Tuesday, January 26, 2010

'सामना' नंतर तब्बल ३५ वर्षांनंतर 'विहीर' च्या निमित्ताने मराठी चित्रपट बर्लिनमध्ये.

पुसान, मामी, एशियन, केरळ, पीफ, रॉटरडॅम आदी चित्रपट महोत्सवांमध्ये 'विहीर'चा गौरव झाला आहे. आणि आता साठाव्या बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट  महोत्सवासाठी या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे. या पूर्वी ३५ वर्षापूर्वी 'सामना' चित्रपटाची या महोत्सवासाठी  निवड करण्यात आली होती. 

बर्लिन महोत्सवातील या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी 'एबी कॉर्प'च्या जया बच्चन, उमेश कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, श्रीकांत यादव, मदन देवधर, आलोक राजवाडे, शार्वी कुलकर्णी, पर्ण पेठे उपस्थित राहणार आहेत. १४ तारखेला होणार्‍या या 'शो'ला 'रेड कार्पेट'चा मान मिळणार असून १४ ते १७ फेब्रुवारी या सलग चार दिवस हा चित्रपट दाखवला जाणार आहे. 

३५ वर्षापूर्वी बर्लिन महोत्सवात सहभागी झालेल्या 'सामना' चित्रपटात आणि आता सहभागी होणार्‍या 'विहीर' चित्रपटात एक साम्य आहे. ते म्हणजे डॉ. मोहन आगाशे. 

No comments:

Post a Comment