दिलीप प्रधान यांनी या चित्रपटाच दिग्दर्शन केलं आहे. विस्कटलेलं कुटुंब नातवंड एकमेकांच्या सहाय्याने कसे सावरतात आणि आई वडिलांना याची जाणीव कशी करुन देतात. याचे चित्रण या चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपटाची कथा अनिल पवार यांची असून पटकथा आणि संवाद दिलिप प्रधान आणि अनिल पवार यांचे आहेत. प्रसाद कुलकर्णी आणि गौतम आठवले यांच्या गीतांना अबुझर रिझवी यांनी संगीत दिले आहे.
'नातवंड' मध्ये मोहन जोशी, रमेश भाटकर, रवि पटवर्धन या दिग्गजांसोबत संजय मोहिते, जयवंत वाडकर, शांताबाई तांबे, अभिजीत भोसले, दिपा चाफेकर, दिपज्योती, प्रियांका यादव, सिद्धार्थ शहा, सेवा मोरे, जयेश राजे, कोमल जाधव, प्रिया गमरे, अभय खडपकर, कोमल आपके यांच्याही प्रमुख भुमिका आहेत.
No comments:
Post a Comment