Tuesday, February 14, 2012

'संस्कृती कला दर्पण' १२ व्या चित्रपट महोत्सवाची दिमाखात सुरुवात.

'संस्कृती कला दर्पण' या संस्थेतर्फे आयोजित १२ व्या चित्रपट महोत्सवाचा उद्घाटन सोहळा सोमवार ज्येष्ठ कथा, पटकथाकार, दिग्दर्शक सागर सरहद्दी यांच्या शुभहस्ते रविंद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी येथे संपन्न झाला. याप्रसंगी रमेश साळगावकर, रेखा सहाय, समृद्धी पोरे, कांचन अधिकारी, मिलद गवळी, गजेंद्र अहिरे, विजय पाटकर, प्रमोद पवार, अजय फणसेकर, ए राधास्वामी, स्मिता जयकर, अमृता राव, संतोष भिंगार्डे, सौमित्र पोटे आदि मान्यवर उपस्थित होते.

जून २०१२ मध्ये 'संस्कृती कला दर्पण' या संस्थेतर्फे राष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करणार असल्याचे त्यांनी आज सांगितले. सध्या चालू असलेल्या चित्रपट महोत्सवातील उत्कृष्ट ३ चित्रपटाला राष्ट्रीय चित्रपट महोत्सवात प्राधान्य दिले जाईल अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे यांनी सांगितले.

'संस्कृती कला दर्पण' या चित्रपट महोत्सवात तब्बल ५६ मराठी चित्रपटातून १७ उत्तम चित्रपटाची निवड करण्यात आली. या परीक्षणाचे कार्य अभय राजाध्यक्ष, रमेश साळगावकर, रेखा सहाय, समृद्धी पोरे या मान्यवरांनी केल्याचे यासंस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि उपाध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी सांगितले. या १७ चित्रपटामध्ये 'शाळा', 'गजर', 'रे ला रे', 'डँबिस', 'खेळ मांडला', 'अर्जुन', 'आम्ही का तिसरे', 'फक्त लढ म्हणा', 'आरोही', 'सोपान एक जिदद', 'मुक्ती', 'बालगंधर्व', 'झकास', 'यदा यदा ही धर्मस्य', 'नऊ सव्वा नऊची वेळ होती', 'देऊळ' या चित्रपटांबरोबर 'आजच्या चित्रपटावरील जाहिरात आणि प्रमोशन' व 'आधुनिक तंत्रज्ञान आणि चित्रपट' या विषयावर चर्चासत्र आयोजित केले आहे. 

'अर्जुन' चित्रपटापासून सुरु झालेल्या महोत्सवाची सांगता 'देऊळ' या चित्रपटाने होणार आहे. या स्पर्धेत वरील १७ चित्रपटाचे परीक्षण करून  सर्वोत्कृष्ट तीन चित्रपट निवडण्याचे कार्य अमित भंडारी, संतोष भिंगार्डे, कांचन अधिकारी, सौमित्र पोटे आणि अजय फणसेकर पाहतील अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर सांडवे आणि उपाध्यक्षा अर्चना नेवरेकर यांनी दिली. चित्रपट महोत्सवात निवडलेल्या तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांना प्रथम पारितोषिक रुपये २ लाख, द्वितीय दीड लाख आणि तृतीय एक लाख रुपयाचे पारितोषिक हे या महोत्सवाचे खास आकर्षण ठरले आहे.

No comments:

Post a Comment