या चित्रपटाची कथा राजेश बामुगडे यांनी लिहीली असून पटकथा, संवाद व गीते ही त्यांनीच लिहिले आहेत. चित्रपटाची सहनिर्मिती राजेश वधावन, निवेदिता परब क्रास्टो यांनी केली आहे. संगीतकार अविनाश- विश्वजीत जोडीने संगीत दिलेल्या यातील गीतांना आनंद शिंदे, वैशाली सामंत, राहुल सक्सेना, मैथिली पानसे-जोशी आणि चिंतामणी सोहोनी या गायकांचा स्वर लाभला आहे. नृत्यदिग्दर्शक उमेश जाधव, नरेंद्र पंडीत आणि विश्वास नाटेकर या तिघांच्या अफलातून नृत्यशैलीतून साकारलेली नृत्ये या चित्रपटात प्रेक्षकांना पहायला मिळणार आहेत. चित्रपटाचे छायाचित्रण संजय खानझोडे यांचे असून कलादिग्दर्शन गिरीश कोळपकर यांचे आहे.
विजय पाटकर, हेमलता बाणे, विजय कदम, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर, कमलाकर सातपुते, किशोरी अंबिये, अर्चना पाटकर, जयंत सवरकर, राजन ताम्हाणे, जयराज नायर, अनंता कारेकर, राजेश बामगुडे, सुनील होळकर, किशोर रावराणे, प्रकाश पवार, श्रद्धा निगवेकर, शितल कोल्हापुरे, आशुतोष वाडेकर, प्रशांत तपस्वी, भरत चावले, राज पाटील आदी कलाकारांच्या यात महत्त्वाच्या भूमिका असून पाहुण्या भूमिकेत मनोज जोशी व निशा परुळेकर आहेत.
No comments:
Post a Comment