केंद्र सरकारने वीस वर्षांपूर्वी मंडल आयोग लागू करण्याचा निर्णय घेतल्यावर देशभर आरक्षणावरून आगडोंब उसळला होता आणि त्यानिमित्ताने जातीयवादावरच्या चर्चेत सर्वांचे पवित्रे उघड होत होते. तेव्हाची राजकीय-सामाजिक परिस्थिती स्फोटक होती. अशावेळी नव्वदोत्तरी नाटकांच्या आगमनातील पहिल्या फळीत ‘कोण म्हणतं टक्का दिला?’ रंगभूमीवर आलं. नव्वदोत्तरी नाटकांनी मराठी रंगभूमीवर मोठ्या प्रमाणावर भोवतालच्या अस्थिर सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवरची थेट प्रतिक्रिया नाटयरुपाने मांडली. यात मंडल आयोगाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीवरचं दंभस्फोट करणारं नाटक होतं,’टक्का.’
आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या आदेशाचं पालन करणं आराध्ये कुटुंबालाही भाग पडतं आणि त्यांच्या घरात कचऱ्या धीवार हा तरुण येतो.
आपल्याला माहीत आहे की असा कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही. संजय पवार एक काल्पनिक सिच्युएशन तयार करून आपल्यासमोर ठेवतात. ती देखील आदर्श अशी. राष्ट्रात एकात्मता निर्माण व्हावी असं कोणाला वाटणार नाही ? मग अशा परिस्थितीत खरंच ती आणण्यासाठी कार्यक्रम राबवला गेला तर माणसं कशी वागतील ? नागर मराठी प्रेक्षक असलेल्या मध्यम, उच्च मध्यमवर्गीय समाजाला पेचात पकडण्याचा डाव नाटककार इथे हुशारीने खेळतो. त्यासाठी त्याने या विषयाला पूरक असे जे कच-देवयानीचं रूप वापरलं आहे तेही हिंदू पुराणकथांमधलं. त्यातील देवयानी कचाला शाप देते की तू विसाव्या शतकाच्या अखेरीस भूतलावर मागासवर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात जन्म घ्यायला लागेल.
एक कचऱ्या सोडला तर नाटकातील सर्व पात्रं उच्चवर्णीय आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यात कचऱ्याचा दगडाचा देव आपल्या देव्हाऱ्यात मांडायला विरोध करणाऱ्या मिसेस आराध्ये आहेत. तुमच्या वरच्या अन्यायाचे पाढे आणखी किती काळ वाचत राहणार असा सवाल कचऱ्याला करणारा, वेगवेगळ्या संस्कृतीनिष्ठ मुद्द्यांवर त्याच्याशी हुज्जत घालणारा त्यांचा मुलगा सुदर्शन आहे. आपल्या घरात आणलेल्या आदिवासी पोराकडे अँटिक पीस म्हणून बघणाऱ्या शेजारच्या घरातल्या मिसेस नाडकर्णी आहेत आणि त्याचवेळी संपूर्ण रॅशनल भूमिका स्वीकारून कचऱ्याच्या घरातल्या अस्तित्वाकडे बघणारे कमलाकर आराध्ये आणि त्यांची मुलगी सुकन्या हेही आहेत. या निमित्ताने वेगवेगळ्या आवरणाखाली आपल्या मनातली जातीयता लपवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसा करत राहतो हे दिसतं. कोणी जोशी कुटुंब मागासवर्गीय घरात आणावा लागू नये म्हणून आपण कुडमुडे जोशी असल्याचं सरकारला कळवतं, तर मिसेस आराध्ये मागासवर्गीयांची लिस्ट बघायला जाणाऱ्या सुकन्याला यादीतून पुरस्कारप्राप्त दलित लेखकाचा मुलगा निवडायला सांगते. नाटकात कचऱ्याचा प्रवेश तसा उशीराच होतो. पण त्यानंतरची त्याची जहाल टिप्पणी मात्र प्रत्येक प्रसंगानंतर भरतवाक्यासारखी मागे उरते, टोचत राहते. तो म्हणतो, “जन्मजात श्रेष्ठत्वाच्या लढाईत काही माणसांनी जन्मजात क्षुद्रपणा मान्य करायचा आणि जन्मजात श्रेष्ठांनी आपला ताठरपणा सोडलाय, हे शतकाच्या स्लो प्रोसेसमध्ये पाहत राहायचं. वर पुन्हा त्येंचंच कवतिक, ‘सुधारले बरं का, काही म्हणून मानत नाही.”
संजय पवारांच्या वैचारिक बैठकीतला हा थेटपणा व्यक्त करणारे तिखट संवाद हे या नाटकाचं बलस्थान आहे. आज वीस वर्षांनंतर पहिले काही संदर्भ जुने झाले आहेत. त्यामुळे पूर्वी बाबरी वादाच्या पार्श्वभूमीवर ‘देवावरनं घर मोडण्याइतकं अडानी नाय आपन’ या संवादातली जाणवणारी दाहकता आता कमी झाली आहे. अर्थात परिस्थिती स्फोटक राहत नाही तेव्हाच अशा नाटकांचा कस लागतो. ‘टक्का’ मधला राजकीय भाग आज तीव्र राहिला नसला तरी त्यातला सामाजिक आशय तसाच जिवंत आहे आणि तो मांडण्याची गरज आजही संपलेली नाही, हे लक्षात येतं.
अनिरुद्ध खुटवडने दिग्दर्शकीय मांडणीत नाटकाची दृश्यरचना सोपी ठेवून त्यातला संवादांत सामावलेला आशय उंचावण्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. अर्थात संवादांत बोचरेपणा अधिक असल्याने ते उच्चारणारे स्वर कठोर न होता, त्याला वितंडवादाचं स्वरूप न येता ते सहज आणि सॉफ्ट कसे होतील हेही पाहिलं आहे. सुदर्शन आणि कचऱ्या यांच्या दोन टोकाच्या पोझिशन्समधून भूमिकांमधील तीव्रता पकडली. नरेंद्र भिडेंच्या संगीताने आधीचा जाणीवपूर्वक स्वीकारलेला आघातीपणा नंतर क्रमशः कमी करत संगीत संवादी नोटपर्यंत नेऊन नाट्याशयाला हातभार लावला आहे.
उपेंद्र लिमयेचा कचऱ्या हा मुळातंच ऑथरबॅक आणि प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारा रोल आहे. तो साकारणाऱ्या नटाला गॅलरी प्लेईंगचा मोह होऊ शकतो. उपेंद्रच्या पहिल्या प्रवेशात जेव्हा कचऱ्याची घरात एन्ट्री होते, तो या मोहात पडतो की काय असं वाटलं कारण त्याचा स्वर जास्तच ठासून आणि एका शैलीदारपणे येऊ लागला. पण पुढच्या सीनपासून उपेंद्रने त्याचा नैसर्गिक आवाज पकडला आणि नाटकाचा तोल सावरला. त्याची भूमिका पुढे उंचावत गेली. अनिता दातेने अत्यंत सहजतेने आणि विश्वासाने सुकन्याचं मानवी असणं व्यक्त केलं. विचारी प्रेक्षकाचं नेतृत्व करणारी ही व्यक्तिरेखा आहे. अनिताने ती प्रभावीपणे निभावली. पद्मनाभ बिंडचा आवेशी सुदर्शन खूप पटणारा होता. वसंत अवसरीकरांचा धमाल शुक्राचार्य, शेखर नवरेंचा समंजस आविष्कार, विनिता पिंपळखरेंचं खोटं न वाटणारं लाडिक बोलणं यांचा प्रयोगाच्या रंगतीत वाटा होताच. संयोगिता भावेंच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेलाच मर्यादा असल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला.
नाटकाची निर्मिती सीमांत पुणेची असून, लेखक आहेत संजय पवार. नाटकाचं दिग्दर्शन अनिरुद्ध खुटवड यांनी केलं असून, नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचं आहे. नाटकाला पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांनी दिलं आहे. नाटकातील कलावंत आहेत – उपेंद्र लिमये, अनिता दाते, पद्मनाभ बिंड, शेखर नवरे, संयोगिता भावे, विनिता पिंपळखरे, वसंत अवसरीकर, अक्षया देवधर, अमर गायकवाड, मयूर निगडे, विघ्नेश जोशी.
आरक्षणाच्या सवलतींना पन्नास वर्षे झाल्यानंतर केंद्र सरकारने असा अध्यादेश काढला आहे की सवलतींमुळे समाज वर्णवर्गविरहित झाला असला तरी अजूनही एकात्मता साधली जाण्यासाठी प्रत्येक उच्चवर्णीय कुटुंबात एक मागासवर्गीय पुरुष अथवा स्त्री ठेवणे कायद्याने बंधनकारक आहे. या आदेशाचं पालन करणं आराध्ये कुटुंबालाही भाग पडतं आणि त्यांच्या घरात कचऱ्या धीवार हा तरुण येतो.
आपल्याला माहीत आहे की असा कोणताही आदेश सरकारने काढलेला नाही. संजय पवार एक काल्पनिक सिच्युएशन तयार करून आपल्यासमोर ठेवतात. ती देखील आदर्श अशी. राष्ट्रात एकात्मता निर्माण व्हावी असं कोणाला वाटणार नाही ? मग अशा परिस्थितीत खरंच ती आणण्यासाठी कार्यक्रम राबवला गेला तर माणसं कशी वागतील ? नागर मराठी प्रेक्षक असलेल्या मध्यम, उच्च मध्यमवर्गीय समाजाला पेचात पकडण्याचा डाव नाटककार इथे हुशारीने खेळतो. त्यासाठी त्याने या विषयाला पूरक असे जे कच-देवयानीचं रूप वापरलं आहे तेही हिंदू पुराणकथांमधलं. त्यातील देवयानी कचाला शाप देते की तू विसाव्या शतकाच्या अखेरीस भूतलावर मागासवर्गात जन्म घेशील आणि कायद्याने तुला सवर्णात जन्म घ्यायला लागेल.
एक कचऱ्या सोडला तर नाटकातील सर्व पात्रं उच्चवर्णीय आहेत आणि प्रत्येकाच्या वेगवेगळ्या भूमिका आहेत. यात कचऱ्याचा दगडाचा देव आपल्या देव्हाऱ्यात मांडायला विरोध करणाऱ्या मिसेस आराध्ये आहेत. तुमच्या वरच्या अन्यायाचे पाढे आणखी किती काळ वाचत राहणार असा सवाल कचऱ्याला करणारा, वेगवेगळ्या संस्कृतीनिष्ठ मुद्द्यांवर त्याच्याशी हुज्जत घालणारा त्यांचा मुलगा सुदर्शन आहे. आपल्या घरात आणलेल्या आदिवासी पोराकडे अँटिक पीस म्हणून बघणाऱ्या शेजारच्या घरातल्या मिसेस नाडकर्णी आहेत आणि त्याचवेळी संपूर्ण रॅशनल भूमिका स्वीकारून कचऱ्याच्या घरातल्या अस्तित्वाकडे बघणारे कमलाकर आराध्ये आणि त्यांची मुलगी सुकन्या हेही आहेत. या निमित्ताने वेगवेगळ्या आवरणाखाली आपल्या मनातली जातीयता लपवण्याचा प्रयत्न प्रत्येकजण कसा करत राहतो हे दिसतं. कोणी जोशी कुटुंब मागासवर्गीय घरात आणावा लागू नये म्हणून आपण कुडमुडे जोशी असल्याचं सरकारला कळवतं, तर मिसेस आराध्ये मागासवर्गीयांची लिस्ट बघायला जाणाऱ्या सुकन्याला यादीतून पुरस्कारप्राप्त दलित लेखकाचा मुलगा निवडायला सांगते. नाटकात कचऱ्याचा प्रवेश तसा उशीराच होतो. पण त्यानंतरची त्याची जहाल टिप्पणी मात्र प्रत्येक प्रसंगानंतर भरतवाक्यासारखी मागे उरते, टोचत राहते. तो म्हणतो, “जन्मजात श्रेष्ठत्वाच्या लढाईत काही माणसांनी जन्मजात क्षुद्रपणा मान्य करायचा आणि जन्मजात श्रेष्ठांनी आपला ताठरपणा सोडलाय, हे शतकाच्या स्लो प्रोसेसमध्ये पाहत राहायचं. वर पुन्हा त्येंचंच कवतिक, ‘सुधारले बरं का, काही म्हणून मानत नाही.”
संजय पवारांच्या वैचारिक बैठकीतला हा थेटपणा व्यक्त करणारे तिखट संवाद हे या नाटकाचं बलस्थान आहे. आज वीस वर्षांनंतर पहिले काही संदर्भ जुने झाले आहेत. त्यामुळे पूर्वी बाबरी वादाच्या पार्श्वभूमीवर ‘देवावरनं घर मोडण्याइतकं अडानी नाय आपन’ या संवादातली जाणवणारी दाहकता आता कमी झाली आहे. अर्थात परिस्थिती स्फोटक राहत नाही तेव्हाच अशा नाटकांचा कस लागतो. ‘टक्का’ मधला राजकीय भाग आज तीव्र राहिला नसला तरी त्यातला सामाजिक आशय तसाच जिवंत आहे आणि तो मांडण्याची गरज आजही संपलेली नाही, हे लक्षात येतं.
अनिरुद्ध खुटवडने दिग्दर्शकीय मांडणीत नाटकाची दृश्यरचना सोपी ठेवून त्यातला संवादांत सामावलेला आशय उंचावण्याकडे विशेष लक्ष दिलं आहे. अर्थात संवादांत बोचरेपणा अधिक असल्याने ते उच्चारणारे स्वर कठोर न होता, त्याला वितंडवादाचं स्वरूप न येता ते सहज आणि सॉफ्ट कसे होतील हेही पाहिलं आहे. सुदर्शन आणि कचऱ्या यांच्या दोन टोकाच्या पोझिशन्समधून भूमिकांमधील तीव्रता पकडली. नरेंद्र भिडेंच्या संगीताने आधीचा जाणीवपूर्वक स्वीकारलेला आघातीपणा नंतर क्रमशः कमी करत संगीत संवादी नोटपर्यंत नेऊन नाट्याशयाला हातभार लावला आहे.
उपेंद्र लिमयेचा कचऱ्या हा मुळातंच ऑथरबॅक आणि प्रेक्षकांच्या टाळ्या घेणारा रोल आहे. तो साकारणाऱ्या नटाला गॅलरी प्लेईंगचा मोह होऊ शकतो. उपेंद्रच्या पहिल्या प्रवेशात जेव्हा कचऱ्याची घरात एन्ट्री होते, तो या मोहात पडतो की काय असं वाटलं कारण त्याचा स्वर जास्तच ठासून आणि एका शैलीदारपणे येऊ लागला. पण पुढच्या सीनपासून उपेंद्रने त्याचा नैसर्गिक आवाज पकडला आणि नाटकाचा तोल सावरला. त्याची भूमिका पुढे उंचावत गेली. अनिता दातेने अत्यंत सहजतेने आणि विश्वासाने सुकन्याचं मानवी असणं व्यक्त केलं. विचारी प्रेक्षकाचं नेतृत्व करणारी ही व्यक्तिरेखा आहे. अनिताने ती प्रभावीपणे निभावली. पद्मनाभ बिंडचा आवेशी सुदर्शन खूप पटणारा होता. वसंत अवसरीकरांचा धमाल शुक्राचार्य, शेखर नवरेंचा समंजस आविष्कार, विनिता पिंपळखरेंचं खोटं न वाटणारं लाडिक बोलणं यांचा प्रयोगाच्या रंगतीत वाटा होताच. संयोगिता भावेंच्या वाट्याला आलेल्या व्यक्तिरेखेलाच मर्यादा असल्यामुळे त्यांचाही नाईलाज झाला.
नाटकाची निर्मिती सीमांत पुणेची असून, लेखक आहेत संजय पवार. नाटकाचं दिग्दर्शन अनिरुद्ध खुटवड यांनी केलं असून, नेपथ्य प्रसाद वालावलकर यांचं आहे. नाटकाला पार्श्वसंगीत नरेंद्र भिडे यांनी दिलं आहे. नाटकातील कलावंत आहेत – उपेंद्र लिमये, अनिता दाते, पद्मनाभ बिंड, शेखर नवरे, संयोगिता भावे, विनिता पिंपळखरे, वसंत अवसरीकर, अक्षया देवधर, अमर गायकवाड, मयूर निगडे, विघ्नेश जोशी.
No comments:
Post a Comment