Saturday, March 3, 2012

१६ मार्चला प्रदर्शित होणार 'काय करू न कसं करू'.

'जी. व्ही. फिल्म्स लिमिटेड' चा 'काय करू न कसं करू' हा विनोदी मराठी चित्रपट. बालागिरी निर्मित, विनय ए. लाड दिग्दर्शित हा चित्रपट १६ मार्चला चित्रपट गृहात दाखल होतोय.

'काय करू न कसं करू' ही कथा आहे उषा आणि निशा या दोन बहिणींची. मध्यमवर्गीय कुटुंबात लहानाच्या मोठ्या झालेल्या उषा आणि निशाला नेहमीच उच्चवर्गीय राहणीमानाने भुरळ घातली आहे. श्रीमंत राहणींची आवाक्याबाहेरची स्वप्न पाहणं हा या दोघी बहिणीचा फंडा. त्या दोघी विजय आणि अजयच्या प्रेमात पडल्या आहेत. त्या दोघी सारखीच श्रीमंत व्हायची स्वप्नं पाहण्यार्‍या विजयला संगीतकार तर अजयला डॉक्टर व्हायचं आहे. एका अनपेक्षित घटनेत त्या चौघांचे एकमेकांविषयी गैरसमज होतात. उषा-निशा त्याना संगीतकार व डॉक्टर समजतात तर अजय- विजय त्यांना उद्योगपतीच्या मुली समजतात. गडबड, गोंधळातून नसलेलं सत्य प्रत्यक्षात असल्याचा भासविण्याचा त्यांचा प्रयत्न कोणत्या वळणावर येऊन पोहचतो हे पाहण्यासाठी  'काय करू न कसं करू' चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट पहावी लागेल. 

भरत जाधव, दिपाली सय्यद, पुष्कर श्रोत्री, आदिती सारंगधर, विजय चव्हाण, उमा सरदेशमुख, ज्योती जोशी, अशोक शिंदे या कलाकारांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा - पटकथा चित्रपटाचे दिग्दर्शक विनय ए. लाड यांची असून संवाद संजय बेलोसे यांनी लिहिले आहे. 'काय करू न कसं करू' चित्रपटासाठी निशिकांत सदाफुले यांनी लिहिलेल्या व संगीतबद्ध केलेल्या गीतांना स्वप्नील बांदोडकर, त्यागराज खाडिलकर, नेहा राजपाल, कल्पना या गायकांचे स्वर लाभले आहेत. चित्रपटातील गीतांवर दिलीप मेस्त्री त्यांनी नृत्य दिगदर्शन केले आहे. चित्रपटाचे छायाचित्रण - अनिल खांडेकर, कला दिगदर्शन - रशीद रनग्रेझ यांनी तर संकलन विनय ए.लाड यांनी केले आहे.

No comments:

Post a Comment