकारांच्या ‘योगायोग’मध्ये मुख्य भूमिका आहेत.
भरतराज यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होणाऱ्या या चित्रपटात रसिकांना मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज मिळणार आहे. प्रशांत शिंदे या चित्रपटाचे दुसरे दिग्दर्शक आहेत. बी. राज या चित्रपटाचे लेखक आहेत तर साईदास यांची पटकथा आहे. सुप्रसिद्ध लेखक शिरीष लाटकर यांनी या चित्रपटाचे संवाद लिहिले आहेत. जाफर सागर यांच्या गीतरचना असून चिनार-महेश ही मराठीतील आघाडीची संगीतकार द्वयी स्वरसाज चढवणार आहे. कमलेश मौर्या या चित्रपटाचे कार्यकारी निर्माता आहेत तर शेखर नागवेकर प्रॉडक्शन डिझायनर आहेत. सुंदर शेट्टी संकलनाची बाजू सांभाळणार आहेत तर क्रिएटिव्ह हेड साजना सरगम आहेत. ‘योगायोग’च्या निमित्ताने दक्षिणेकडील सुप्रसिद्ध कॅमेरामन रामजी यांच्या कॅमेऱ्यातून महाबळेश्वर मधील निसर्गसौंदर्य पाहण्याची संधी मराठी रसिकांना मिळणार आहे.
सात दिवसांच्या पहिल्या शेड्युलमध्ये या चित्रपटाचे आऊटडोअर तसेच काही इनडोअर चित्रीकरण पूर्ण करण्यात आले. आपल्या जुन्या आठवणींमध्ये रमलेल्या एका तरुणीची ही कथा आहे. कॉमेडी, अॅक्शन, रोमान्स, इमोशन आणि गीत-संगीताचा बहारदार नजराणा ‘योगायोग’च्या निमित्ताने रसिकांसमोर सादर करण्याचा भरतराज यांचा मानस आहे.
लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या दुसऱ्या शेड्युलची सुरुवात होणार असून या चित्रपटाद्वारे एक नवे व्यावसायिक गणित मांडताना रसिकांसमोर उत्तम कलाकृती सादर करण्याचा निर्माते-दिग्दर्शकांचा मानस आहे. प्रत्येकाने योगायोगाची जादू आपल्या आयुष्यात कधी ना कधी अनुभवली असेलच. आता ही जादू या चित्रपटाच्या निमित्ताने रुपेरी पडद्यावरही अनुभवायला मिळणार आहे. आजच्या युगात आपले दुःख विसरायला लावून रसिकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या सिनेमांची आवश्यकता आहे. ‘योगायोग’ या व्याखेत अगदी फिट बसत असल्याने इतरांपेक्षा वेगळा मसाला यात पाहायला मिळेल.

Tuesday, July 3, 2012

सत्यशोधक : एक प्रांजळ नाट्यानुभव

पुणे महानगरपालिका कामगार युनियनच्या सफाई कामगारांना घेऊन अतुल पेठे यांनी गो.पु.देशपांडे यांच्या ‘सत्यशोधक’ या नाटकाचा अत्यंत रेखीव प्रयोग पेश केला आहे. रंगभूमीच्या मुख्य धारेपासून आजवर शतयोजने दूर असलेले कामगार निर्भीडपणे रंगमंचावर उभे राहण्याला ऐतिहासिक महत्त्व आहे. गो. पु . देशपांडे हे देखील असं म्हणाले की ज्योतीराव फुले यांचे चरित्रनाटय सादर करण्यासाठी श्रमिक वर्ग पुढे झाला हे राजकियीकरण एकविसाव्या शतकातील आधुनिक मराठी प्रेक्षकाला, कदाचित एकंदरीत भारतालाही नवे आहे.
दोन वर्षांपूर्वी जालन्यातल्या जांबसमर्थ या दूरच्या गावातल्या कलावंतांना घेऊन नाटक केल्यानंतर पेठेंनी शहरातला कामगार वर्गच निवडला. त्यांनी नाटकाचा अनुभव नसलेल्यांकडूनही गुणवत्तेची किमान रेषा ओलांडणारं काम करवून घेतलं आहे. गो. पु. देशपांडेंचं हे सुमारे वीस वर्षांपूर्वीचं नाटक आहे. महात्मा फुले यांचं चरित्रनाट्य असं त्याचं ढोबळमानाने वर्णन करता येईल. मात्र त्यात जन्मापासून मृत्यूपर्यंतचा प्रवास नसून फुले चरित्रातला आपल्याला हवा तो भाग निवडून त्याची फेरमांडणी केलेली आहे. भारतीय समाजात फुले यांचं चरित्र पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज निर्माण होते आणि आज तर ती वीस वर्षांपूर्वीपेक्षाही अधिक आहे. भारतीय समाज जात, वर्ण यात कायम विभागलेला आहे. अगदी आज एकविसाव्या शतकातही तीच परिस्थिती आहे. त्यामुळे फुले यांनी केलेला ब्राह्मण आणि ब्राह्मण्य यातला फरक, शुद्रातिशुद्राची व्याख्या आणि स्त्रीदास्यांतकाचा केलेला विचार यांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे.
हे चरित्रनाट्य असूनही त्याचा गाभा विचारप्रधान आहे. यातील पात्रं व्यक्तिरेखा म्हणून नाही, तर विचार म्हणून येतात. त्यामुळे ऐतिहासिक व्यक्तीचं दिसणं, त्यांची स्वभाववैशिष्ट्य, लकबी यांच्या फंदात कोणी पडत नाही. नाटकाची संवादरचनाही तशीच असून सर्व कलावंत तिला काटेकोरपणा सांभाळतात. संगीताचा भाग श्रवणीय झाला आहे आणि कलावंतही तो मनापासून सादर करतात. वादकांचा वाटाही लक्षणीय आहे. यातल्या दृश्य भागाला उठाव येण्यासाठी प्रदीप वैद्य यांनी केलेली प्रकाशयोजना नाटकाला छायाचित्रात्मक पोत प्राप्त करवून देते आणि फोटो अल्बम बघितल्यासारखे एकामागून एक प्रसंग उलगडत जातात.
महात्मा फुलेंची भूमिका ओंकार गोवर्धन याने प्रभावी केली आहे. विशेष करून वैचारिक भाग त्याने उत्तमरितीने पोहोचवला आहे. पर्ण पेठेनेही सावित्री बाई तितक्याच प्रभावीपणे साकारल्या आहेत. हे दोन्ही कलावंत गुणी असले तरी त्यांच्या जागी कामगार कलावंतंच असते तर नाटकाचा पोत अधिक रांगडा झाला असता. तरी एक मात्र नक्की की सगळ्यांनी एक थेट भिडणारा प्रांजळ नाट्यानुभव मराठी प्रेक्षकांसमोर ठेवला आहे. श्रमिकांना घेऊन नाटक करण्याची कल्पना अतुल पेठे यांची असून, ते नाटक महात्मा फुले यांच्यावरच असावं ही कल्पनाही त्यांचीच असल्यामुळे या योजकतेचं किंवा गो. पु. देशपांडे म्हणतात त्या नवेपणाचं श्रेय पेठेंना द्यायला हवं.

Monday, July 2, 2012

श्वेता शिंदे कमबॅकसाठी उत्सुक.

Shweta Shinde, Marathi Actress


नाटक, मालिका, चित्रपट आणि नृत्यामध्ये स्वतःचा वेगळा ठसा उमटवणार्‍या श्वेताला रुपेरी पडदा पुन्हा खुणवू लागला आहे. अभिनेत्री अर्थात सुपरमॉम श्वेता शिंदे कमबॅकसाठी उत्सुक आहे. पुनरागमन करताना श्वेताला पुर्वीपेक्षा काहीतरी वेगळ्या आणि हटके भूमिका किंवा एखादी ऐतिहासिक भूमिका करण्याची इच्छा आहे. 
परखड व्यक्तीरेखांसोबतच कॉमेडी व्यक्तीरेखा साकारण्यातही हातखंडा असणार्‍या श्वेताने प्रेक्षकांना पोटधरुन हसायला भाग पाडले होते. प्रेक्षकांची पोचपावती मिळाळ्यामुळेच या सुपर मॉमने ही कमबॅकची जय्यत तयारी केली आहे. श्वेता सांगते की, भूमिका कुटह्लीही असो त्यामध्ये कलाकाराने समरस व्हायला पाहिजे. तेव्हाच ती भूमिका प्रेक्षकांच्या कायम आठवणीत राहते, अशा प्रकारच्या भूमिका मला आताच्या नव्या प्रवासातही साकारायच्या आहेत. विनोदी भूमिका करणे त्यातून प्रेक्षकांना हसवणं फारच कठिण असले तरी त्या मला जमतात, मला लोकांना हसवायला आवडते. 

किरण शांताराम यांचा कर्तृत्व गौरव सोहळा

8 1024x682 किरण शांताराम यांचा कर्तृत्व गौरव सोहळा

व्ही. शांताराम फाऊंडेशन, प्रभात चित्र मंडळ, एशियन फिल्म फाऊंडेशन अशा अनेक संस्थांचे अध्यक्ष, तसेच चित्रपट निर्माते-दिग्दर्शक किरण व्ही. शांताराम यांच्या सत्तराव्या वाढदिवसानिमित्त प्रभात चित्रमंडळाच्या वतीने त्यांचा कर्तृत्व गौरव सोहळा अयोजित करण्यात आला होता. ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांच्या हस्ते मुंबईत किरण शांताराम यांचा सत्कार करण्यात आला. या सोहळ्यास किरण शांताराम यांच्या पत्नी ज्योती शांताराम, प्रभात चित्रमंडळाचे सुधीर नांदगावकर, ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ.जब्बार पटेल, निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता सचिन पिळगांवकर, गोविंद निहलानी, अशोक सराफ, सुलोचना दिदी, सतीश शहा आदि मान्यवर उपस्थित होते. या हृद्य सोहळ्याचं सूत्र संचालन प्रभात चित्रमंडळाचे सरचिटणीस संतोष पाठारे यांनी केले.
निर्माता-दिग्दर्शक-अभिनेते व्ही. शांताराम यांनी भारतीय चित्रपटसृष्टीसाठी अनन्यसाधारण कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याचा वारसा किरणजींनीही पुढे जपला आणि वाढवलाही. याप्रसंगी सचिन पिळगांवकर यांनी किरणजींची निर्मिती असलेल्या ‘अशीही बनवाबनवी’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानच्या आठवणी सांगितल्या. श्याम बेनेगल यांनी किरण शांताराम आणि प्रभात चित्रमंडळाच्या कार्याचे कौतुक केले. मराठी चित्रपट सृष्टीचा दर्जा उंचावत असून त्यासाठी प्रभात चित्र मंडळाचे योगदान खूप महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले. डॉ.जब्बार पटेल यांनीही राजकमल स्टुडिओ, शांताराम अण्णांबरोबर काम करताना आलेले अनुभव, मंगेश देसाई आणि किरण शांताराम यांची त्यांना मिळालेली सोबत अशा अनेक आठवणींना उजाळा दिला. सत्काराला उत्तर देताना किरण शांताराम यांनी सर्वांचे आभार मानले. त्यांनी जीवनात आलेले चढ उतार आणि आपल्या वडिलांच्या आठवणीही सांगितल्या. तसेच चित्रपट सृष्टीची सेवा करण्यासाठी शांताराम घराण्याची पुढची पिढीही कटिबद्ध असल्याची ग्वाहीही दिली. संतोष पाठारे यांनी आभार प्रदर्शन केले.
राजकमल स्टुडिओ, प्लाझा चित्रपटगृह, व्ही. शांताराम प्रॉडक्शन्स, प्रभात चित्रमंडळ, एशियन फिल्म फाऊंडेशन, फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया अशा अनेक संस्थांच्या माध्यमातून किरण शांताराम चित्रपटसृष्टीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांच्या या कार्याचं कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Sunday, July 1, 2012

ऐक : आगामी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट

2 X 10 1024x682   ऐक : आगामी सस्पेन्स थ्रिलर चित्रपट

‘मातृभूमी प्रॉडक्शन्स’ आणि ‘कटिंग चाय प्रॉडक्शन्स’ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘ऐक’ या मराठी चित्रपटाची निर्मिती झाली असून जुलै मध्ये हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. ‘ऐक’ची निर्मिती प्रदीप गर्ग यांची असून चित्रपटाचे दिग्दर्शन प्रतिक कदम यांनी केले आहे.
मराठीत ज्या प्रमाणात विनोदी आणि कौटुंबिक चित्रपटांची निर्मिती झाली, त्या प्रमाणात रहस्यमय भयपटांची निर्मिती झाली नाही. असे फार मोजके चित्रपट आहेत. प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेणारं कथानक, क्षणोक्षणी गडद होत जाणारं रहस्य, थक्क करणाऱ्या तांत्रिक कौशल्याची भक्कम तटबंदी आणि सफाईदार अभिनय-दिग्दर्शनाची जोड असेल तर नक्कीच दर्जेदार कलाकृती निर्माण होते. भय, रहस्य, उत्कंठा यांनी खिळवून ठेवणारा ‘ऐक’ हा असाच एक सस्पेन्स थ्रिलर चित्रपट आहे.
या चित्रपटाची कथा, पटकथा तसेच संवाद जन्मेजय पाटील व स्वप्निल जाधव यांनी लिहिले असून गीते जन्मेजय पाटील यांचीच आहेत. ‘ऐक’ चित्रपटाचे संगीत राजेश सावंत यांनी दिले असून ते कथानकाला अधिक गहिरं करणारं आहे. चित्रपटातील गीते स्वप्निल बांदोडकर, नेहा राजपाल, सुमित्रा अय्यर, राजेश सावंत, श्रुती सावंत या गायकांनी गायली आहेत. नृत्य दिग्दर्शन दिलीप मेस्त्री यांनी केले असून साहस दृश्ये स्टंट मास्टर हनीफ शेख यांच्या मार्गदर्शनाखाली चित्रित झाली आहेत. पार्श्व संगीत महेश नाईक यांचे असून कला दिग्दर्शन महेंद्र राऊत यांचे आहे. संकलन हर्षद वैती यांचे आहे तर छायाचित्रण अनिकेत के. यांनी केले आहे.
या चित्रपटात स्वप्निल जाधव, आदिती सारंगधर, प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, सुहास पळशीकर, शेखर फडके, भूषण घाडी, प्रशांत नेमण, हृषिकेश गुजर, मौसमी हडकर, पूनम जाधव, शिल्पा कांबळे, बाल कलाकार स्वरांगी करंदीकर, तनिष सोनावणे या कलाकारांच्या भूमिका आहेत. ‘ऐक’ या चित्रपटाची कथा एका रचलेल्या खेळाची, अकल्पित मानवी सावल्यांची आहे. चित्रपट नायक ऋषी, त्याची पत्नी आदिती आणि मुलगा विवान या त्रिकोणी कुटुंबावर आधारित आहे. एका चॅनेलसाठी काम करणारा ऋषी त्याचा बॉस सॅंडीबरोबर एक हॉरर शो करण्याचे ठरवतो. स्पर्धकांसाठी रचलेल्या या खेळाचा डाव ऋषीच्या वैयक्तिक आयुष्यात थरार उडवून देतो. अमानवी सावल्यांचे भास, आभास, भीती, प्रेम, आक्रोश, विश्वास यांचा संमिश्र अनुभव देणारा भयपट म्हणजे ‘ऐक’ हा चित्रपट येत्या १३ जुलैला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होत आहे.