चित्रपट म्हणला की नायकाबरोबरच खलनायकही आलाच. सत्तरच्या दशकात तर खलनायिकांचा ट्रेंड जोरदार सुरु होता. कधी नायिकेची सवत म्हणून खलनायिकेची एन्ट्री व्हायची तर कधी कॅब्रे डान्सर म्हणून आणि मग सिनेमाभर त्या तोऱ्यात वावरायच्या. काळ बदलला, सिनेमाचा चेहरामोहराही बदलला आणि खलनायिकांचं हे तुफानी वादळ स्मॉल स्क्रीनकडे वळलं. छोट्या पडद्यावर जेव्हा मालिका सुरु झाल्या तेव्हा त्यात खलनायिकांना फारसं स्थान नव्हतं. पण स्पर्धा जशी वाढत गेली तसा टीव्ही खरंच इडियट झाला आणि मालिकांमध्ये काहीही दाखवलं तरी प्रेक्षक ते बघतो हा चॅनेलवाल्यांचा विश्वास सार्थ ठरला. एकामागोमाग एक मालिका टीव्हीवर धडकू लागल्या ज्यात खलनायिकांना घुसवण्यात आलं आणि सुरु झाले वेगवेगळे ट्रेंड. कधी प्रेमकथा, कधी सामाजिक विषय तर कधी तरुणाईचे विषय असे ट्रेन्डचे प्रवाह वाहू लागले ज्यात खलनायिकांनी जबरदस्त एन्ट्री घेतली.
सुरुवातीच्या काही मालिकांमध्ये सुंदर दिसणाऱ्या, उत्तम पेहराव केलेल्या, कपाळावर छानशी नागमोडी टिकली लावलेल्या खलनायिका बघण्यातही आनंद वाटायचा. नंतर मात्र भरजरी साड्या नेसणाऱ्या नायिकांचं रूप बदललं पण सध्या वेशातल्या खलनायिका जास्त आक्रमक होऊ लागल्या. हळूहळू हिंदीतला हा ट्रेंड मराठीतही सरकला आणि मराठी मालिकेत क्वचितच दिसणाऱ्या खलनायिकेची जागा एकापेक्षा जास्त खलनायिकांनी सहजच घेतली. स्त्रीचं दुःख स्त्रीलाच कळतं हे आपण वारंवार ऐकतो पण मालिकेतल्या खलनायिका मात्र फक्त नायिकांनाच टारगेट करताना दिसतात. नायिकेपुढे सतत दुःखाचा डोंगर उभा असतो जो खलनायिकाच रचत असते .
आता ही खलनायिकांची साखळी वाढतच चालली आहे. मालिकांच्या वाढत्या जाळ्याबरोबर खलनायिकांची संख्याही वाढत जाईल हे निर्विवादपणे सिद्ध झालंय. सतत कटकारस्थान, कुरघोडी करणाऱ्या खलनायिकांना कदाचित नायिकेचा दर्जा प्राप्त होणार, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.
सुरुवातीच्या काही मालिकांमध्ये सुंदर दिसणाऱ्या, उत्तम पेहराव केलेल्या, कपाळावर छानशी नागमोडी टिकली लावलेल्या खलनायिका बघण्यातही आनंद वाटायचा. नंतर मात्र भरजरी साड्या नेसणाऱ्या नायिकांचं रूप बदललं पण सध्या वेशातल्या खलनायिका जास्त आक्रमक होऊ लागल्या. हळूहळू हिंदीतला हा ट्रेंड मराठीतही सरकला आणि मराठी मालिकेत क्वचितच दिसणाऱ्या खलनायिकेची जागा एकापेक्षा जास्त खलनायिकांनी सहजच घेतली. स्त्रीचं दुःख स्त्रीलाच कळतं हे आपण वारंवार ऐकतो पण मालिकेतल्या खलनायिका मात्र फक्त नायिकांनाच टारगेट करताना दिसतात. नायिकेपुढे सतत दुःखाचा डोंगर उभा असतो जो खलनायिकाच रचत असते .
आता ही खलनायिकांची साखळी वाढतच चालली आहे. मालिकांच्या वाढत्या जाळ्याबरोबर खलनायिकांची संख्याही वाढत जाईल हे निर्विवादपणे सिद्ध झालंय. सतत कटकारस्थान, कुरघोडी करणाऱ्या खलनायिकांना कदाचित नायिकेचा दर्जा प्राप्त होणार, अशी चिन्हं दिसू लागली आहेत.
No comments:
Post a Comment