या वेळी रितेश देशमुख, उत्तुंग ठाकूर, रवी जाधव यांच्यासह किशोर कदम, सई ताम्हणकर, प्रथमेश परब, शाश्वती पिंपळीकर, मदन देवधर, भाग्यश्री सकपाळ, रोहित फाळके, सुबोध भावे, अमृता सुभाष, अविनाश नारकर, विशाखा सुभेदार, आनंद इंगळे, सतीश तारे, सुप्रिया पाठारे आदी मान्यवर उपस्थित होते. 'मुंबई फिल्म कंपनी' आणि 'विवा इन' या संस्थेद्वारे श्री. रितेश देशमुख आणि उत्तुंग ठाकूर चित्रपट निर्मिती मध्ये पदार्पण करीत आहेत. बीपी चे आणखीन एक मोठे वैशिष्ट म्हणजे बॉलीवूडमधील प्रख्यात संगीतकार जोडी विशाल - शेखर यांनी या चित्रपटाद्वारे मराठीचित्रपटसृष्टीत पदार्पण केले आहे ."करूया आता कल्ला" आणि "हरवली पाखरे" ही दोन गाणी मराठी चित्रपट संगीत क्षेत्रात धमाल उडवणार.
बीपी हा चित्रपट म्हणजे एक हलकेफुलके नाट्य आहे. नाटयातून प्रेक्षकांना आपल्या मुलांशी कसा संवाद साधायला हवा हे समजणार आहे.
No comments:
Post a Comment