या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. चित्रपटाची कथा व पटकथा अनिरुद्ध पोतदार यांनी लिहिली असून संवाद संजय पवार यांचे आहेत.
चित्रपटाला अजय- अतुल यांचे संगीत असून गीते गुरु ठाकुर आणि संदीप खरे यांनी लिहिली आहेत. मकरंद अनासपुरे, सुबोध भावे, जितेंद्र जोशी, कुलदीप पवार, डॉ. मोहन आगाशे, ऋषिकेश जोशी, मिता सावरकर, स्मिता तळवळकर, उज्वला जोग, शुभांगी लाटकर, तेजश्री खेळे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे नव्वद टक्के चित्रीकरण कोल्हपुरात होणार असून हा चित्रपट १० ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.
No comments:
Post a Comment