Monday, April 16, 2012

'फक्त तुझी साथ हवीय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

एक सर्वसाधारण घरातल्या घरातल्या मुलीच्या आयुष्यात प्रचंड पैसा, सुबत्ता आल्यावरही तीच्या वर्तणुकीत बदल होत नाही, तिची ध्येय, निष्ठा तसूभरही ढळत नाही. असाच काहीसा आशय आहे 'फक्त तुझी साथ हवीय' या आगामी नाटकात.

एका मुलीच्या आयुष्यात येणार्‍या प्रेमाची गोष्ट आणि संस्काराचे महत्त्व अधोरेखित करणारी ही नाटय़कृती, निर्माती अनुराधा वाघ त्यांच्या 'आशय प्रॉडक्शन' द्वारे घेऊन येत आहेत. 

'मी रेवती देशपांडे' आणि 'सुखांशी भांडतो आम्ही' या नाटकाचे दिग्दर्शक कुमार सोहनी हे या नाटकाचे दिग्दर्शन करीत असून प्रकाशयोजनासुद्ध त्यांची आहे. नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून वेषभुषा महेश शेरला यांची आहे तर रंगभूषा शशी सकपाळ यांची आहे. अशोक पत्की यांच संगीत असून महेश कांबळे यांनी सूत्रधाराची भूमिका बजावली आहे. प्रसिद्ध अभिनेता अशोक समेळ, तेजश्री प्रधान, आशिष कुलकर्णी, उपेंद्र दाते, राजन जोशी, सरिता पुजारी, राजेश साळवी, स्वप्निल फडके आणि रत्नाकर देशपांडे इत्यादी कलकारांचा दमदार अभिनय पहायला मिळणार आहे.

कौटुंबिक विषय असणारे 'फक्त तुझी साथ हवीय' हे नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

No comments:

Post a Comment