स्त्रीच्या हृदयाव्यतिरिक्त शरीराच्या इतर अवयवांनाही अस्तित्व असतं; हे अवयव तिच्या भावविश्वाशी कसे आणि किती खोलवर निगडीत असू शकतात, याचं अनोखं प्रत्यंतर या कथा वाचताना येतं. स्त्रीला नेहमी गृहीत धरणारा, तिचं स्वतंत्र व्यक्तिमत्व नाकारणारा समाज तसेच तिची घुसमटही या कथांमध्ये स्पष्टपणे अधोरेखित झाली आहे. स्त्रीच्या नैसर्गिक उर्मी, संवेदना, चेतना कायम बाजूला सारून तिला एक चौकटबद्ध दुय्यम आयुष्य जगायला भाग पडणारी समाजाची मानसिकता या कथांमधून सतत जाणवत राहते. स्वतःच्या निखळ अभिव्यक्तीसाठी धडपडणारी आणि स्वतःच्या शरीराशी तादाम्य साधत, आपल्या बरोबरच्या इतर स्त्रियांना समजून घेण्याचा प्रयत्न करत, त्यांनाही जगण्याचा वेगळा मंत्र देत समाजव्यवस्थेच्या विरोधात उभं राहण्याचा प्रयत्न करणारी या कथांमधली प्रत्येक तेजस्विनी नायिका वाचकाला विचार करायला लावते.
मनोविकास प्रकाशनाच्या ‘भारतीय लेखिका’ या मालिकेतील हे पुस्तक आहे. यातील कथा देहाशी निगडीत असून, देहापल्याड घेऊन जाणाऱ्या आहेत. देहापल्याड जाऊन स्त्रीच्या अस्तित्वाचा एक व्यक्ती म्हणून शोध घेणाऱ्या या कथा आहेत. एक वेगळं जग या कथांमधून बाहेर येतं. अनुवाद सरस असून मराठीशी एकजीव झालेल्या या कथा आहेत, हे जाणवते.
No comments:
Post a Comment