Sunday, October 17, 2010

कविवर्य नारायण सुर्वे यांचे निधन.

कविवर्य नारायण सुर्वे (वय ८३) यांचे सोमवारी दिनांक १६ ऑगस्ट रोजी सकाळी  साडेआठच्या सुमारास ठाण्याच्या हेल्थकेअर रुग्णालयात निधन झाले. १९२६-२७ मध्ये मुंबईतील गंगाराम सुर्वे यांनी त्यांना आपल्या घरी आणले. त्यांचे आयुष्य संघर्षमय होते. १९६१ मध्ये शिक्षक म्हणून त्यांची नोकरी सुरु झाले व गिरणगावचे 'सुर्वे मास्तर' म्हणून त्यांना लोक ओळखू लागले. १९६६ मध्ये तयंचा 'माझे विद्यापिठ' हा काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला.

१९९८ साली त्यांना पद्मश्री या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 'जाहिरनामा', 'ऐसा ग मी ब्रह्म', 'सनद', 'माणूस कलावंत आणि समाज' हे त्यांचे काही प्रसिद्ध काव्यसंग्रह आहेत.

No comments:

Post a Comment