'अरे बाबा पुरे' ची कथा विनीत कटारीया यांची असून पटकथा विनायक शाह, चेतन मालुसरे आणि विनीत कटारिया यांनी लिहिली आहे. संवाद संजय सावंत यांनी लिहीले आहेत. या चित्रपटात ५ गाणी असून ती मंगेश कांगणे यांनी लिहीली असून आनंद मेनन यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप, विवेक नाईक, आनंद मेनन, जान्हवी प्रभू यांनी ती गायली आहेत.
या चित्रपटात संजय नार्वेकर सोबत विजय चव्हाण, रविंद्र बेर्डे, आनंद अभ्यंकर, जयराज नायर, जयवंत वाडकर, अभय हुनसवाडकर, भूषण घाडी, अरुण कदम, पौर्णिमा अहिरे व नवोदित रुचिता जाधव यांच्या भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment