Tuesday, March 22, 2011

२१ मार्च पासून २ नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला.

Sharad Upadhye
'भविष्यावर बोलू काही' हा 'मी मराठी' वरील शरद उपाध्ये यांचा कार्यक्रम नवीन स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या कार्यक्रमात सहभागी होणार्‍या कुटुंबातील सदस्यांच्या कुंडलीवरुन भविष्याबाबतची माहिती शरद उपाध्ये सांगणार आहेत. २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार संध्या ६.३० वाजता हा कार्यक्रम पाहता येणार आहे.

याचबरोबर आणखी एक नवी मालिका 'कालाय तस्मै नमः' 'ई टिव्ही मराठी' वर २१ मार्चपासून सोमवार ते शनिवार  रात्री ९ वाजता प्रसारीत होणार आहे. 

या मालिकेत विक्रम गोखले विश्वंभर पंडित ही व्यक्तिरेखा साकारत असून मालिकेतल्या प्रमुख देशमुखांच्या भूमिकेत अरुण नलावडे आणि मानसी मागीकर आहेत, त्यांच्यासोबत सुलभा देशपांडे, अमित भानुशाली, रुचिता जाधव, शरयु जयवंत, नरेश बिडकर आणि मनोज कोल्हटकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहे. 

No comments:

Post a Comment