Monday, February 28, 2011

अजय-अतुल शोधणार तरुणाईचा आवाज.

ई टिव्ही मराठी'वरील लोकप्रिय कार्यक्र्म 'गौरव महाराष्ट्राचा' मधून यापुर्वी बालसुरांचा शोध घेण्यात आला होता. आणि आता तरुण सुरांचा शोध घेण्यासाठी 'गौरव महाराष्ट्राचा - शोध नव्या सुरांचा' अंतर्गत मराठीतील आजची सर्वात लोकप्रिय आणि आघाडीची संगीतकार जोडी अजय-अतुल या शोध मोहिमेत सामील झाले आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रथमच अजय अतुल परीक्षकांच्या भूमिकेत दिसणार आहेत. लवकरच महाराष्ट्रातील विविध ठिकाणी ह्या निवड चाचण्या पार पडणार असून त्याची सुरुवात येत्या १३ मार्च पासून नागपूर मधून होणार आहे.  

गजेंद्र सिंह यांच्या साईबाबा टेलिफिल्म्स ची निर्मिती असलेल्या 'गौरव महाराष्ट्राचा' या कार्यक्रमाचे दोन्ही पर्व तुफान लोकप्रिय ठरले. या नव्या पर्वामध्ये १६ ते २५ वर्षे वयोगटातील गायक गायिकांची निवड करण्यात येणार आहे.

No comments:

Post a Comment