टोरांटो येथील मराठी भाषिक मंडळाने निमंत्रित केलेल्या चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या पूर्व नियोजित वेळापत्रकानुसार ३, ४ आणि ५ ऑगस्ट या संमेलनाच्या तारखा होत्या. परंतु या तारखा रद्द करून संमेलन अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्याचा निर्णय महामंडळाने घेतला आहे. टोरांटो येथील मराठी भाषिक मंडळाकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने हा निर्णय झाल्याचे समजते, तर महामंडळाने टोरांटोतील या मंडळाला पाठवलेल्या खर्चाचे आकडे त्यांच्या आवाक्याबाहेरचे असल्याने हे मंडळ प्रतिसाद देत नसल्याची चर्चा चालू आहे.
मे महिन्यात या तारखा नक्की होऊन पुढील प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु आता संमेलन होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण महामंडळाने आयोजक मंडळास तीन दिवसांचा कार्यक्रम, साहित्यिकांचे मानपान, उपस्थितांची यादी इ. गोष्टी कळवल्यावर आयोजक मंडळाने महामंडळास खर्च विभागून घेऊ असे कळवले होते. परंतु, महामंडळ तडजोडीस तयार नसल्याचे समजते.
सप्टेंबर नंतर टोरांटोमध्ये प्रचंड थंडी असते, त्याकाळात संमेलन होणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात संमेलन न झाल्यास संमेलनाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
मे महिन्यात या तारखा नक्की होऊन पुढील प्रक्रिया सुरु होणार होती. परंतु आता संमेलन होईल की नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे कारण महामंडळाने आयोजक मंडळास तीन दिवसांचा कार्यक्रम, साहित्यिकांचे मानपान, उपस्थितांची यादी इ. गोष्टी कळवल्यावर आयोजक मंडळाने महामंडळास खर्च विभागून घेऊ असे कळवले होते. परंतु, महामंडळ तडजोडीस तयार नसल्याचे समजते.
सप्टेंबर नंतर टोरांटोमध्ये प्रचंड थंडी असते, त्याकाळात संमेलन होणे शक्य नाही. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात संमेलन न झाल्यास संमेलनाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते.
No comments:
Post a Comment