निर्माते विश्वजीत गायकवाड आणि दिग्दर्शक मिलिंद अरुण कवडे यांनी 'येड्यांची जत्रा' या त्यांच्या पहिल्याच चित्रपटातून ग्रामीण भागातील स्वच्छतेच्या प्रश्नाला हात घालण्याचे धाडस केले आहे. या चित्रपटाची कथा - पटकथा, दिग्दर्शक मिलिंद कवडे यांनी लिहिली असून संवाद प्रकाश भागवत यांचे आहेत. गुरु ठाकूर लिखित चित्रपटातील गीतांना क्षितीज वाघ यांनी संगीत दिले असून पार्श्वसंगीत पंकज पुष्कर यांचे आहे. सुप्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान व संतोष पालवणकर यांनी क्षितीज वाघ व श्रेया घोषाल, अमृता नातू यांच्या स्वरातील गीतांवर कोरिओग्राफी केली आहे.
चित्रपटात मध्यवर्ती भूमिका भरत जाधवने साकारली असून त्याच्या सोबतीला मोहन जोशी, विनय आपटे, संदीप पाठक, पंढरीनाथ कांबळी, निशा परुळेकर, आरती सोळंकी, विशाखा सुभेदार, आनंदा कारेकर, जयराज नायर, गणेश मयेकर, सुहास भालेकर, प्रकाश भागवत, सतिश तारे, किशोर नांदलस्कर, जयंत सावरकर, मनोज टाकणे, अंजली उजवणे, वासू भागवत या कलाकारांसोबत स्नेहा कुलकर्णी ही नावेदित अभिनेत्री चित्रपटातून पदार्पण करते आहे.
No comments:
Post a Comment