'कृपासिंधू' मालिकेचे २०० भाग पूर्ण.
मी मराठी वाहिनी वरील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलांवर आणि त्यांच्या भक्तांना आलेल्या अनुभवांवर आधारित 'कृपासिंधू' - भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या मालिकेने २०० भाग पूर्ण करून लोकप्रियतेचा उच्चांक गाठला आहे. दोनशे भागांच्या या प्रवासात मालिकेने स्वामी समर्थ महाराजांच्या अगाध लीला आणि त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव लोकांपर्यंत पोहचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. अतिशय सखोल संशोधन आणि उत्तम लिखाणाद्वारे स्वामी समर्थांच्या आयुष्याशी निगडीत लोकांना फार माहित नसलेल्या गोष्टी ही लोकांपर्यंत पोहचवण्यात ही मालिका यशस्वी झाली आहे.
No comments:
Post a Comment