Saturday, April 16, 2011

'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' येणार २२ एप्रिल रोजी.

निर्माते अनिल पत्याणे यांच्या नवलाई क्रिएशनची निर्मिती असलेला 'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' २२ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे. दिग्दर्शक प्रकाश पांचाळ दिग्दर्शित आणि लिखित ह्या चित्रपटाला सत्यघटनेची पार्श्वभूमी आहे. मनाला भिडणार्‍या या चित्रपटाची पटकथा प्रकाश पांचाळ आणि तेजेश घाडगे यांची असून संवाद लेखन तेजेश घाडगे यांनी केले आहे. श्रीकांत नरुले यांनी लिहिलेल्या गीतांना बाळ पळसुले यांनी संगीतबद्ध केले आहे. 

या चित्रपटात कोकणातील निसर्गरम्य पार्श्वभूमी पहायला मिळणार आहे आणि मार्लेश्र्वराच्या गुहेतील एक दृश्य लाईट न वापरता मंदिरातील समईच्या मिणमिणत्या प्रकाशात कॅमेरामन जीतू आचरेकर यांनी टिपले आहे. संकलन दिलीप दरक, नृत्ये अनिल सुतार यांची तर सदाशिव चव्हाण या चित्रपटाचे निर्मिती प्रमुख आहेत.

या चित्रपटात डॉ. गिरीश ओक, शरद पोंक्षे, आनंद अभ्यंकर, अश्विनी एकबोटे, शांता तांबे, मंजुषा गोडसे, अक्षया भिंगार्डे, अनिरुद्ध बनकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. निशा परुळेकर, विनोद पंडीत आणि भुषण कडु यांनी या 'ज्ञानेश्र्वरी एक्सप्रेस' मध्ये पाहुणे कलाकार म्हणून काम केले आहे.

No comments:

Post a Comment