अश्वमी व अद्वैत थिएटर्स निर्मित ‘टॉम आणि जेरी’ हे एका वेगळ्याच वळणाचं नाटक रंगभूमीवर साकारत आहे. आजच्या घड्याळाच्या सेकंदावर धावणारी माणसे, त्यांच्या न संपणा-या महत्वाकांक्षा, स्वत:बद्दल असलेला स्वाभिमान, आणि त्यातून उद्भवलेला आत्मकेंद्री स्वभाव हे सध्याच्या पिढीचं समीकरण बनलं आहे. जगण्यासाठी महत्वाकांक्षेपेक्षाही नाती महत्वाची असतात, कारण या नात्यातून मिळणा-या प्रेमातूनच आपल्या आयुष्यात स्थैर्य येत असतं. पैसा आणि यशाची धुंदी नात्यांच्या मर्यादेत राहूनच नियंत्रित राहू शकते.
आज कामानिमित्त अनेकजण आपली माणसं सोडून, टार्गेट पूर्ण करता यावं यासाठी परदेशात जाऊन राहतात. पण नवरा बायकोच्या नात्यांमध्ये असा प्रसंग येऊन, नुकताच सुरु झालेला संसार या कामाच्या रगाड्यात पुरता होरपळून निघतो. नवरा एका देशात तर बायको दुस-या देशात अशी परिस्थिती असताना मग संपर्क काय तो मोबाईलसारख्या कृत्रिम यंत्रांच्या माध्यमातूनच. थोड्या दिवसाचं ठीक आहे पण ‘आपण ज्याच्याशी संपर्क ठेऊन आपलं नात टिकावं यासाठी प्रयत्न करतोय ते नातं आधी परिपक्व तरी आहे का?’ असा प्रश्न दोघांच्या मनात निर्माण होतो आणि मग सुरु होते सहन न होणारी चलबिचल, चिडचिड आणि अनियंत्रित संभाषण. पण मग या अशा शारिरिकच नाही तर मानसिक नात्यातलं अंतर जास्त असताना ते जवळ यावं किंवा त्याचा सोक्षमोक्ष लावावा या एका समान मुद्द्यावर होणारी दोघांची भेट आणि त्या नात्याचे ठरणारे भविष्य. अशा वास्तव परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य करणारी कथा असलेले हे नाटक आहे.
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रमुख भूमिका अशी चतुरस्त्र जबाबदारी अत्यंत गुणवान रंगकर्मी निखिल रत्नपारखी यांनी निभावली आहे. यापूर्वी ‘साठेचं काय करायचं?’, ‘मसाज’ यांसारख्या नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला आहे. कादंबरी कदम हिनेदेखील आपल्या सरस अभिनयाचे कसब नायकाच्या पत्नीच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. मिलिंद जोशी यांचे पार्श्वसंगीत, शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, गीता गोडबोले यांची वेशभूषा अशोक राऊत यांची रंगभूषा या सर्व रसायनातून हे नाटक सगळ्याच बाबतीत दर्जेदार ठरत आहे. केवळ दोनच पात्रांच्या ताकदीच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कमाल तर या नाटकाने नक्कीच केली आहे…
आज कामानिमित्त अनेकजण आपली माणसं सोडून, टार्गेट पूर्ण करता यावं यासाठी परदेशात जाऊन राहतात. पण नवरा बायकोच्या नात्यांमध्ये असा प्रसंग येऊन, नुकताच सुरु झालेला संसार या कामाच्या रगाड्यात पुरता होरपळून निघतो. नवरा एका देशात तर बायको दुस-या देशात अशी परिस्थिती असताना मग संपर्क काय तो मोबाईलसारख्या कृत्रिम यंत्रांच्या माध्यमातूनच. थोड्या दिवसाचं ठीक आहे पण ‘आपण ज्याच्याशी संपर्क ठेऊन आपलं नात टिकावं यासाठी प्रयत्न करतोय ते नातं आधी परिपक्व तरी आहे का?’ असा प्रश्न दोघांच्या मनात निर्माण होतो आणि मग सुरु होते सहन न होणारी चलबिचल, चिडचिड आणि अनियंत्रित संभाषण. पण मग या अशा शारिरिकच नाही तर मानसिक नात्यातलं अंतर जास्त असताना ते जवळ यावं किंवा त्याचा सोक्षमोक्ष लावावा या एका समान मुद्द्यावर होणारी दोघांची भेट आणि त्या नात्याचे ठरणारे भविष्य. अशा वास्तव परिस्थितीवर मोकळेपणाने भाष्य करणारी कथा असलेले हे नाटक आहे.
लेखन, दिग्दर्शन, नेपथ्य आणि प्रमुख भूमिका अशी चतुरस्त्र जबाबदारी अत्यंत गुणवान रंगकर्मी निखिल रत्नपारखी यांनी निभावली आहे. यापूर्वी ‘साठेचं काय करायचं?’, ‘मसाज’ यांसारख्या नाटकांतून त्यांच्या अभिनयाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला आहे. कादंबरी कदम हिनेदेखील आपल्या सरस अभिनयाचे कसब नायकाच्या पत्नीच्या भूमिकेतून दाखवून दिले आहे. मिलिंद जोशी यांचे पार्श्वसंगीत, शीतल तळपदे यांची प्रकाश योजना, गीता गोडबोले यांची वेशभूषा अशोक राऊत यांची रंगभूषा या सर्व रसायनातून हे नाटक सगळ्याच बाबतीत दर्जेदार ठरत आहे. केवळ दोनच पात्रांच्या ताकदीच्या अभिनयाने प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची कमाल तर या नाटकाने नक्कीच केली आहे…
No comments:
Post a Comment