या चित्रपटाद्वारे विशाल-विहार या जोडीने दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केले आहे. सादीक लष्करिया चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. विहार घाग लिखीत यातील गीतांना संगीतकार नितीन हिवरकर- विहार घाग यांनी संगीत दिले आहे. या चित्रपटाचे शिर्षक गीत नंदेश उमप यांनी गायलं असून रविंद्र साठे, त्यागराज खाडीलकर, साधना सरगम, सुदेश भोसले आणि स्वरुप भालवणलकर अशा सुप्रसिद्ध गायकांच्या आवाजात ती स्वरबद्ध करण्यत आली आहेत.
चित्रपटाची संकल्पना-कथा-पटकथा-गीते तसेच नृत्यदिग्दर्शन विहार घाग यांनी केले असून संवाद विहार घाग व मंदार गायधनी यांनी लिहीले आहेत. चित्रपटात राजेश शृंगारपुरे, अरुण नलावडे, इला भाटे, अंशुमन विचारे, सुशृत मंकणी, किरण माने, नम्रता गायकवाड, निर्माला कोटणीस, हेमांगी कवी, वर्षा दांदले, जयंत पाटेकर, दर्शन जरिवाला या कलाकारांच्या यात भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment