सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी पुण्यात ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘हिरकणी ट्रस्ट’च्या उद्घाटन समारंभाचा पहिलाच कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मराठी चित्रपटांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांची कामगिरी ऑडिओ व्हिज्युअल्सच्या रूपात यावेळी दाखवण्यात आली. या कलाकारांमध्ये माधव वझे, गिरीश कुलकर्णी, आनंद भाटे, अमित फाळके, मिताली जगताप, विवेक वाघ, निलेश नवलखा, अश्विन चितळे, अविनाश देशपांडे, राजेश पिंजानी, वीरेंद्र वळसंगकर , सुजय डहाके यांचा समावेश होता. गिरीश कुलकर्णी, आनंद भाटे, अमित फाळके, मिताली जगताप, निलेश नवलखा आणि अमित वझे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. गिरीश कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले की चित्रपटात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही कलाकाराला पुरस्कार मिळणं हे त्या एकट्या व्यक्तीचं नाही तर ते सगळ्या टीम चं यश आहे. आनंद भाटे यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटातील ‘चिन्मया सकला हृदया’ हे पद सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मनसेच्या महाराष्ट्र महिला सेनेच्या उपाध्यक्षा रीटा गुप्ता यांच्या हस्ते ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’चे उद्घाटन करण्यात आले. गणेश ढापले, मधुकर सणस आणि हिरकणीच्या संस्थापक दीपा सणस यावेळी उपस्थित होत्या.
Monday, April 23, 2012
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी पुण्यात ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे
सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात भरीव काम करण्यासाठी पुण्यात ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’ ची स्थापना करण्यात आली आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात ‘हिरकणी ट्रस्ट’च्या उद्घाटन समारंभाचा पहिलाच कार्यक्रम भव्यदिव्य स्वरूपात संपन्न झाला. राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. मराठी चित्रपटांसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या कलाकारांची कामगिरी ऑडिओ व्हिज्युअल्सच्या रूपात यावेळी दाखवण्यात आली. या कलाकारांमध्ये माधव वझे, गिरीश कुलकर्णी, आनंद भाटे, अमित फाळके, मिताली जगताप, विवेक वाघ, निलेश नवलखा, अश्विन चितळे, अविनाश देशपांडे, राजेश पिंजानी, वीरेंद्र वळसंगकर , सुजय डहाके यांचा समावेश होता. गिरीश कुलकर्णी, आनंद भाटे, अमित फाळके, मिताली जगताप, निलेश नवलखा आणि अमित वझे यांनी आपले मनोगत व्यक्त केलं. गिरीश कुलकर्णी यांनी मत व्यक्त केले की चित्रपटात समाविष्ट असणाऱ्या कोणत्याही कलाकाराला पुरस्कार मिळणं हे त्या एकट्या व्यक्तीचं नाही तर ते सगळ्या टीम चं यश आहे. आनंद भाटे यांनी ‘बालगंधर्व’ चित्रपटातील ‘चिन्मया सकला हृदया’ हे पद सादर करून उपस्थितांची मने जिंकली. मनसेच्या महाराष्ट्र महिला सेनेच्या उपाध्यक्षा रीटा गुप्ता यांच्या हस्ते ‘हिरकणी चारिटेबल ट्रस्ट’चे उद्घाटन करण्यात आले. गणेश ढापले, मधुकर सणस आणि हिरकणीच्या संस्थापक दीपा सणस यावेळी उपस्थित होत्या.
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment