रमाकांत कवठेकर यांच्या 'नागीन' चित्रपटापासून त्यांनी कॅमेरामन म्हणून सुरुवात केली. त्यांनी राज दत्त, अमोल पालेकर, अझिझ मिर्झा, नाना पाटेकर, भिमसेन अशा दिग्दर्शांसोबत काम केलं होत. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, गोवा राज्य पुरस्कार अशा पुरस्कारांचे ते मानकरी होते.
अलिकडे त्यांनी 'मर्मबंध' या मराठी चित्रपटासाठी काम केले होते. तसेच आगामी 'लाडी गोडी' आणि 'तमाशा' या चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी छायाचित्रण केले आहे. त्यांनी यापूर्वी सावली (२००७), मातीमाय(२००६), क्षण (२००६), लाल सलाम (२००२), पेहचान (२००५), स्टंप्ड (२००३), ध्यासपर्व( २००१), कैरी(२०००), लेकरु (२०००), सिलसिलाहै प्यार का(१९९९), बनगरवाडी (१९९६), प्रहार (१९९१), लपंडाव (१९९३), शेजारी शेजारी, गाव तसं चांगल, तिन्हीसांजा अशा बर्याचशा चित्रपटांचे छायाचित्रण केले होते.
No comments:
Post a Comment