Tuesday, December 27, 2011

मराठी निर्मात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा

Meghraj Rajebhosale, Marathi Nirmata Sangh
अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष प्रसाद सुर्वे यांच्यासह १०० हून अधिक मराठी चित्रपट निर्मात्यांच्या उपस्थितीत पुण्यात झालेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात मेघराज राजेभोसले यांनी निर्मात्यांच्या नव्या संघटनेची घोषणा केली. ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक विजय कोंडके आणि मेघराज राजेभोसले यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

यावेळी मराठी चित्रपटाच्या निर्मात्यांना येणार्‍या विविध अडचणी, अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, थिएटर मालक, वितरक यांच्याकडून होणारे असहकार्य या विषयांवर चर्चा झाली.

या कार्यक्रमात निर्मात्यांनी उपस्थित केलेले काही मुद्दे खालीलप्रमाणेः
नवोदितांना प्रशिक्षण, वितरणावर नियंत्रण, तंबूतले चित्रपट, जाहिरात व प्रमोशन, विषयांचे वेगळेपण, उत्पादनावर विश्वास हवा, चित्रपटाचे हक्क, थिएटरमालक, मराठीसाठी स्लॉट, संयुक्त प्रकल्प, यश आणि अपयश.

Monday, December 26, 2011

संस्कृती कलादर्पण संस्थेचा 'ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळा' संपन्न.

Sulochana Didi

गेली बारा वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात अग्रेसर  असलेल्या संस्कृती कलादर्पणच्या संस्थेच्या वतीने ज्यांचे कार्य आजही नवतरुणांच्या विचारांना परिणाम देते अशा मान्यवर ज्येष्ठ कलाकारांना यंदा गौरविण्यात आले. या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मीच्या कार्याची जाणीव व कलेची जोपासना ह्या दोन मुख्य उद्देशाने 'ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळा' या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्कृती कलादर्पण तर्फे यंदापासून ज्येष्ठरंगकर्मीना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. 

या पुरस्कारांचे यंदाचे १० मानकरी म्हणून भालचंद्र पेंढारकर, सुहास भालेकर, रोहिणी हट्टंगडी, आशालता, नयनतारा, अशोक पत्की, ए राधास्वामी, सुर्यकांत लवंदे, बाबा पार्सेकर, मोहन लोके, तसेच विशेष मदत म्हणून अनिल तावडे या ज्येष्ठरंगकर्मींना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन संस्कृती कलादर्पणतर्फे २४ डिसेंबरला सन्मानित करण्यात आले. अनेक कलकारांच्या नृत्य आणि अभिनयाच्या सादरीकरण लाभलेल्या या सोहळ्याचे दिग्दर्शन महेश टिळेकर यांनी केले होते तर गिरीजा ओक व उमेश कामत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डू. निलेश साबळे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे कार्यक्रमाला वेगळी रंगत आली.

Thursday, December 22, 2011

ना.धों. महानोर यांच दिर्घकाव्य अजिंठा एक प्रेम कहाणी रंगमंचावर.

Ajintha, Akshar Kothari, Pallavi Wagh
१७५ वर्षाची मेजर रॉबर्ट गिल आणि पारु यांची सत्यप्रेम कहाणी अजिंठा एक प्रेम कहाणी च्या रुपाने रंगमंचावर नाटयरुपाने आली आहे. पद्मश्री ना. धों. महानोर यांच अजिंठा या दिर्घकाव्यावर आधारीत ही अमरप्रेम कहाणी रंगमंचावर प्रायोगिक धर्तीवर सादर केली जात आहे. एस. कुमार इंटरनॅशनल निर्मित व सृजण मुंबई प्रस्तुत हा नाट्यनुभव दिग्दर्शक मिलींद इनामदार यांनी दिग्दर्शित केला आहे.. ब्रिटीश मेजर पण मुळात चित्रकार असलेला रॉबर्ट गिलची हिंदुस्थानात बदली होते. अजिंठा वरील चित्र काढीत असताना पारुची भेट होते. मग सुरु होते एक अमर प्रेम कहाणी, ही प्रेम कहाणी ना.धो. महानोर यांनी आपल्या दिर्घकाव्यात काव्य रुपाने मांडली होती.

'अजिंठा एक प्रेम कहाणी'ला संगीत दिले आहे संगीतकार संजय गीते यांनी तर संगीत संयोजन अरविंद हसबनीस यांच आहे. गायिका अमृता नातु व संजय गीते यांनी आवाज दिला आहे. नृत्ये अनिल सुतार, प्रकाश योजना आदित्य देशपांडे, वेषभूषा संध्या साळवे, रंगभूषा कृष्णा बोरकर व नेपथ्य अंकुश कांबळी यांच आहे.

अजिंठा एक प्रेम कहाणी मध्ये रॉबर्ट गिल आणि पारुच्या महत्त्वाच्या भुमिकेत अक्षर कोठारी व पल्लवी वाघ असून प्रसाद ठोसर, प्रदीप सरवदे, नयनाराणी सोनवणे, वैष्णवी नाईक, दिपाली बडेकर, हर्षिता ब्राम्हणकर, अभिजीत भगत, निरंजन जाधव, मुकुंद ब्राम्हणे, अतुल गोवंडी, जयेश मोरे, योगेश मार्कंडे, राकेश पाटील, आशिष शिर्के यांच्याही भूमिका आहेत.

Monday, December 19, 2011

हृषिकेश आणि गायत्री कामेरकर 'संगीत खुर्ची'चे विजेते.

Sangeet Khurchi, Hrishikesh Kamerkar
ईटीव्ही मराठी वाहिनीवर चाललेल्या बहुचर्चित संगीत खुर्चीच्या विजेतेपदाचा मान नव्या दमाचा अष्टपैलू युवा गायक, संगीतकार हृषिकेश कामेरकर आणि त्याची पत्नी गायत्री कामेरकर यांना मिळाला आहे. स्मृतीचिन्ह आणि एक लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे. 

दहा सेलिब्रिटी जोडयांना घेऊन केलेला म्युझिकल शो असेच याचे स्वरुप होतं. गाण्यांसोबतच, पर्सनल लाईफ उलगडण्याचा प्रयत्न करता करता मनोरंजन व्हावं असा या शोचा मुख्य हेतू होता. मराठीतल्या सगळ्याच रिऍलिटी शोजमध्ये संगीत खुर्ची या शोचा टीआरपी सतत सर्वात जास्त म्हणजे चारहून अधिक होता.

Saturday, December 17, 2011

गुहागरमध्ये वेळणेश्वर किनार्‍यावर 'करुन टाक गोलमाल' या चित्रपटातील दोन गाण्यांचे चित्रीकरण संपन्न.

Aniket Vishvasrao, Girija Joshi
सीएस फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मात्या सुवर्णा बांदिवडेकर 'करुन टाक गोलमाल' या सिनेमाची निर्मिती करीत आहेत. या चित्रपटाची कथा राजेंद्र बांदिवडेकर यांनी लिहीली असून चित्रपटासाठी संगीतरचना सुद्धा त्यांचीच आहे.

राजेंद्र बांदिवडेकर यांचे दिग्दर्शन असलेल्या 'करुन टाक गोलमाल' या चित्रपटातील दोन गाणी गुहागरमध्ये वेळणेश्वर किनार्‍यावर अनिकेत विश्वासराव आणि गिरीजा जोशी यांच्यावर चित्रीत केली. स्वप्निल बांदोडकर, बेला शेंडे तसेच निर्मल कुमार यांनी गायलेल्या गीतांचे गीतलेखन राकेश बामगुडे यांचे असून उमेश जाधवने या गाण्यांसाठी नृत्यदिग्दर्शन केले आहे. प्रसाद भेंडे या सिनेमाचे कॅमेरामन आहेत.

या चित्रपटात अनिकेत विश्वासराव , गिरीजा जोशी सोबत मोहन जोशी, अशोक समर्थ, सतीश तारे, विजू खोटे, जयंत वाडकर, धनंजय मांद्रेकर आणि सुनील शिंदे आदी कलाकारांच्या भूमिका आहेत.

Friday, December 16, 2011

'खेळ खेळूया मनसे' कार्यक्रमाने रंगला शिवडी-भायखळा विभागाचा वर्धापन दिन.

Rajesh Shrinagrpure
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने शिवडी - भायखळा विभागाच्या वर्धापन दिनानिमित्त सालाबादप्रमाणे या ही वर्षी 'खेळ खेळूया मनसे' या कार्यक्रमाचे आयोजन केले होते शिवडी विधानसभेचे आमदार, मनसे गटनेते मा. बाळा नांदगावकर आयोजित 'खेळ खेळूया मनसे' कार्यक्रमात शिवडी विधानसभेतून ३०० महिलांचा सहभाग होता.

कार्यक्रमाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष हरिशचंद्र पडवळ यांच्या हस्ते करण्यात आले. सौ. शर्मिलाताई ठाकरे, सौ लीना बाळा नांदगावकर, महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष रीटाताई गुप्ता, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष शिल्पा सरपोतदार यांची उपस्थिती लाभली. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध अभिनेता राजेश शृंगारपूरे यांची उपस्थिती लाभली. 

कार्यक्रमात विविध स्पर्धा घेऊन त्या स्पर्धेच्या विजेत्या महिलांना तसेच सहभागी प्रत्येक महिलेले आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या.
कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला तो सुप्रसिद्ध अभिनेता व उत्कृष्ट सुत्रसंचालक अशी ख्याती असणारा स्वप्नील जोशी.

Wednesday, December 14, 2011

१६ डिसेंबरला प्रदर्शित होणार 'वन रुम किचन' आणि 'शर्यत'.

Sharyat, One Room Kitchen
येत्या शुक्रवारी म्हणजेच १६ डिसेंबरला वेगवेगळ्या विषयावर आधारीत दोन चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. पुरुषोत्तम अग्रवाल यांची निर्मिती असलेला आणि भरत जाधव व भार्गवी चिरमुले यांची प्रमुख भूमिका असलेला 'वन रुम किचन'. या चित्रपटाचे दिग्दर्शन- कथा- पटकथा आणि गीते महेश टिळेकर यांची असून संगीत अशोक पत्की यांच आहे. 

'वन रुम किचन' ही एक साधी सरळ चाळीतील मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी या चित्रपटात कॅथलिक आईची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात प्रमुख भूमिकेत भरत जाधव, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, किशोरी गोडबोले असून सोबत विजू खोटे, आशालता, विजय चव्हाण, किशोरी अंबिये, विजय चव्हाण, संजय मोहिते, स्मिता शेवाळे, राकेश बेदी, किशोर प्रधान, लिलाधर कांबळी, संदीप पाठक यांच्या भूमिका आहेत.

तसेच अश्वमेघ प्रॉडक्शन्स निर्मित विजू माने दिग्दर्शित 'शर्यत' हा चित्रपट. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांचे असून हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांच्या सोबत नंदकिशोर चौघुले यांनी संवादलेखन केले आहे. विजू माने आणि अशोक बागवे यांनी लिहीलेल्या गीतांना चिनार महेश यांच संगीत आहे. 

सचिन पिळगावकर एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार असून त्यांच्या सोबतच संतोष जुवेकर आणि विद्याधर जोशी सुद्धा 'शर्यत' मध्ये आहेत.

Monday, December 12, 2011

'अण्णा लयभारी' हा अण्णा भाऊ साठेंवरील चित्रपट १६ डिसेंबर २०११ ला रसिकांच्या भेटीस!

अण्णा भाऊ साठेंच्या कार्याने प्रेरीत होऊन प्रसिद्ध चित्रपट निर्माते- दिग्दर्शक - लेखक पप्पू लाड यांनी अण्णांच्या कार्याची महती सांगणार्‍या अण्णा लयभारी या चित्रपटाची निर्मिती केली असून त्यांचा हा चित्रपट येत्या १६ डिसेंबर, अण्णांचीच कर्मभूमि असलेल्या चेंबूर येथील अमर चित्रपटगृहात प्रदर्शित होत. १६ डिसेंबरला दुपारच्या मॅटिनीला (१२.३० वा) भव्य प्रिमिअर शो होणार आहे.

अण्णा भाऊ साठे याचं साहित्य हा जसा संशोधनाचा विषय आहे. तसंच त्यांच व्यक्तिमत्त्व आणि समग्र जीवनपट सुद्धा ! साहित्य, लोककला, कामगार स्वातंत्र लढा, सर्वसामान्य गरीब माणसावरील अन्यायविरोधात आपलं अवघं आयुष्य ज्या माणसाने पणाला लावलं त्यांच्यावर इतक्या वर्षानंतर मराठीमध्ये चित्रपट येऊ लागलाय, ही खरं म्हणजे अभिनासास्पद आणि तितकीच समाधान देऊन जाणारी बाब आहे.

Wednesday, December 7, 2011

गिरीश कुलकर्णी - अमृता सुभाषचा 'मसाला'.

'वळू' आणि 'विहीर' अशा दोन चित्रपटांच्या यशानंतर आणि लवकरच प्रदर्शित होणार्‍या बहुचर्चित देऊळचे दिग्दर्शक उमेश आणि गिरीश कुलकर्णी यांच्या 'आरभाट' संस्थेची निर्मिती व प्रवीण मसालेवाले यांची प्रस्तुती असलेल्या 'मसाला' या चित्रपटाचे दिग्दर्शन संदेश कुलकर्णी करणार आहे.
 
या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून उमेश कुलकर्णी काम पाहणार असून कथा, पटकथा आणि संवदलेखन गिरीश कुलकर्णी यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते एच. एम. रामचंद्र या चित्रपटाचे छ्यांकन करणार असून संकलन अभिजीत देशपांडे करणार आहेत. चित्रपटाची गीते सुनील सुकथनकर यांनी लिहीली असून आनंद मोडक यांनी संगीत दिले आहे. 
 
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत असून अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, नेहा शितोळे, शशांक शेंडे हे कलाकार आहेत. 

Tuesday, December 6, 2011

कौटुंबिक मराठी चित्रपट थ्रीडीमध्ये.

कौटुंबिक मराठी चित्रपट थ्रीडीमध्ये. ऐकायला वेगळ वाटतं नां? पण हे खरं आहे. मराठी चित्रपटांमध्ये देखील उत्तम, दर्जेदार चित्रपट येत आहेत. तंत्रज्ञानाच्या बाबतीत मराठी चित्रपटात सुधारणा होत असून मराठीतला पहिला थ्रीडी कौटुंबिक चित्रपट 'आई मला मारु नकोस' पूर्ण झाला आहे. नुकतचं या चित्रपटाच्या ऑडिओ सिडीचे प्रकाशन सिनेअभिनेत्री जयश्री टी यांच्या हस्ते पु. ल. देशपांडे सभागृह, प्रभादेवी येथे संपन्न झाले. यावेळी चित्रपटाचे निर्माते व अभिनेते अविनाश जाधव, दिग्दर्शक सत्यप्रकाश मंगतानी, विजू खोटे, मृणालिनी जांभळे, मनोज आनंद, कॅमेरामन राजन लायलपूरी, नृत्यदिग्दर्शक पप्पू खन्ना, जयंत येलूलकर आदि उद्योग, राजकिय व चित्रपटक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

सार्थक प्रॉडक्शनच्या बॅनरखाली निर्माते अविनाश जाधव व दिग्दर्शक सत्यप्रकाश मंगतानी यांनी प्रथमच हा थ्रीडी पट दिग्दर्शित केला आहे. याची कथा राजेंद्र बोडारे यांची असुन पटकथा संवाद सत्यप्रकाश मंगतानी यांनी लिहीले आहेत. 

Thursday, December 1, 2011

२ डिसेंबरला येतोय 'सगळ करुन भागले'.

Makrand Anaspure
'श्री चिंतामणी चित्र' निर्मिती संस्थेच्या या चित्रपटात 'दारुबंदी' सारखा खेड्यापाडयातील आजचा ज्वलंत सामाजिक प्रश्न मार्मिक पद्धतीने रेखाटण्यात आलेला 'सगळं करुन भागले' येत्या २ डिसेंबरला प्रदर्शित  होत आहे. या चित्रपटात मकरंद अनासपुरे मध्यवर्ती भूमिकेत आहे.

'सगळ करुन भागले' ची खुसखुशीत कथा-पटकथा आणि संवाद अरविंद जगताप यांनी लिहिले आहेत. या चित्रपटात मकरंद अनासपुरे सोबत चेतन दळवी, श्वेता मेहेंदळे, माधवी निमकर, भारत गणेशपुरे, जयराज नायर, अविनाश खर्शीकर, जयवंत भालेकर, गणेश रेवडेकर, आधा घोडके, सुनील होलकर, गिरीश जोशी, राधिका बोरगावकर आदी कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.