Tuesday, October 9, 2012
Thursday, October 4, 2012
दुभंग चा वर्ल्ड टेलिव्हीजन प्रीमियर
पहा आदिनाथ कोठारे आणि उर्मिला कानेटकर यांची प्रेमकहाणी ‘दुभंग’ प्रथमच
झी मराठी वर

रविवार | ७ ऑक्टोबर | संध्या ७ वाजता

Wednesday, October 3, 2012
मिफ्ता अवॉर्ड्स रंगणार ४ ऑक्टोबरपासून सिंगापूर येथे
मराठी नाटक आणि सिनेमाला गौरवाचे स्थान प्राप्त करून देणारा आणि मराठीचा झेंडा डौलाने साता समुद्रापार फडकाविणारा “मराठी इंटरनॅशनल फिल्म अँन्ड थिएटर अवॉर्ड्स” अर्थातच मिफ्ता यंदा सिंगापूर येथे रंगणार आहे.
यंदा मिफ्ता चे हे तिसरे वर्ष असून दिनांक ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा सोहळा यंदा सिंगापूर येथील कलांग सभागृहामध्ये पार पडणार आहे .
यापूर्वी हा सोहळा दुबई ,लंडन येथे रंगला होता.
यावर्षी ट्रॅव्हल पार्टनर असलेल्या केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स यांच्या सहयोगाने ही परदेशवारी घडणार आहे.
म्हैसकर मिफ्ता परिवार आणि केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स च्या वीणा पाटील यांच्या टीमने हा सोहळा दिमाखदार होण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
या मिफ्ता अवॉर्ड्सची नामांकने ही जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी देऊळ ,काक्स्पर्श ,शाळा मध्ये चुरस पाहायला मिळणार असून नाटक विभागात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर ,टॉम आणि जेरी ,लग्नबंबाळ यामध्ये चुरस रंगणार आहे.
रवी जाधव दिग्दर्शित बीपी अर्थात बालक पालक या आगामी सिनेमाच्या प्रिमीअर शो चे आयोजन यंदाच्या मिफ्ता मध्ये करण्यात आले असून
नुकत्याच या सिनेमाची साउथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (SAIFF) मध्ये निवड करण्यात आली आहे.
मिफ्ता संबंधित अधिक ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी खालील संकेत स्थळांवर भेट द्या
Website - http://www.miftaawards.com/
Facebook - http://www.facebook.com/ miftaawards?ref=ts
Twitter - https://twitter.com/ miftaawards
Youtube - http://www.youtube.com/ miftaawards
यंदा मिफ्ता चे हे तिसरे वर्ष असून दिनांक ४ ते ७ ऑक्टोबर या कालावधीत हा सोहळा यंदा सिंगापूर येथील कलांग सभागृहामध्ये पार पडणार आहे .
यापूर्वी हा सोहळा दुबई ,लंडन येथे रंगला होता.
यावर्षी ट्रॅव्हल पार्टनर असलेल्या केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स यांच्या सहयोगाने ही परदेशवारी घडणार आहे.
म्हैसकर मिफ्ता परिवार आणि केसरी टूर्स अँन्ड ट्रॅव्हल्स च्या वीणा पाटील यांच्या टीमने हा सोहळा दिमाखदार होण्यासाठी जोरदार कंबर कसली आहे.
या मिफ्ता अवॉर्ड्सची नामांकने ही जाहीर झाली असून सर्वोत्कृष्ट सिनेमासाठी देऊळ ,काक्स्पर्श ,शाळा मध्ये चुरस पाहायला मिळणार असून नाटक विभागात अलिबाबा आणि चाळीशीतले चोर ,टॉम आणि जेरी ,लग्नबंबाळ यामध्ये चुरस रंगणार आहे.
रवी जाधव दिग्दर्शित बीपी अर्थात बालक पालक या आगामी सिनेमाच्या प्रिमीअर शो चे आयोजन यंदाच्या मिफ्ता मध्ये करण्यात आले असून
नुकत्याच या सिनेमाची साउथ एशियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल (SAIFF) मध्ये निवड करण्यात आली आहे.
मिफ्ता संबंधित अधिक ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी खालील संकेत स्थळांवर भेट द्या
Facebook - http://www.facebook.com/
Twitter - https://twitter.com/
Youtube - http://www.youtube.com/
५ ऑक्टोबरपासून चित्रपटगृहात 'साद'.
हेमंत दाभाडे निर्मित, दिग्दर्शित 'साद' या चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकतेय. सोबत यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडित, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पांडकर, यशवंत चोपडे, मयूर पवार, रेधी ही अनुभवी- नवोदित स्टार कास्ट या चित्रपटात एकत्र आली आहे. चित्रपटाचे एक आकर्षण म्हणजे यातील काही प्रसंगांचे चित्रीकरण मलेशियातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे.
चित्रपटाची कथा आनंद म्हसवेकर यांनी लिहिली असून पटकथा आणि विस्तार अभिनेते दिपक देऊलकर आणि आरती देसाई यांनी केले आहे. संवाद दिपक देऊलकर आणि आनंद म्हसवेकर यांनी लिहिले आहेत. ५ ऑक्टोबरला 'साद' चित्रपटगृहात दाखल होत आहे.
पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत संगीतकार सलील कुलकर्णीतकार सलील कुलकर्णी
ढोल ताशांचा आवाज ता-रा-रा गणपती आमचा नाचत आला पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत संगीढोल ताशांचा आवाज ता-रा-रा गणपती आमचा नाचत आला पुण्यातील मानाचा चौथा तुळशीबाग गणपती विसर्जन मिरवणुकीत संगीतकार सलील कुलकर्णीतकार सलील कुलकर्णी
http://www.facebook.com/AreAvaajKonacha

http://www.facebook.com/AreAvaajKonacha
Monday, October 1, 2012
झी नेटवर्क चे यशस्वी २० वर्ष पूर्ण
झी नेटवर्क
ने २८ सप्टेंबर १९९२ ला झी टीव्ही ही, हिंदी जनरल एंटरटेनमेंट वाहिनी सुरु केली.
झी टीव्ही हि
पहिली खाजगी हिंदी वाहिनी आहे व त्यानंतर अनेक खाजगी वाहिन्या झीने प्रथम सुरू
केल्या आहेत.
Thursday, September 27, 2012
Anulesh Desai Debut Film ………….Saad, releasing on 5th Oct
या जगात प्रत्येक जण स्वत:च्या कोषात कितीही मग्न असला तरी आपल्या जिव्हाळ्याच्या माणसांनी घातलेली साद त्याला खुणावतेच. आईवडीलांच्या मायेचा हुंकार आपल्या अपत्यासाठी जितका गहिरा असतो तितकीच त्या मुलांनी देखील आपल्या प्रेमाच्या माणसांना घातलेली साद लाखमोलाची असते.
मानवी नात्यातील हळुवार भावनिक बंधावर बेतलेल्या कथानकावर ‘अभिरुची फिल्म्स’ ही निर्मिती संस्था ‘साद’ हा पहिला मराठी चित्रपट घेऊन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करीत आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेला हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. हेमंत दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘साद’ या चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकतेय. सोबत यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडीत, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पंडकर, यशवंत चोपडे, मयूर पवार, रेधी ही अनुभवी- नवोदित स्तारकास्त साद चित्रपटात एकत्र आली आहे. चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यातील काही प्रसंगाचे चित्रीकरण मलेशियातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. आनंद म्हसवेकर लिखीत चित्रपटाची कथा आहे राहुलची. मलेशियात स्थायिक असलेल्या राहुलने आपल्या जन्मदात्या आईला साद घातली आहे. तेवीस वर्षाने नियतीने जुळवून आणलेली ही आई मुलाची भेट होईल की जुनी नाती त्या आड येतील. मलेशियातील मॉम- दाद राहुलवर संतापतील की त्याच्या निर्णयाला साथ देतील. प्रेमाच्या माणसांनी एकमेकांना घातलेल्या सादेला प्रतिसाद मिळतोय का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी वेगळ्या धाटणीची पटकथा- संवाद आणि विस्तार अभिनेते दीपक देऊलकर आणि आरती देसाई यांनी केले आहे. संवाद दीपक देऊलकर, आनंद म्हसवेकर यांनी लिहिले आहे. आरती देसाई यांनी लिहिलेल्या गीतांना अरविंद हळदीपूर यांनी संगीत दिले असून पार्श्वगायन देवकी पंडीत, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत हळदीपूर या गायकांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडीत आणि फुलवा खामकर यांनी यातील गीतांवर नृत्य दिग्दर्शन केले आहे. संकलन रवी फुटाणे यांनी केले असून ध्वनी संयोजन सुरेश पासवान यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्तोबेरला साद चित्रपटगृहात दाखल होत आहे.
मानवी नात्यातील हळुवार भावनिक बंधावर बेतलेल्या कथानकावर ‘अभिरुची फिल्म्स’ ही निर्मिती संस्था ‘साद’ हा पहिला मराठी चित्रपट घेऊन निर्मिती क्षेत्रात प्रवेश करीत आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेला हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यात सर्वत्र प्रदर्शित होतोय. हेमंत दाभाडे निर्मित, दिग्दर्शित ‘साद’ या चित्रपटातून अनलेश देसाई आणि अवंतिका सालियन ही नवी जोडी रुपेरी पडद्यावर झळकतेय. सोबत यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडीत, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पंडकर, यशवंत चोपडे, मयूर पवार, रेधी ही अनुभवी- नवोदित स्तारकास्त साद चित्रपटात एकत्र आली आहे. चित्रपटाचे आणखी एक आकर्षण म्हणजे यातील काही प्रसंगाचे चित्रीकरण मलेशियातील निसर्गरम्य परिसरात करण्यात आले आहे. आनंद म्हसवेकर लिखीत चित्रपटाची कथा आहे राहुलची. मलेशियात स्थायिक असलेल्या राहुलने आपल्या जन्मदात्या आईला साद घातली आहे. तेवीस वर्षाने नियतीने जुळवून आणलेली ही आई मुलाची भेट होईल की जुनी नाती त्या आड येतील. मलेशियातील मॉम- दाद राहुलवर संतापतील की त्याच्या निर्णयाला साथ देतील. प्रेमाच्या माणसांनी एकमेकांना घातलेल्या सादेला प्रतिसाद मिळतोय का? हे चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. चित्रपटाची उत्सुकता वाढवणारी वेगळ्या धाटणीची पटकथा- संवाद आणि विस्तार अभिनेते दीपक देऊलकर आणि आरती देसाई यांनी केले आहे. संवाद दीपक देऊलकर, आनंद म्हसवेकर यांनी लिहिले आहे. आरती देसाई यांनी लिहिलेल्या गीतांना अरविंद हळदीपूर यांनी संगीत दिले असून पार्श्वगायन देवकी पंडीत, वैशाली सामंत, स्वप्नील बांदोडकर, संगीत हळदीपूर या गायकांनी केले आहे. नृत्य दिग्दर्शक नरेंद्र पंडीत आणि फुलवा खामकर यांनी यातील गीतांवर नृत्य दिग्दर्शन केले आहे. संकलन रवी फुटाणे यांनी केले असून ध्वनी संयोजन सुरेश पासवान यांनी केले आहे. येत्या ५ ऑक्तोबेरला साद चित्रपटगृहात दाखल होत आहे.
Wednesday, September 26, 2012
नवा चेहरा अनलेश देसाई देतोय 'साद'.
अनलेशचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्याने आपल्या सहजसुंदर अभिनयाने यातील भूमिका साकारली आहे. या चित्रपटात यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडित, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पांडकर, यशवंत चोपडे, मयुर पवार या अनुभवी कलाकारांसोबत तितक्याच तोडीचा अभिनय साकारण्याचे आव्हान त्याने खुबीने पेलले आहे.
आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारी राहुलची भूमिका अनलेशने साकारली असून त्याच्या आई वडिलांशी असणार्या नातेसंबंधावर 'साद' हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रीकरण मलेशियात करण्यात आले आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होतोय.
Tuesday, September 25, 2012
'या टोपी खाली दडलयं काय ?' या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण.
निर्माते दिलीप आपेट यांनी आपल्या 'शुभकल्याण फिल्म'च्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत सुरेंद्र पन्हाळकर. अनुभवी व बुजुर्ग दिग्दर्शक दत्ताराम तावडे हे या चित्रपटाचे दिग्दर्शन करीत आहेत.
नुकतेच निधन पावलेले संगीतकार बाळ पळसुले यांनी या चित्रपटातील चार गीतांना संगीत दिलं आहे. धमाल विनोदी व राजकीय मिष्किलबाजी असलेल्या चित्रपटात मकरंद अनासपुरे, अशोक सराफ हे दोन मातब्बर कलाकार प्रमुख भूमिकेत असून सुरेखा कुडची, किशोरी अंबिये, भालचंद्र कुलकर्णी व नवतारका सुवर्णा काळे यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत.
Thursday, September 20, 2012
'चार्ली' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.
सस्पेन्स, थ्रिलर, सिच्युएशनल कॉमेडी आणि चार्ली चैप्लिन चित्रपटाचे गुण वैशिष्ट्य असलेली ब्लैक कॉमेडी हे चार घटक परस्परपूरक पद्धतीने एकत्र करुन 'समृद्धि क्रिएशन्स' निर्मित अणि 'पर्व क्रिएशन्स' सहनिर्मित चार्ली हा सिनेमा विदीन सिनेमा अर्थात चित्रपटातला चित्रपट आकारला येतोय. मुंबईत झालेल्या एक भव्य कार्यक्रमात ह्या चित्रपटाचा शुभारंभ करण्यात आला. या चित्रपटाचा नायक भारत जाधव याने एका शवपेटीच्या आत दडलेले या चित्रपटाचे शीर्षक अनोख्या पद्धतीने जाहीर केले. याप्रसंगी चित्रपटाचे निर्माते बाबा काळे अभिनेते सतीश पुळेकर, भारत जाधव, सहनिर्माते रवी गोळे, ज्येष्ठ सनदी अधिकारी गजभिये आणि मराठी चित्रपटसृष्टीतले अनेक मान्यवर उपस्थित होते.
चार्ली चाप्लिन ह्यांना आदरांजली म्हणून या चित्रपटाचे नामकरण 'चार्ली' असे करण्यात आले आहे असे यावेळी दिग्दर्शक समीर रमेश सुर्वे यांनी सांगितले तसेच छायाचित्रण आणि संगणकीय तंत्रात झालेल्या नव्या बदलाचा आधार घेऊन हा सिनेमा आकारास येईल असे ते म्हणाले.
Tuesday, September 18, 2012
‘नाईट स्कूल’ अंधारातील ज्ञानदीप
लाख्खो विषय आणि त्यांच्या समाजात उमटणा-या छटा प्रतिबिंबित होऊन जेव्हा रुपेरी पडद्यावर साकारल्या जातात तेव्हा आपल्या प्रत्येकाच्याच आयुष्याला एक वेगळेच व्यासपीठ मिळाल्याचा भाव मनात येतो. आपल्या आजूबाजूच्या अनेक व्यक्तींच्या कहाण्या त्या लांब रुंद पडद्यावर प्रेक्षक म्हणून पाहतानाचा आनंद सगळ्यांच्याच चेह-यावर दिसून येतो.
आज आपला भारत देश अनेक क्षेत्रात विकसित होण्याचा प्रयत्न करतोय. पण विकसनाचा पाया असलेल्या शिक्षणाच्या क्षेत्रात मात्र अजूनही थोडी कमतरता भासते आहे. काही जणांना शिकण्याची इच्छा असून परिस्थितीपुढे त्यांना झुकावे लागत आहे, तर काही जणांमध्ये अजूनही जिज्ञासूपणाची कलाच नसल्याचं लक्षात येत आहे. पण परिस्थितीवर मात करून आयुष्याच्या लढायांना समर्थपणे समोर जाऊन त्याचं सोनं करणारे अनेक जण आपल्याला समाजात दिसतात. अंधारातही प्रकाशमान असणा-या रात्रशाळांची कथा सांगणारा ‘नाईट स्कूल’ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. वनमाळी बेनरखाली बनणा -या नितीन मावाणी निर्मित या चित्रपटात रात्रशाळेच्या जगाची कहाणी मांडण्यात आली आहे.
सुप्रसिद्ध दिग्दर्शक मानसिंग पवार यांच्या दिग्दर्शनाखाली ‘नाईट स्कूल’ या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून त्याच्या पोस्ट प्रोडक्शनचे कामही पूर्ण झाले आहे. ‘डोंबिवली फास्ट’ सारख्या चित्रपटातून सरस अभिनयाची दाद मिळवलेल्या आणि हिंदी चित्रपटांमधूनही लोकप्रिय झालेला अभिनेता संदीप कुलकर्णी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. गोरगरीबांच्या अज्ञानमय अंधारात ज्ञानाचा प्रकाशाचा दीप प्रज्वलित करण्याच्या उदात्त हेतूने एका समाजसेवकाने सुरु केलेल्या ‘शिवाजी नाईट स्कूल’ ची कथा या चित्रपटात दाखवली आहे. विनोद, सुख दु:खाचे क्षण, विविध समस्या, भावनिक प्रसंग अशा अनेक प्रसंगांनी हा चित्रपट रेखाटण्यात आला आहे.
चित्रपटाची कथा आणि संवाद, दिग्दर्शक मानसिंग पवार यांनीच लिहिले आहेत. याशिवाय बब्रू भोसले यांच्यासह गीतलेखनाचे काम मानसिंग पवार यांनी केले आहे. सुरेश वाडकर, स्वरूप भालवणकर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांनी या चित्रपटातील गाणी गायली आहेत. प्रसाद पंडित, श्रीकांत यादव, अन्वय बेंद्रे, दीपा चाफेकर, राजू गोविलकर, शिवराज वाळवेकर, आशित आंबेकर, राजू मावाणी या कलाकारांसह रात्रशाळेतील ४० विद्यार्थ्यांचा अभिनय या चित्रपटात प्रेक्षकांना पाहता येईल. केमेरामन प्रकाश शिंदे यांनी चित्रपटाचे छायांकन केले असून संकलनाची जबाबदारी परेश मांजरेकर यांनी पार पडली आहे.
केवळ विनोदीपट बनवून पैसे न कमावता आपण समाजाचेही काही देणे लागतो या विचाराने प्रेरीत होऊन समाजातील वास्तव समोर आणून, त्यातील समस्या जनतेसमोर मांडून त्या निवारण्याचे आवाहन करण्याचा आपला प्रयत्न आहे, अशा भावना निर्माते नितीन मावाणी यांनी व्यक्त केल्या. दिवसा काम करून रात्री मौजमजा करण्यापेक्षा रात्री शिक्षण घेणे हे कठोर तपस्येप्रमाणे असल्याने रात्र शाळेतील जग ख-या जगासमोर आणण्याची इच्छा होती आणि ती या सिनेमाद्वारे पूर्ण झाल्याचे दिग्दर्शक मानसिंग पवार यांनी सांगितले.
तांत्रिक कार्यभाग पूर्ण झाल्यानंतर लवकरच हा सिनेमा प्रदर्शित करण्याची इच्छा नितीन मावाणी यांनी व्यक्त केली.
Saturday, September 15, 2012
तरुणाईचे दमदार रुप असलेला 'दम असेल तर' २८ सप्टेंबरला राज्यभर प्रदर्शित होणार.
पूर्वी राजकीय विषयावर सहसा व्यक्त न होणारी तरुण पिढी आता हिरीरीने लक्ष घालून आपलं मत मांडताना दिसत आहे. तरुणाईचा हाच बदल आणि असाच काहीसा राजकीय सामाजिक विषय 'दम असेल तर' या आगामी मराठी चित्रपटातही मांडण्यात आला आहे, आणि यात तरुणाईच्या या राजकीय आंदोलनाचं नेतृत्व करतोय शंकर ह उद्योन्मुख दमदार चेहरा.
'सागर सकुंडे फिल्म्स' निर्मित आणि विजय गोखले दिग्दर्शित 'दम असेल तर' मधील तरुणाईचं हे समाजभिमुख राजकारण प्रेक्षकांना लवकरच बघायला मिळणार आहे. चित्रपटाचा मुख्य नायक आहे शंकर. सुभाष घई यांच्या 'व्हिसलिंग वुड्स' या अद्ययावत प्रशिक्षण संस्थेमधून अभिनयाचे धडे गिरवलेला शंकर या चित्रपटातून पदार्पण करत आहे. त्याच्यासोबत मनवा नाईक, स्मिता शेवाळे, उदय टिकेकर, मोहन जोशी, शुभांगी लाटकर, विघ्नेश जोशी, विजय गोखले आणि अनंत जोग अशी तगडी स्टारकास्ट आहे. येत्या २८ सप्टेंबरला हा चित्रपट राज्यभर प्रदर्शित होतोय.
Friday, September 14, 2012
रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर आणि रवी जाधव यांची निर्मिती असलेल्या
या वेळी रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर, रवी जाधव यांच्यासह किशोर कदम, सई ताम्हणकर, प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके, सुबोध भावे, अमृता सुभाष, अविनाश नारकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सतीश तारे, सुप्रिया पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'विवा इन' या संस्थेद्वारे श्री. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर चित्रपट निर्मिती मध्ये पदार्पण करीत आहेत. बीपी चे आणखीन एक मोठे वैशिष्ट म्हणजे बॉलीवूडमधील प्रख्यात संगीतकार जोडी विशाल - शेखर यांनी या चित्रपटाद्वारे मराठीचित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे ."करूया आता कल्ला" आणि "हरवली पाखरे" ही दोन गाणी मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात धमाल उडवणार.
बीपी हा चित्रपट म्हणजे एक हलकेफुलके नाट्य आहे. नाटयातून प्रेक्षकांना आपल्या मुलांशी कसा संवाद साधायला हवा हे समजणार आहे.
‘अरे आवाज कोणाचा….’लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
सर्वसामान्य जनतेपर्यंत सहज पोहोचू शकणारे माध्यम म्हणजे ‘चित्रपट माध्यम’. याच विचारातून सामाजिक विषय सर्व स्तरातील जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी ‘Common Man Films’ द्वारे मराठी चित्रपटांची निर्मिती केली जाणार आहे. काही दिवसांपूर्वी ‘हॉटेल ऑर्बेट’ मध्ये या चित्रपट निर्मिती संस्थेच्या ‘अरे आवाज कोणाचा….’ या फिल्मची घोषणा करण्यात आली.
मध्यमवर्गात वाढलेल्या आणि गणेशोत्सव मंडळातून सामाजिक क्षेत्रात कार्य करणा-या तरूणांनी मिळून या संस्थेची स्थापना केली आहे. यानिमित्त चित्रपटाचे निर्माते चिद्विलास क्षीरसागर म्हणाले, “अरे आवाज कोणाचा हा फक्त एक चित्रपट नसून आमच्यासाठी ती एक चळवळ आहे. समाजातील सर्व थरापर्यंत पोहोचण्याचे माध्यम म्हणून भारतीय चित्रपट सृष्टीकडे पाहिलं जातं. सध्या अनेक सामाजिक प्रश्नांनी उचल खाल्ली असली तरी चित्रपटांमधून त्यांचे दर्शन घडत नाही. चित्रपट माध्यम हे थेट समाजापर्यंत पोहोचत असल्यामुळे आम्ही ‘Common Man Films’ या चित्रपट संस्थेची स्थापना केली.”
हा चित्रपट एका कार्यकर्त्याच्या आयुष्यावर, त्याला आलेले अनुभव आणि विविध प्रसंगांवर आधारित आहे. उदय सावंत ही प्रमुख भूमिका प्रसिद्ध अभिनेते डॉ. अमोल कोल्हे साकारत आहेत. एका छोट्याशा खेड्यातून आलेला एक तरुण मुलगा अत्यंत लहान वयात राजकीय क्षेत्रात प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून विकसित होतो. अण्णासाहेब (उदय टिकेकर) यांचा तो समर्थक असतो. अण्णासाहेबांचा विरोधक असलेल्या नानासाहेबांना (तुषार दळवी) त्याची दखल घ्यावी लागते आणि ते त्याची कारकीर्द संपवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करतात, अशी ह्या चित्रपटाची कथा आहे.
या चित्रपटाची निर्मिती हर्षल गरूड, वैभव वाघ, चिद्विलास क्षीरसागर आणि स्वप्नील सुरेश माने यांनी केली आहे. प्रसिद्ध दिग्दर्शक हेमंत देवधर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाची कथा अॅड. अनिश पाडेकर यांची असून पटकथा आणि संवादलेखन प्रताप गंगावणे यांचे आहे. संजय जाधव यांनी छायाचित्रणाची जबाबदारी स्वीकारली आहे. चित्रपटातील गीते चिद्विलास क्षीरसागर यांची असून संगीत शैलेंद्र बर्वे यांनी दिले आहे. डॉ. अमोल कोल्हे, उदय टिकेकर, तुषार दळवी, ऐश्वर्या नारकर, विशाखा सुभेदार, विद्याधर जोशी, यशोधन बाळ आणि मनोज जोशी या कलाकारांच्याही महत्वपूर्ण भूमिका या चित्रपटात आहेत.
चित्रपटाचे दिग्दर्शक हेमंत देवधर सांगतात, “हा चित्रपट प्रत्येकाला आपलासा वाटेल. ही सर्वसामान्य माणसाची कहाणी आहे. आपल्या समाजात अनेक कार्यकर्ते आहेत. पण त्यांचा आवाज किंवा वेदना कोणापर्यंत पोहोचत नाहीत. त्याकडे दुर्लक्ष केले जाते. एखाद्याला घडवण्यात किंवा संपवण्यात प्रसिद्धीमाध्यमांचा खूप मोठा वाटा आहे. त्यावरदेखील या चित्रपटात प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. आजच्या समाजाकडून ज्यांच्या आवाजाकडे दुर्लक्ष झाले आहे त्यांना ‘अरे आवाज कोणाचा’ हा चित्रपट समर्पित करण्यात आला आहे.”
चित्रपटाबद्दल अधिक माहिती देताना निर्माते चिद्विलास क्षीरसागर म्हणाले, “कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील प्रातिनिधिक समस्यांना या चित्रपटाद्वारे वाचा फोडण्यात आली आहे. समाजाच्या समस्या मांडताना या कार्यकर्त्यांसमोर निर्माण होणारे पेचप्रसंग, राजकीय दबाव आदींचा त्यात समावेश आहे. या विषयाला न्याय देणे ही खूप अवघड गोष्ट होती. परंतु चांगली टीम लाभल्यामुळे हे आव्हान पेलू शकल्याचा आम्हांला आनंद आहे. आजच्या तरुण पिढीचे वास्तव या चित्रपटाद्वारे सर्वांच्या समोर येईल अशी मी आशा करतो.”
या चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण झाले असून लवकरच हा ‘आवाज’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Thursday, September 13, 2012
ठाणे येथे रंगलेल्या मिफ्ता महोत्सवाची सांगता……
मराठी मनोरंजन विश्वाचा सर्वांत दिमाखदार सोहळा म्हणून ओळखल्या जाणा-या मिफ्ता महोत्सवाचे आयोजन यावर्षी ठाण्याच्या काशिनाथ घाणेकर नाट्यगृहात करण्यात आले होते. २ सप्टेंबर पासून चालू झालेल्या ह्या मनोरंजक महोत्सवाचा सांगता समारोह दिनांक ९ सप्टेंबर रोजी पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष मा. श्री. राज ठाकरे, निरंजन हिरानंदानी, राजेश आथयडे, सुधाकर चव्हाण, वंदना गुप्ते, सुहास जोशी यांसह अनेक मान्यवर कलाकारही उपस्थित होते.
मान्यवर परीक्षक आणि मायबाप रसिकांच्या पसंतीची दहा नाटके आणि दहा चित्रपटांचा समावेश या मिफ्ता महोत्सवात करण्यात आला होता. रसिक ठाणेकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल महेश मांजरेकर यांनी ठाणेकरांचे आभार मानले. त्याचबरोबर पुढील वर्षी हा महोत्सव एकाच वेळी पाच विविध जिल्ह्यांमध्ये आयोजित करण्याचा त्यांचा मानस असल्याचंही त्यांनी सांगितलं. यंदा तिसरे वर्ष असलेला मिफ्ता पुरस्कार सोहळा ऑक्टोबरमध्ये सिंगापूर यथे रंगणार आहे.
अभिनेत्री प्रिया बापट आणि अभिनेता उमेश कामत यांनी पुरस्कार सोहळ्याची नामांकने आणि घोषित पुरस्कार जाहीर केले.
सिनेमा नावाचा माणूस व्ही. शांताराम या राहुल रानडे दिग्दर्शित नृत्यसंगीताच्या कार्यक्रमाने या महोत्सवाची सांगता करण्यात आली.
स्वप्नील बांदोडकर, अजित परब, केतकी भावे, मधुरा कुंभार, श्रीरंग भावे यांच्या सुश्राव्य संगीताने रसिक प्रेक्षकांची मने जिंकली, तर उर्मिला कानेटकर- कोठारे, नेहा पेंडसे, मानसी नाईक, मृण्मयी देशपांडे, सोनाली कुलकर्णी आणि सिद्धार्थ जाधव यांच्या नृत्याविष्काराने महोत्सवाची शान वाढवली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन सुबोध भावे, सचिन खेडेकर, प्रसाद ओक आणि जितेंद्र जोशी यांनी अतिशय उत्तमरित्या पार पाडले.
म्हैसकर फाऊंडेशनचे प्रायोजकत्व लाभलेल्या या सोहळ्याची संकल्पना महेश मांजरेकर यांची आहे.
नामांकने व घोषित पुरस्कार
चित्रपट घोषित पुरस्कार पुढीलप्रमाणे :-
१.कथा – मिलिंद बोकील – शाळा
२.पटकथा – अविनाश देशपांडे – शाळा
३.संवाद – विवेक बेळे – बदाम राणी गुलाम चोर .
४.गीतकार – स्वानंद किरकिरे – दत्ता दिगंबरया हो , मला भेट द्या हो …- देऊळ .
५.संगीतकार – अजय नाईक – सतरंगी रे .
६.पार्श्वगायक – रूपकुमार राठोड ,नाही एकटा… डँबिस
७.पार्श्वगायिका – उर्मिला धनगर – वेलकम हो राया वेलकम… – देऊळ
८. नृत्य दिग्दर्शक – सुभाष नकाशे – अजिंठा.
९. कला दिग्दर्शक -प्रशांत राणे अभिषेक विजयकर – काकस्पर्श
१०.संकलक – अभिजित देशपांडे – देऊळ.
११.वेशभूषा – लक्ष्मण येल्लप्पा गोल्लार – काकस्पर्श
१२.रंगभूषा – विक्रम गायकवाड – काकस्पर्श
१३.साऊंड डिझायनर – निमेश छेडा अविनाश सोनावणे – शाळा
१४.प्रसिद्धी – साकेत धोगडे -अजिंठा
१५.छायांकन – अजित रेड्डी -काकस्पर्श
१६.विनोदी भूमिका – जयवंत वाडकर – झकास.
मिफ्ता पुरस्कार सोहळा २०१२ ( नाटक विभाग घोषित पुरस्कार )
१.लेखक – विवेक बेळे -अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
२.नेपथ्य – निखील रत्नपारखी – टॉम आणि जेरी.
३.संगीत – संभाजी भगत – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
४.प्रकाश – प्रदीप वैद्य – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
मिफ्ता पुरस्कार सोहळा २०१२ (नाटक विभाग नामांकन )
५.सहाय्यक अभिनेत्री – मंजुषा गोडसे – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
सीमा देशमुख – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
सायली महाडिक – सरगम.
६.सहाय्यक अभिनेता – संभाजी तांगडे – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
रमेश भाटकर – मी रेवती देशपांडे
विद्याधर जोशी – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर.
७.सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – मधुरा वेलणकर – लग्नबंबाळ
कादंबरी कदम – टॉम आणि जेरी.
रिमा – सासू माझी ढासू .
८.सर्वोत्कृष्ट अभिनेता -निखील रत्नपारखी – टॉम आणि जेरी.
मोहन जोशी – मी रेवती देशपांडे
आनंद इंगळे – लग्नबंबाळ
९.सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन – विजय केंकरे – लग्नबंबाळ
निखील रत्नपारखी – टॉम आणि जेरी.
नंदू माधव – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला
१०.सर्वोत्कृष्ट नाटक – अलिबाबा आणि चाळीशीतले चोर – महाराष्ट्र कल्चरल सेंटर
टॉम आणि जेरी – अश्वमी थिएटर्स.
लग्नबंबाळ – शुभम थिएटर्स.
विशेष ज्यूरी पुरस्कार – शिवाजी अंडरग्राउंड ईन भिमनगर महुल्ला – पब्लिक ओपिनियन प्रोडक्शन आणि रंगमळा.
पुनरुजिवित नाटक – लेकुरे उदंड जाली – नाट्यसंपदा ,मुंबई.
Wednesday, September 12, 2012
'आनंदमूर्ती' ऑडीओ सीडीचे प्रकाशन आणि सामाजिक ट्रस्टची निर्मिती.
सुप्रसिद्ध गायिका पद्मश्री पद्मजा फेणाणी - जोगळेकर यांच्यासोबत मंदार पारखी आणि मनोज देसाई यांनी 'आनंदमूर्ती' ह्या ऑडिओ सीडीतील भक्तिगीतांच्या रचनांसाठी योगदान दिले आहे.
‘अय्या……राणी मुखर्जी!!!’
‘गंध’ आणि ‘रेस्टॉरंट’ सारख्या यशस्वी फिल्म्सचे दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांचा ‘अय्या’ हा हिंदी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्रीयन सचिन कुंडलकर यांनी महाराष्ट्रीयन गावाकडचा तडका बॉलीवूडमध्ये आणण्यासाठी या चित्रपटाची कथा आणि पात्रंही मराठीच निवडली आहेत. चित्रपटाचे विशेष म्हणजे बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जी या चित्रपटातील मुख्य नायिका आहे. मिनाक्षी देशपांडे या तरुण मराठी मुलीची भूमिका राणी या चित्रपटात साकारत आहे. मध्यमवर्ग कुटुंबात राहणा-या मिनाक्षीच्या आईच्या भूमिकेत मराठी कॉमेडी क्वीन निर्मिती सावंत असून वडिलांच्या भूमिकेत सतीश आळेकर असणार आहेत. याचबरोबर सुबोध भावे, अमित वाघ असे आणखीही काही मराठी चेहरे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
मराठी मुलीच्या भूमिकेत उतरण्यासाठी राणीने फक्त ड्रेसिंग स्टाईलवरच नाही तर मराठी भाषेवरसुद्धा खूप मेहनत घेतली आहे. ‘आता मराठी माहोल लावणीशिवाय परिपूर्ण कसा होणार?’ हा प्रश्न सगळ्यांच्या मनात यायच्या आधीच राणी आपल्याला तिच्या मराठमोळ्या अदांनी घायाळ करणारी लावणी या चित्रपटात सादर करणार आहे. वैभवी मर्चंट यांनी नृत्य दिग्दर्शन केलेल्या ‘अगं बाई …..’ या झक्कास लावणीवर राणी थिरकणार आहे.
अनुराग कश्यप निर्मित ही मराठी बॉलीवूड फिल्म १२ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्यात येईल.
Subscribe to:
Posts (Atom)